शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
2
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
3
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
4
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
5
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
6
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
7
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
8
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
9
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
10
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
12
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
13
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
14
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
15
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
16
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
17
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
18
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
19
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

शाळा बंद असल्याने मुलांसोबतच पालकांचे मानसिक आरोग्य बिघडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:31 IST

गोंदिया : कोरोनामुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनामुळे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वेदनांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे आप्त जणांचा जीव ...

गोंदिया : कोरोनामुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनामुळे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वेदनांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे आप्त जणांचा जीव गेला. त्यामुळे कुटुंबीय तणावात आहेत. मागील दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. पालकही विविध प्रकारचे टेंशन घेऊन जगत आहेत. मानसिक आरोग्य बिघडल्यामुळे जणू परिस्थिती हाताबाहेर चालल्याचे चित्र आहे.

देशात ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करीत आहे. भारतात प्रत्येक तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करीत आहे. कोरोनामुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनाला अनेक शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वेदनांना सामोरे जावे लागत आहे. कितीतरी कुटुंब आप्त जणांचा जीव गेल्यामुळे पीडित आहेत. कितीतरी लोकांना आपला रोजगार कोरोनामुळे गमवावा लागला आहे. त्यामुळेही लोक अतिशय मानसिक तणावाखाली आहेत. साेबतच मुलांच्या शाळा सुरू झाल्या नाही. आर्थिक गणित बिघडले आहे.

................................

मुलांच्या समस्या

- मागील दीड वर्षांपासून शाळा बंद असल्यामुळे मुले घरी राहून खाणे, झोपणे, मोबाइलवर गेम खेळणे इथपर्यंतच सीमित झाले आहेत.

- मुले घरात राहून लठ्ठ झाली आहेत. शरीराचा व्यायाम कमी होत आहे. घरातच राहात असल्याने त्यांना कंटाळा येऊ लागला आहे.

- मुले पालकांना फिरायला जाण्याचा अट्टाहास करतात. पैश्यांच्या चणचणीमुळे वडीलधारी त्यांना बाहेर फिरायलाही नेत नाही.

.............

पालकांच्या समस्या

- मुलांना ऑनलाइन शिक्षणाकरिता महागडे मोबाइल खरेदी करून दिले. परंतु पाल्यांचा कल व्हिडिओ गेमकडे असल्याने पालक त्रस्त आहेत.

- मुलांना शिकण्यापेक्षा वाईट सवयी तर लागणार नाहीत याची भीती आहे. मुलांना घरी २४ तास सांभाळणे ही मोठी कसरत आहे.

- मुलांच्या भविष्याची चिंता व कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली त्याची चिंता आहे. कौटुंबिक कलहदेखील वाढत आहे.

.........................

कोट

कर्जबाजारीपणा, कौटुंबिक हिंसाचार, कोरोनात आप्त स्वकीयांचा झालेला मृत्यू यामुळे खचून लोकांची मानसिकता खालावत चालली आहे. मुलांच्या भविष्याची चिंता त्यांना सतावत आहे. पुरुषांची मानसिकता आर्थिक आणि सामाजिकमुळे खालावते तर महिलांची मानसिकता भावनिकतेमुळे खालावते. विविध कारणांमुळे असह्य मानसिक वेदना झाल्यामुळे सुटकेची तीव्र इच्छा तयार होते. त्यातून लोक आत्महत्या करतात.

- डॉ. लोकेश चिरवतकर, मानसोपचार तज्ज्ञ, गोंदिया.

.........

कोट

सततच्या बंधनामुळे मानसिकता खालावते. यातून आत्महत्यासारख्या घटनाही घडू शकतात. अशी पाळी कुणावरही येऊ नये यासाठी कुटुंबीयांनी व मित्रमंडळींनी यासाठी तत्पर असायला हवे. सरकारने मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केले. त्यात मानसोपचार तज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ता यांच्या माध्यमातून निदान आणि उपचार मोफत दिले जाते.

- डॉ. यामिनी येळणे, मानसोपचार तज्ज्ञ, गोंदिया

............

पहिली- १४५६५

दुसरी- १८५४२

तिसरी- २०१७६

चौथी- २०४०६

पाचवी- १९५९६

सहावी- १९४६४

सातवी- २००६३

आठवी-२०६०१

नववी- २०७७२

दहावी- २२५२२