शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

शाळा बंद असल्याने मुलांसोबतच पालकांचे मानसिक आरोग्य बिघडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:31 IST

गोंदिया : कोरोनामुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनामुळे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वेदनांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे आप्त जणांचा जीव ...

गोंदिया : कोरोनामुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनामुळे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वेदनांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे आप्त जणांचा जीव गेला. त्यामुळे कुटुंबीय तणावात आहेत. मागील दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. पालकही विविध प्रकारचे टेंशन घेऊन जगत आहेत. मानसिक आरोग्य बिघडल्यामुळे जणू परिस्थिती हाताबाहेर चालल्याचे चित्र आहे.

देशात ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करीत आहे. भारतात प्रत्येक तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करीत आहे. कोरोनामुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनाला अनेक शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वेदनांना सामोरे जावे लागत आहे. कितीतरी कुटुंब आप्त जणांचा जीव गेल्यामुळे पीडित आहेत. कितीतरी लोकांना आपला रोजगार कोरोनामुळे गमवावा लागला आहे. त्यामुळेही लोक अतिशय मानसिक तणावाखाली आहेत. साेबतच मुलांच्या शाळा सुरू झाल्या नाही. आर्थिक गणित बिघडले आहे.

................................

मुलांच्या समस्या

- मागील दीड वर्षांपासून शाळा बंद असल्यामुळे मुले घरी राहून खाणे, झोपणे, मोबाइलवर गेम खेळणे इथपर्यंतच सीमित झाले आहेत.

- मुले घरात राहून लठ्ठ झाली आहेत. शरीराचा व्यायाम कमी होत आहे. घरातच राहात असल्याने त्यांना कंटाळा येऊ लागला आहे.

- मुले पालकांना फिरायला जाण्याचा अट्टाहास करतात. पैश्यांच्या चणचणीमुळे वडीलधारी त्यांना बाहेर फिरायलाही नेत नाही.

.............

पालकांच्या समस्या

- मुलांना ऑनलाइन शिक्षणाकरिता महागडे मोबाइल खरेदी करून दिले. परंतु पाल्यांचा कल व्हिडिओ गेमकडे असल्याने पालक त्रस्त आहेत.

- मुलांना शिकण्यापेक्षा वाईट सवयी तर लागणार नाहीत याची भीती आहे. मुलांना घरी २४ तास सांभाळणे ही मोठी कसरत आहे.

- मुलांच्या भविष्याची चिंता व कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली त्याची चिंता आहे. कौटुंबिक कलहदेखील वाढत आहे.

.........................

कोट

कर्जबाजारीपणा, कौटुंबिक हिंसाचार, कोरोनात आप्त स्वकीयांचा झालेला मृत्यू यामुळे खचून लोकांची मानसिकता खालावत चालली आहे. मुलांच्या भविष्याची चिंता त्यांना सतावत आहे. पुरुषांची मानसिकता आर्थिक आणि सामाजिकमुळे खालावते तर महिलांची मानसिकता भावनिकतेमुळे खालावते. विविध कारणांमुळे असह्य मानसिक वेदना झाल्यामुळे सुटकेची तीव्र इच्छा तयार होते. त्यातून लोक आत्महत्या करतात.

- डॉ. लोकेश चिरवतकर, मानसोपचार तज्ज्ञ, गोंदिया.

.........

कोट

सततच्या बंधनामुळे मानसिकता खालावते. यातून आत्महत्यासारख्या घटनाही घडू शकतात. अशी पाळी कुणावरही येऊ नये यासाठी कुटुंबीयांनी व मित्रमंडळींनी यासाठी तत्पर असायला हवे. सरकारने मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केले. त्यात मानसोपचार तज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ता यांच्या माध्यमातून निदान आणि उपचार मोफत दिले जाते.

- डॉ. यामिनी येळणे, मानसोपचार तज्ज्ञ, गोंदिया

............

पहिली- १४५६५

दुसरी- १८५४२

तिसरी- २०१७६

चौथी- २०४०६

पाचवी- १९५९६

सहावी- १९४६४

सातवी- २००६३

आठवी-२०६०१

नववी- २०७७२

दहावी- २२५२२