शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
4
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
5
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
6
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
7
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
8
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
9
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
10
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
11
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
12
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
13
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
14
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
15
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
16
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
17
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
18
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
19
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
20
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...

लाखोंच्या मासोळ्या झाल्या नष्ट

By admin | Updated: June 14, 2014 23:41 IST

यावर्षी भर उन्हाळ्यात जलाशयातील पाण्याचा शिल्लक साठा असताना सहकारी संस्थेला पूर्वसूचना न देता जलाशयातील पाणी पूर्णत: काढून रिकामे करण्याचा प्रताप देवरीतील पाटबंधारे विभागाने केला.

संस्थेचे नुकसान : पाटबंधारे विभागाचा हलगर्जीपणालोहारा : यावर्षी भर उन्हाळ्यात जलाशयातील पाण्याचा शिल्लक साठा असताना सहकारी संस्थेला पूर्वसूचना न देता जलाशयातील पाणी पूर्णत: काढून रिकामे करण्याचा प्रताप देवरीतील पाटबंधारे विभागाने केला. या कारणाने जलाशयातील सर्व मासे मरून संस्थेचे पाच लाखांहून अधिकचे नुकसान झाले आहे. त्यामुळे संस्थेने नुकसानभरपाईची मागणी केली आहे.देवरी तालुक्यातील पाटबंधारे विभागाचे सालेगाव जलाशय हे मत्स्य व्यावसायाकरिता नवनीत आदिवासी मत्स्यपालन सहकारी संस्था मर्यादित चांदलमेटा यांनी पाटबंधारे विभागाकडून लिजवर घेतले आहे. दरवर्षी मत्स्यपालन करुन आपले व्यवसायातून संस्थेला चांगला नफा मिळतो. नेहमीप्रमाणे सदर संस्था मत्स्य व्यावसायाकरिता मासोळ्या पकडण्याचे कार्य जून महिन्याच्या तिसऱ्या, चवथ्या आठवड्यात करीत असतात. पुन्हा पावसाळा सुरू होताच मत्स्य बीज खरेदी करुन मत्स्यपालन करीत असतात. परंतु यावर्षी सदर जलाशयात पाण्याचा साठा भरपूर असल्याकारणाने उन्हाळी धानपिकाकरिता पाणी सोडले. धानाचे पिक निघाल्यानंतर सुद्धा पाण्याचा साठा चांगल्या प्रमाणात शिल्लक होता. तेव्हा विभागाने जलाशय खाली करण्याच्या दृष्टीने पूर्णत: पाणी कालव्याद्वारे काढून जलाशय कोरडे करुन सोडले. विशेष म्हणजे याबाबतची संस्थेला कोणतीही पूर्वसूचना न देता जलाशय रिकामे झाल्यामुळे जलाशयातील मासोळ्या मरण पावल्या. या जलाशयात अंदाजे १०० ते ५०० ग्रॅम वजनाच्या तीन लाख मासोळ्या तर एक किलो ग्रॅम ते दीड किलो ग्रॅमचे दोन लाख मासोळ्या मारल्या गेल्या. यामुळे संस्थेला व संस्थेच्या सभासदाचे पाच लाखाहून अधिकचे नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे सदर संस्थेला व संस्था सभासदाला तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व नुकसानी करिता सर्वस्व जबाबदार पाटबंधारे विभागाचे वरिष्ठच आहेत, असे मत व्यक्त केले आहे.या जलाशयातील अशीच घटना सन २००८ मध्ये घडली होती. त्यामुळे सुद्धा याच संस्थेला पाच लाखाच्या नुकसानीचा फटका सहन करावा लागला होता. तेव्हा संस्थेचे अध्यक्ष सुभालाल सराटे, सचिव टिकाराम आचले व संस्थेचे सदस्य शिवचरण वलके, नारायण परतेती, श्रीराम टेकाम, शामलाल उईके, गजानन सराटे, तुलाराम मरस्कोल्हे, कुवरलाल सराटे, रामलाल मरस्कोल्हे, परतेती, देवराज वलके, तिजूलाल वट्टी, रामचंद वलके, तुकाराम बावणे, शंकर मांढरे, मनोज भुमके, गोपीचंद मेश्राम, मधू बावणे या सर्वांनी झालेल्या नुकसानीची भरपाईची मागणी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. (वार्ताहर)