शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंच्या मासोळ्या झाल्या नष्ट

By admin | Updated: June 14, 2014 23:41 IST

यावर्षी भर उन्हाळ्यात जलाशयातील पाण्याचा शिल्लक साठा असताना सहकारी संस्थेला पूर्वसूचना न देता जलाशयातील पाणी पूर्णत: काढून रिकामे करण्याचा प्रताप देवरीतील पाटबंधारे विभागाने केला.

संस्थेचे नुकसान : पाटबंधारे विभागाचा हलगर्जीपणालोहारा : यावर्षी भर उन्हाळ्यात जलाशयातील पाण्याचा शिल्लक साठा असताना सहकारी संस्थेला पूर्वसूचना न देता जलाशयातील पाणी पूर्णत: काढून रिकामे करण्याचा प्रताप देवरीतील पाटबंधारे विभागाने केला. या कारणाने जलाशयातील सर्व मासे मरून संस्थेचे पाच लाखांहून अधिकचे नुकसान झाले आहे. त्यामुळे संस्थेने नुकसानभरपाईची मागणी केली आहे.देवरी तालुक्यातील पाटबंधारे विभागाचे सालेगाव जलाशय हे मत्स्य व्यावसायाकरिता नवनीत आदिवासी मत्स्यपालन सहकारी संस्था मर्यादित चांदलमेटा यांनी पाटबंधारे विभागाकडून लिजवर घेतले आहे. दरवर्षी मत्स्यपालन करुन आपले व्यवसायातून संस्थेला चांगला नफा मिळतो. नेहमीप्रमाणे सदर संस्था मत्स्य व्यावसायाकरिता मासोळ्या पकडण्याचे कार्य जून महिन्याच्या तिसऱ्या, चवथ्या आठवड्यात करीत असतात. पुन्हा पावसाळा सुरू होताच मत्स्य बीज खरेदी करुन मत्स्यपालन करीत असतात. परंतु यावर्षी सदर जलाशयात पाण्याचा साठा भरपूर असल्याकारणाने उन्हाळी धानपिकाकरिता पाणी सोडले. धानाचे पिक निघाल्यानंतर सुद्धा पाण्याचा साठा चांगल्या प्रमाणात शिल्लक होता. तेव्हा विभागाने जलाशय खाली करण्याच्या दृष्टीने पूर्णत: पाणी कालव्याद्वारे काढून जलाशय कोरडे करुन सोडले. विशेष म्हणजे याबाबतची संस्थेला कोणतीही पूर्वसूचना न देता जलाशय रिकामे झाल्यामुळे जलाशयातील मासोळ्या मरण पावल्या. या जलाशयात अंदाजे १०० ते ५०० ग्रॅम वजनाच्या तीन लाख मासोळ्या तर एक किलो ग्रॅम ते दीड किलो ग्रॅमचे दोन लाख मासोळ्या मारल्या गेल्या. यामुळे संस्थेला व संस्थेच्या सभासदाचे पाच लाखाहून अधिकचे नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे सदर संस्थेला व संस्था सभासदाला तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व नुकसानी करिता सर्वस्व जबाबदार पाटबंधारे विभागाचे वरिष्ठच आहेत, असे मत व्यक्त केले आहे.या जलाशयातील अशीच घटना सन २००८ मध्ये घडली होती. त्यामुळे सुद्धा याच संस्थेला पाच लाखाच्या नुकसानीचा फटका सहन करावा लागला होता. तेव्हा संस्थेचे अध्यक्ष सुभालाल सराटे, सचिव टिकाराम आचले व संस्थेचे सदस्य शिवचरण वलके, नारायण परतेती, श्रीराम टेकाम, शामलाल उईके, गजानन सराटे, तुलाराम मरस्कोल्हे, कुवरलाल सराटे, रामलाल मरस्कोल्हे, परतेती, देवराज वलके, तिजूलाल वट्टी, रामचंद वलके, तुकाराम बावणे, शंकर मांढरे, मनोज भुमके, गोपीचंद मेश्राम, मधू बावणे या सर्वांनी झालेल्या नुकसानीची भरपाईची मागणी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. (वार्ताहर)