शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

अनेकांवर निवडणुकीपासून वंचित राहण्याची पाळी

By admin | Updated: May 8, 2015 00:59 IST

गाव पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंतच्या निवडणुकीसाठी राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या

बोंडगावदेवी : गाव पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंतच्या निवडणुकीसाठी राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे शक्तीचे करण्यात आले आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी आवश्यक कागजपत्रांची जुळवाजुळव करून प्रस्ताव तहसील कार्यालयात सादर केल्यानंतरही दोन वर्षाचा कालावधी लोटून जावून सुध्दा अजूनपावेतो सबंधित अर्जदारांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळालेच नाही अशी तालुक्यात सर्वत्र ओरड आहे. अर्जुनी-मोरगाव तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागामधील सबंधित लिपीकाकडे जात पडताळणी प्रमाणपत्रांचे काम सोपविले असल्याचे समजते. तालुक्यात गेल्या दोन-तीन वर्षापूर्वी काही ग्राम पंचायतीच्या निवडणुका पार पाडल्या. ग्रामपंचायतच्या निवडणुकीतील राखीव प्रभागातून उमेदवारी भरणाऱ्या इच्छुकांनी सर्व आवश्यक त्या कागदपत्रांची जुळवाजुळव करून अर्जानिशी जात पडताळणी प्रमाणपत्राची फाईल तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागातील सबंधीत लिपीकाकडे दोन वर्षापूर्वीच सादर केल्या. जात पडताळणी प्रस्ताव सादर करणाऱ्या अर्जदारापैकी काही जन निवडुणकीमध्ये निवडून सुध्दा आले. अर्धा कालावधी संपत आला. परंतु जात पडताळणी प्रमाणपत्र मात्र अजून त्या अर्जदाराच्या हाती मिळालाच नाही, अशी ओरड तालुक्यात सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत ज्या उमेदवारांनी राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवून निवडून आले. त्यांना सुध्दा अजून पावेतो जात पडताळणी प्रमाणपत्र मिळालेच नाही. तहसील कार्यालयातील सबंधीत लिपीक उडवा-उडवीचे उत्तर देऊन वेळ मारुन नेत असल्याची कैफीयत प्रस्ताव सादर करणाऱ्यांनी मांडली. दोन वर्षापूर्वी सादर केलेले जात पडताळणी प्रमाणपत्राचे प्रस्ताव संबधीत लिपीकाच्या कपाटामध्ये धूळखात पडून असल्याचे बोलल्या जात आहे. प्रस्ताव सादर करून दोन वर्षाचा कालावधी लोटून सुध्दा अर्जदाराच्या जात पडताळणी प्रस्तावाला गती येत नाही. त्या प्रस्तावाकडे सबंधीत विभाग ढूंकून सुध्दा पाहत नाही. याला सर्वस्वी जबाबदार संबधीत विभागाला धरण्यात यावी अशी मागणी अर्जदार करित आहेत. सर्व कागदपत्राची पूर्तता करून सुध्दा जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेच्या आत मिळत नसल्याने, अनेकांना निवडणुकीत उभे राहण्यापासून वंचित राहावे लागत आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्यामुळे आजही तालुक्यातील ग्रामपंचायतच्या काही राखीव जागा रिक्त असल्याचे समजते. येत्या काही दिवसात पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. सदर निवडणुकीसाठी राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्र नामांकन अर्ज भरतानी सादर करणे आवश्यक राहणार आहे.