शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

फुले दाम्पत्याची समाजसेवा स्मरणीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 06:00 IST

अमेरिकेत निग्रोंच्या हक्कासाठी त्यांनी आशिया खंडातून पाठिंबा दिला. फुले दाम्पत्य स्वत:साठी नव्हे तर इतरांसाठी लढले. महात्मा फुले यांचे कर्तुत्व खूप मोठे आहे. त्यांनी आपले सर्व आयुष्य समाजसेवेसाठी वाहीले. पुण्यात प्लेगची साथ असताना सावित्रीबार्इंनी त्यात उडी घेऊन स्वत:चा जीव गमावला.

ठळक मुद्देछगन भुजबळ : महात्मा फुले पुतळा अनावरण व समाज मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : महात्मा फुले यांनी आपल्यासाठी अनेक कष्ट घेतले. देशाच्या अनेक राज्यात महात्मा फुले यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांचा १५०-२०० वर्षापूर्वीचा कार्यकाळ आहे. त्यावेळी अमेरिकेत निग्रोंच्या हक्कासाठी त्यांनी आशिया खंडातून पाठिंबा दिला. फुले दाम्पत्य स्वत:साठी नव्हे तर इतरांसाठी लढले. महात्मा फुले यांचे कर्तुत्व खूप मोठे आहे. त्यांनी आपले सर्व आयुष्य समाजसेवेसाठी वाहीले. पुण्यात प्लेगची साथ असताना सावित्रीबार्इंनी त्यात उडी घेऊन स्वत:चा जीव गमावला. फुले दाम्पत्याची समाजसेवा जगाच्या इतिहासात दुसरी असूच शकत नसन स्मरणीय आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच छगन भुजबळ यांनी केले.तालुक्यातील ग्राम बोदरा देऊळगाव येथील अखिल भारतीय माळी समाज शाखा, ओबीसी समाज संघटना व देऊळगाव बोदरा ग्रामवासीयांच्यावतीने रविवारी (दि.१) आयोजित महात्मा फुले यांच्या पुतळ््याच्या अनावरण व समाज मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय माळी महासंघ विदर्भ प्रांताध्यक्ष राजेंद्र महाडोळे होते. यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, अ. भा. फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस किशोर कन्हेरे, दिवाकर गमे, गायत्री इरले, ईश्वर बाळबुधे, गोंदिया जिल्हा माळी समाजाचे अध्यक्ष देविदास गुरनुले, विष्णू नागरीकर, राजेंद्र मांदाळे, माधुरी देशकर व प्रतिष्ठित मंडळी मंचावर उपस्थित होती.पुढे बोलताना ना. भुजबळ यांनी, महात्मा फुले यांची दूरदृष्टी किती मोठी होती ती अनेक उदाहरणांवरून लक्षात येते. त्यांनी दलितांना जवळ केल. सावित्रीबार्इंनी महिलांना शिक्षणाचे दालन उपलब्ध करून दिले. फुले यांनी खडकवासला येथे धरण बांधल. कात्रजचा बोगदा त्यांनी तयार केला. त्यांनी शेती करून हंगामात तीन-तीन पिके घेतली. पाझर तलावाची संकल्पना त्यांची आहे. मात्र त्यावेळी झिरपे तलाव हे नाव दिल होत. त्यांनी ‘शेतकऱ्यांचा आसूड’ व ‘गुलामगिरी’ ही पुस्तके लिहिली. या पुस्तकांचे सामूहिक पठण झाले पाहिजे. या पठणामुळे शेतकरी आत्महत्या करणार नाही. शेतकरी कसा नागवला जातो याचं ज्वलंत वर्णन या पुस्तकात आहे. भारतरत्न पुरस्कार यावरून सध्या आकाडतांडव सुरू आहे. गांधी हे महात्मा आहेत. फुले हे महात्मा आहेत. त्यांचे स्थान आपल्या हृदयात आहे मग भारतरत्न कशाला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.आ. चंद्रिकापुरे यांनी, ओबीसी संवर्गाला सामाजिक व शैक्षणिक आरक्षण मिळायला पाहिजे. एकसंघ भावनेने ओबीसींनी पुढे येत आपला आवाज दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचविला पाहिजे. आपला संघर्ष अबाधित ठेवा. फितुरी करू नका. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा कायम ठेवा असे सांगीतले. यावेळी दिवाकर गमे, बापूसाहेब भुजबळ, गायत्री इरले, ईश्वर बाळबुधे व राजेंद्र महाडोळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाला बोदरा देऊळगाव येथील माळी समाजबांधव तसेच परिसरातील जनता मोठ्या संख्येत उपस्थित होती.ओबीसींनी एकत्र आले पाहिजेयाप्रसंगी ना. भुजबळ यांनी, १९३१ मध्ये इंग्रज राजवटीत देशाची जनगणना झाली. त्यावेळी ओबीसींची लोकसंख्या ५४ टक्के होती. आता परत वाढली आहे. त्यावेळी ओबीसींची जनगणना होत होती मग मग आता का नाही? असे ते म्हणाले. ओबीसींची जनगणना करण्याचे आश्वासन तत्कालीन केंद्र सरकारने दिले होते. मात्र २०२१ च्या जनगणनेसाठी रकानाच उपलब्ध नाही. याविषयी त्यांनी खंत व्यक्त केली. आम्ही ओबीसी आहोत असं म्हणत ओबीसींनी एकत्र आले पाहिजे. ओबीसी प्रवर्गात समाविष्ट असलेल्या सर्व जातींनी संघर्ष केला पाहिजे. संघर्षानंतर मिळणाºया लाभातून जातीला नव्हे तर ओबीसी प्रवर्गाला सवलती मिळतील असे ते म्हणाले.

टॅग्स :Savitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेChhagan Bhujbalछगन भुजबळ