परसवाडा : ज्या उद्देशानुसार सभेचे आयोजन केले होते, त्यानुसार सभा न घेता दुसऱ्या विषयानुसार सभा घेण्यास सरपंचाने ग्रामसेवकाला बाध्य केले. मात्र याचा विरोध केल्यावर सरपंचाने स्वत: जि.प. पदाधिकाऱ्यांना फोन करून पदाचा दुरूपयोग करीत ग्रामपंचायत कार्यालयालाच कुलूप ठोकल्याचा प्रकार तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गोंडमोहाळी येथे घडला.गोंडमोहाळी ग्रामपंचायत येथे पहिली ग्रामसभा शासन आदेशानुसार १५ आॅगस्ट रोजी पार पडली. त्यात विषय सूचीनुसार ठराव विषयावर चर्चा करण्यात आली व ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. २४ आॅगस्ट रोजी नवनिर्वाचित सरपंच पौर्णिमा वडगाये यांनी आपल्या अधिकार क्षेत्रातील विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. त्या विषयसूचीत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांची निवड व ग्रा.पं. समितीची निवड करण्याच्या उद्देशाने सभा बोलावली होती. पण विषयानुसार सभा न घेता दुसऱ्या विषयानुसार सभा घेण्यास सरपंच पौर्णिमा वडगाये यांनी ग्रामसेवक धुर्वे यांना बाध्य केले. सरपंच नवीन असल्याने ग्रामसेवकाने त्यांना कायद्याची जाणीवही करून दिली. परंतु सरपंच, सत्तेत असलेले पदाधिकारी व सभेत उपस्थित समर्थक यांनी मागील सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे यावर सुरूवात करण्यास सांगितले. पण १५ आॅगस्ट रोजी यावर चर्चा होवून ठराव मंजूरही झाले आहे व सदर विषय सध्या पटलावर नसल्यामुळे ते चुकीचे होते. मात्र सरपंच, सदस्य व काही नागरिकांनी सभेत ग्रामसेवकावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. सभेत अंगणवाडी सेवकिा व शिक्षकही उपस्थित होते. आपण कार्यालयाला कुलूप ठोकल्याचे व त्याचा फोटो वर्तमान पत्रात देण्यासाठी काढल्याचे सरपंचाने खंडविकास अधिकाऱ्यांना फोनद्वारे कळविले. आपण आपल्या पदाचा दुरूपयोग केला आहे. आपल्याला कुलूप लावता येत नाही, असे खंडविकास अधिकारी गिऱ्हेपुंजे यांनी दूरध्वनीद्वारे सांगितल्यावर व कायद्याची जाणीव करून दिल्यावर त्यांच्या सहकाऱ्यांनी कुलुपही उघडले. मात्र गावात वातावरण खूपच तापले होते. या प्रकरणाची तक्रार विरोधी पक्षनेते, अनुभवी व २५ वर्षांपासून ग्रामपंचायतमध्ये प्रतिनिधित्व करणारे जागेश्वर निमजे, गोविंद ठाकरे, छगन राणे व इतर नागरिकांनी केली. तसेच सरपंच, उपसरपंच व सदस्यांवर कलम ३९ अन्वये कारवाई करण्यात यावी, अशी लेखी तक्रार जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी व आयुक्तांना केली आहे. (वार्ताहर)ग्रामसेवकाने ठेवले प्रसंगावधान४प्रकरण चिरघडल्यावर सभेत मारहाण किंवा शासकीय कागदपत्रांची चोरी किंवा फाडाफूड होवू शकते याबाबत प्रसंगावधान व वेळेचे भान ठेवून ग्रामसेवक धुर्वे यांनी सर्व दस्तावेज आलमारीत ठेवले. मात्र सरपंच हे सभा अध्यक्ष असूनही त्यांनी गोंधळ घालणाऱ्यांवर वचक न ठेवता त्यांच्यावर कारवाई केली नाही. तसेच जि.प. पदाधिकाऱ्यांना फोन करून स्वत: त्यांच्या आदेशाचे पालन करून आपल्याच कार्यालयाला कुलूप ठोकले व सभेत येणाऱ्या गावातील नागरिकांचे अपमान केले.ग्रामसेवकाचे बदली आदेश४सदर प्रकरणाची चौकशी न करता खंडविकास अधिकारी दुबे यांनी २९ नागरिकांच्या स्वाक्षरींच्या तक्रार अर्जानुसार, ग्रामसेवकाचे बदली आदेश काढून त्यांना पंचायत समिती कार्यालयात ठेवले. चौकशी करून नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक होते. पण पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली आदेश काढल्याचा आरोप निमजे यांनी केला आहे. तसेच खंडविकास अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी ग्रामसेवकाने केली आहे.
ंसरपंचाने केला पदाचा दुरूपयोग
By admin | Updated: September 15, 2015 04:25 IST