शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

महागाव धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:33 IST

तालुक्यातील महागाव सिरोली येथील आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्रावर सर्रास नियमांचे उल्लंघन करुन शेतकऱ्यांचे धान खरेदी केले जात असल्याची तक्रार खरेदी विक्री समितीचे माजी संचालक यशवंत परशुरामकर यांनी केली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा आरोप : साध्या वनजकाट्याने मोजमाप

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : तालुक्यातील महागाव सिरोली येथील आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्रावर सर्रास नियमांचे उल्लंघन करुन शेतकऱ्यांचे धान खरेदी केले जात असल्याची तक्रार खरेदी विक्री समितीचे माजी संचालक यशवंत परशुरामकर यांनी केली आहे.तालुक्यात खरीप हंगामाचे धानपीक निघाले. शासकीय हमी भावाने धान खरेदी करण्याचा तिढा कसाबसा सुटला आधारभूत हमी भावाने धान खरेदी सुरु झाली. मात्र नियोजनशून्य कार्यप्रणालीमुळे बारदाणा नसल्यामुळे अनेकदा खरेदी केंद्र बंद पडत आहेत. उसणवारी करुन दिवाळीचा सण साजरा करणाऱ्या शेतकºयांना धानविक्री करुन उसणवारीची परतफेड करावयाची आहे.मात्र बारदान्याच्या अभावामुळे खरेदी केंद्र बंद पडण्याच्या प्रक्रियेमुळे अडचणी येत आहेत. महागाव येथील धान खरेदी केंद्रावर चक्क साध्या वजन काट्याने मोजमाप केले जात आहे. इलेक्ट्रॉनिक वजन काट्याला वारंवार चार्र्जींग करावी लागते.या सबबीखाली चक्क शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचा आरोप परशुरामकर यांनी केला आहे. साध्या वजनकाट्याने बारदाण्याचे वजन व झुकते माप घेवून एक क्विंटल मागे साधारणत: २ ते ३ किलोची लूट केली जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. या हंगामाची जेव्हापासून खरेदी सुरु झाली अगदी तेव्हापासूनच साध्या वजनकाट्यावर मोजमाप सुरु आहे. खरीप हंगामाचे काही शेतकऱ्यांचे धान निघाले नसतानाही त्यांनी खरेदी केंद्रावर विक्रीसाठी रजिस्टरमध्ये नोंदणीकरुन ठेवली आहे.याची ज्या शेतकऱ्यांना जाणीव नाही ते शेतकरी धानपिक निघाल्यानंतर धान खरेदी केंद्रावर पोहचत आहेत. त्यामुळे खरेदी केंद्रावर धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची भल्ली मोठी वेटिंग लिस्ट तयार झाली आहे. यातच खरेदी विक्री संघ व ग्रेडरच्या नजीकच्या शेतकऱ्यांच्या धानाचे मोजमाप केले जात असल्याचाही आरोप आहे. महागाव परिसरातील २५ टक्के धान खरेदी झालेली नाही. दिवसभरात केवळ ४ ते ५ शेतकऱ्यांच्या धानाचे वजन काटा केला जातो. मात्र वेटिंग लिस्ट फार मोठी आहे. अद्याप ७५ टक्के शेतकरी धान खरेदी केंद्रावर आले नाहीत. त्यामुळे एकापेक्षा अधिक वजन काट्यांची आवश्यकता आहे.शिवाय ते सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स हवेत असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.ज्या प्रमाणात शेतकऱ्यांची वेटिंग लिस्ट आहे. त्या प्रमाणात धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी धान आणून ठेवले नाहीत. त्यामुळे यातील गुपीत उलगडले नाही. दुसऱ्या वजनकाट्याने धान खरेदी सुरू केली नाही तर धान खरेदी केंद्रच बंद पाडण्याचा इशारा यशवंत परशुरामकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या तक्रारीतून दिला आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड