शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
3
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
4
अफगाणिस्तानात भूकेने हाहाकार; अर्धी जनता अन्नाविना, मदतीचा ओघही आटला! नेमकं काय झालं?
5
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
6
Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
7
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
8
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
9
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
10
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
11
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
12
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
13
इतिहास विसरू नका... तुमचा जन्म आमच्यामुळे
14
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
15
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
16
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
17
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
18
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
19
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
20
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
Daily Top 2Weekly Top 5

फुले दाम्पत्याची समाजसेवा स्मरणीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 06:00 IST

अमेरिकेत निग्रोंच्या हक्कासाठी त्यांनी आशिया खंडातून पाठिंबा दिला. फुले दाम्पत्य स्वत:साठी नव्हे तर इतरांसाठी लढले. महात्मा फुले यांचे कर्तुत्व खूप मोठे आहे. त्यांनी आपले सर्व आयुष्य समाजसेवेसाठी वाहीले. पुण्यात प्लेगची साथ असताना सावित्रीबार्इंनी त्यात उडी घेऊन स्वत:चा जीव गमावला.

ठळक मुद्देछगन भुजबळ : महात्मा फुले पुतळा अनावरण व समाज मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : महात्मा फुले यांनी आपल्यासाठी अनेक कष्ट घेतले. देशाच्या अनेक राज्यात महात्मा फुले यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांचा १५०-२०० वर्षापूर्वीचा कार्यकाळ आहे. त्यावेळी अमेरिकेत निग्रोंच्या हक्कासाठी त्यांनी आशिया खंडातून पाठिंबा दिला. फुले दाम्पत्य स्वत:साठी नव्हे तर इतरांसाठी लढले. महात्मा फुले यांचे कर्तुत्व खूप मोठे आहे. त्यांनी आपले सर्व आयुष्य समाजसेवेसाठी वाहीले. पुण्यात प्लेगची साथ असताना सावित्रीबार्इंनी त्यात उडी घेऊन स्वत:चा जीव गमावला. फुले दाम्पत्याची समाजसेवा जगाच्या इतिहासात दुसरी असूच शकत नसन स्मरणीय आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच छगन भुजबळ यांनी केले.तालुक्यातील ग्राम बोदरा देऊळगाव येथील अखिल भारतीय माळी समाज शाखा, ओबीसी समाज संघटना व देऊळगाव बोदरा ग्रामवासीयांच्यावतीने रविवारी (दि.१) आयोजित महात्मा फुले यांच्या पुतळ््याच्या अनावरण व समाज मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय माळी महासंघ विदर्भ प्रांताध्यक्ष राजेंद्र महाडोळे होते. यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, अ. भा. फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस किशोर कन्हेरे, दिवाकर गमे, गायत्री इरले, ईश्वर बाळबुधे, गोंदिया जिल्हा माळी समाजाचे अध्यक्ष देविदास गुरनुले, विष्णू नागरीकर, राजेंद्र मांदाळे, माधुरी देशकर व प्रतिष्ठित मंडळी मंचावर उपस्थित होती.पुढे बोलताना ना. भुजबळ यांनी, महात्मा फुले यांची दूरदृष्टी किती मोठी होती ती अनेक उदाहरणांवरून लक्षात येते. त्यांनी दलितांना जवळ केल. सावित्रीबार्इंनी महिलांना शिक्षणाचे दालन उपलब्ध करून दिले. फुले यांनी खडकवासला येथे धरण बांधल. कात्रजचा बोगदा त्यांनी तयार केला. त्यांनी शेती करून हंगामात तीन-तीन पिके घेतली. पाझर तलावाची संकल्पना त्यांची आहे. मात्र त्यावेळी झिरपे तलाव हे नाव दिल होत. त्यांनी ‘शेतकऱ्यांचा आसूड’ व ‘गुलामगिरी’ ही पुस्तके लिहिली. या पुस्तकांचे सामूहिक पठण झाले पाहिजे. या पठणामुळे शेतकरी आत्महत्या करणार नाही. शेतकरी कसा नागवला जातो याचं ज्वलंत वर्णन या पुस्तकात आहे. भारतरत्न पुरस्कार यावरून सध्या आकाडतांडव सुरू आहे. गांधी हे महात्मा आहेत. फुले हे महात्मा आहेत. त्यांचे स्थान आपल्या हृदयात आहे मग भारतरत्न कशाला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.आ. चंद्रिकापुरे यांनी, ओबीसी संवर्गाला सामाजिक व शैक्षणिक आरक्षण मिळायला पाहिजे. एकसंघ भावनेने ओबीसींनी पुढे येत आपला आवाज दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचविला पाहिजे. आपला संघर्ष अबाधित ठेवा. फितुरी करू नका. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा कायम ठेवा असे सांगीतले. यावेळी दिवाकर गमे, बापूसाहेब भुजबळ, गायत्री इरले, ईश्वर बाळबुधे व राजेंद्र महाडोळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाला बोदरा देऊळगाव येथील माळी समाजबांधव तसेच परिसरातील जनता मोठ्या संख्येत उपस्थित होती.ओबीसींनी एकत्र आले पाहिजेयाप्रसंगी ना. भुजबळ यांनी, १९३१ मध्ये इंग्रज राजवटीत देशाची जनगणना झाली. त्यावेळी ओबीसींची लोकसंख्या ५४ टक्के होती. आता परत वाढली आहे. त्यावेळी ओबीसींची जनगणना होत होती मग मग आता का नाही? असे ते म्हणाले. ओबीसींची जनगणना करण्याचे आश्वासन तत्कालीन केंद्र सरकारने दिले होते. मात्र २०२१ च्या जनगणनेसाठी रकानाच उपलब्ध नाही. याविषयी त्यांनी खंत व्यक्त केली. आम्ही ओबीसी आहोत असं म्हणत ओबीसींनी एकत्र आले पाहिजे. ओबीसी प्रवर्गात समाविष्ट असलेल्या सर्व जातींनी संघर्ष केला पाहिजे. संघर्षानंतर मिळणाºया लाभातून जातीला नव्हे तर ओबीसी प्रवर्गाला सवलती मिळतील असे ते म्हणाले.

टॅग्स :Savitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेChhagan Bhujbalछगन भुजबळ