शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
6
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
7
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
8
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
9
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
10
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
11
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
12
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
13
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
14
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
15
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
16
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
17
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
18
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
19
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
20
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?

फुले दाम्पत्याची समाजसेवा स्मरणीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 06:00 IST

अमेरिकेत निग्रोंच्या हक्कासाठी त्यांनी आशिया खंडातून पाठिंबा दिला. फुले दाम्पत्य स्वत:साठी नव्हे तर इतरांसाठी लढले. महात्मा फुले यांचे कर्तुत्व खूप मोठे आहे. त्यांनी आपले सर्व आयुष्य समाजसेवेसाठी वाहीले. पुण्यात प्लेगची साथ असताना सावित्रीबार्इंनी त्यात उडी घेऊन स्वत:चा जीव गमावला.

ठळक मुद्देछगन भुजबळ : महात्मा फुले पुतळा अनावरण व समाज मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : महात्मा फुले यांनी आपल्यासाठी अनेक कष्ट घेतले. देशाच्या अनेक राज्यात महात्मा फुले यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांचा १५०-२०० वर्षापूर्वीचा कार्यकाळ आहे. त्यावेळी अमेरिकेत निग्रोंच्या हक्कासाठी त्यांनी आशिया खंडातून पाठिंबा दिला. फुले दाम्पत्य स्वत:साठी नव्हे तर इतरांसाठी लढले. महात्मा फुले यांचे कर्तुत्व खूप मोठे आहे. त्यांनी आपले सर्व आयुष्य समाजसेवेसाठी वाहीले. पुण्यात प्लेगची साथ असताना सावित्रीबार्इंनी त्यात उडी घेऊन स्वत:चा जीव गमावला. फुले दाम्पत्याची समाजसेवा जगाच्या इतिहासात दुसरी असूच शकत नसन स्मरणीय आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच छगन भुजबळ यांनी केले.तालुक्यातील ग्राम बोदरा देऊळगाव येथील अखिल भारतीय माळी समाज शाखा, ओबीसी समाज संघटना व देऊळगाव बोदरा ग्रामवासीयांच्यावतीने रविवारी (दि.१) आयोजित महात्मा फुले यांच्या पुतळ््याच्या अनावरण व समाज मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय माळी महासंघ विदर्भ प्रांताध्यक्ष राजेंद्र महाडोळे होते. यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, अ. भा. फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस किशोर कन्हेरे, दिवाकर गमे, गायत्री इरले, ईश्वर बाळबुधे, गोंदिया जिल्हा माळी समाजाचे अध्यक्ष देविदास गुरनुले, विष्णू नागरीकर, राजेंद्र मांदाळे, माधुरी देशकर व प्रतिष्ठित मंडळी मंचावर उपस्थित होती.पुढे बोलताना ना. भुजबळ यांनी, महात्मा फुले यांची दूरदृष्टी किती मोठी होती ती अनेक उदाहरणांवरून लक्षात येते. त्यांनी दलितांना जवळ केल. सावित्रीबार्इंनी महिलांना शिक्षणाचे दालन उपलब्ध करून दिले. फुले यांनी खडकवासला येथे धरण बांधल. कात्रजचा बोगदा त्यांनी तयार केला. त्यांनी शेती करून हंगामात तीन-तीन पिके घेतली. पाझर तलावाची संकल्पना त्यांची आहे. मात्र त्यावेळी झिरपे तलाव हे नाव दिल होत. त्यांनी ‘शेतकऱ्यांचा आसूड’ व ‘गुलामगिरी’ ही पुस्तके लिहिली. या पुस्तकांचे सामूहिक पठण झाले पाहिजे. या पठणामुळे शेतकरी आत्महत्या करणार नाही. शेतकरी कसा नागवला जातो याचं ज्वलंत वर्णन या पुस्तकात आहे. भारतरत्न पुरस्कार यावरून सध्या आकाडतांडव सुरू आहे. गांधी हे महात्मा आहेत. फुले हे महात्मा आहेत. त्यांचे स्थान आपल्या हृदयात आहे मग भारतरत्न कशाला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.आ. चंद्रिकापुरे यांनी, ओबीसी संवर्गाला सामाजिक व शैक्षणिक आरक्षण मिळायला पाहिजे. एकसंघ भावनेने ओबीसींनी पुढे येत आपला आवाज दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचविला पाहिजे. आपला संघर्ष अबाधित ठेवा. फितुरी करू नका. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा कायम ठेवा असे सांगीतले. यावेळी दिवाकर गमे, बापूसाहेब भुजबळ, गायत्री इरले, ईश्वर बाळबुधे व राजेंद्र महाडोळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाला बोदरा देऊळगाव येथील माळी समाजबांधव तसेच परिसरातील जनता मोठ्या संख्येत उपस्थित होती.ओबीसींनी एकत्र आले पाहिजेयाप्रसंगी ना. भुजबळ यांनी, १९३१ मध्ये इंग्रज राजवटीत देशाची जनगणना झाली. त्यावेळी ओबीसींची लोकसंख्या ५४ टक्के होती. आता परत वाढली आहे. त्यावेळी ओबीसींची जनगणना होत होती मग मग आता का नाही? असे ते म्हणाले. ओबीसींची जनगणना करण्याचे आश्वासन तत्कालीन केंद्र सरकारने दिले होते. मात्र २०२१ च्या जनगणनेसाठी रकानाच उपलब्ध नाही. याविषयी त्यांनी खंत व्यक्त केली. आम्ही ओबीसी आहोत असं म्हणत ओबीसींनी एकत्र आले पाहिजे. ओबीसी प्रवर्गात समाविष्ट असलेल्या सर्व जातींनी संघर्ष केला पाहिजे. संघर्षानंतर मिळणाºया लाभातून जातीला नव्हे तर ओबीसी प्रवर्गाला सवलती मिळतील असे ते म्हणाले.

टॅग्स :Savitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेChhagan Bhujbalछगन भुजबळ