शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

फुले दाम्पत्याची समाजसेवा स्मरणीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 06:00 IST

अमेरिकेत निग्रोंच्या हक्कासाठी त्यांनी आशिया खंडातून पाठिंबा दिला. फुले दाम्पत्य स्वत:साठी नव्हे तर इतरांसाठी लढले. महात्मा फुले यांचे कर्तुत्व खूप मोठे आहे. त्यांनी आपले सर्व आयुष्य समाजसेवेसाठी वाहीले. पुण्यात प्लेगची साथ असताना सावित्रीबार्इंनी त्यात उडी घेऊन स्वत:चा जीव गमावला.

ठळक मुद्देछगन भुजबळ : महात्मा फुले पुतळा अनावरण व समाज मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : महात्मा फुले यांनी आपल्यासाठी अनेक कष्ट घेतले. देशाच्या अनेक राज्यात महात्मा फुले यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांचा १५०-२०० वर्षापूर्वीचा कार्यकाळ आहे. त्यावेळी अमेरिकेत निग्रोंच्या हक्कासाठी त्यांनी आशिया खंडातून पाठिंबा दिला. फुले दाम्पत्य स्वत:साठी नव्हे तर इतरांसाठी लढले. महात्मा फुले यांचे कर्तुत्व खूप मोठे आहे. त्यांनी आपले सर्व आयुष्य समाजसेवेसाठी वाहीले. पुण्यात प्लेगची साथ असताना सावित्रीबार्इंनी त्यात उडी घेऊन स्वत:चा जीव गमावला. फुले दाम्पत्याची समाजसेवा जगाच्या इतिहासात दुसरी असूच शकत नसन स्मरणीय आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच छगन भुजबळ यांनी केले.तालुक्यातील ग्राम बोदरा देऊळगाव येथील अखिल भारतीय माळी समाज शाखा, ओबीसी समाज संघटना व देऊळगाव बोदरा ग्रामवासीयांच्यावतीने रविवारी (दि.१) आयोजित महात्मा फुले यांच्या पुतळ््याच्या अनावरण व समाज मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय माळी महासंघ विदर्भ प्रांताध्यक्ष राजेंद्र महाडोळे होते. यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, अ. भा. फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस किशोर कन्हेरे, दिवाकर गमे, गायत्री इरले, ईश्वर बाळबुधे, गोंदिया जिल्हा माळी समाजाचे अध्यक्ष देविदास गुरनुले, विष्णू नागरीकर, राजेंद्र मांदाळे, माधुरी देशकर व प्रतिष्ठित मंडळी मंचावर उपस्थित होती.पुढे बोलताना ना. भुजबळ यांनी, महात्मा फुले यांची दूरदृष्टी किती मोठी होती ती अनेक उदाहरणांवरून लक्षात येते. त्यांनी दलितांना जवळ केल. सावित्रीबार्इंनी महिलांना शिक्षणाचे दालन उपलब्ध करून दिले. फुले यांनी खडकवासला येथे धरण बांधल. कात्रजचा बोगदा त्यांनी तयार केला. त्यांनी शेती करून हंगामात तीन-तीन पिके घेतली. पाझर तलावाची संकल्पना त्यांची आहे. मात्र त्यावेळी झिरपे तलाव हे नाव दिल होत. त्यांनी ‘शेतकऱ्यांचा आसूड’ व ‘गुलामगिरी’ ही पुस्तके लिहिली. या पुस्तकांचे सामूहिक पठण झाले पाहिजे. या पठणामुळे शेतकरी आत्महत्या करणार नाही. शेतकरी कसा नागवला जातो याचं ज्वलंत वर्णन या पुस्तकात आहे. भारतरत्न पुरस्कार यावरून सध्या आकाडतांडव सुरू आहे. गांधी हे महात्मा आहेत. फुले हे महात्मा आहेत. त्यांचे स्थान आपल्या हृदयात आहे मग भारतरत्न कशाला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.आ. चंद्रिकापुरे यांनी, ओबीसी संवर्गाला सामाजिक व शैक्षणिक आरक्षण मिळायला पाहिजे. एकसंघ भावनेने ओबीसींनी पुढे येत आपला आवाज दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचविला पाहिजे. आपला संघर्ष अबाधित ठेवा. फितुरी करू नका. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा कायम ठेवा असे सांगीतले. यावेळी दिवाकर गमे, बापूसाहेब भुजबळ, गायत्री इरले, ईश्वर बाळबुधे व राजेंद्र महाडोळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाला बोदरा देऊळगाव येथील माळी समाजबांधव तसेच परिसरातील जनता मोठ्या संख्येत उपस्थित होती.ओबीसींनी एकत्र आले पाहिजेयाप्रसंगी ना. भुजबळ यांनी, १९३१ मध्ये इंग्रज राजवटीत देशाची जनगणना झाली. त्यावेळी ओबीसींची लोकसंख्या ५४ टक्के होती. आता परत वाढली आहे. त्यावेळी ओबीसींची जनगणना होत होती मग मग आता का नाही? असे ते म्हणाले. ओबीसींची जनगणना करण्याचे आश्वासन तत्कालीन केंद्र सरकारने दिले होते. मात्र २०२१ च्या जनगणनेसाठी रकानाच उपलब्ध नाही. याविषयी त्यांनी खंत व्यक्त केली. आम्ही ओबीसी आहोत असं म्हणत ओबीसींनी एकत्र आले पाहिजे. ओबीसी प्रवर्गात समाविष्ट असलेल्या सर्व जातींनी संघर्ष केला पाहिजे. संघर्षानंतर मिळणाºया लाभातून जातीला नव्हे तर ओबीसी प्रवर्गाला सवलती मिळतील असे ते म्हणाले.

टॅग्स :Savitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेChhagan Bhujbalछगन भुजबळ