शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ही शेवटची भेट असल्याचे सांगत मनिषाने केले मृत्यूला जवळ

By admin | Updated: August 28, 2014 23:54 IST

अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील येरंडी/देवलगाव येथील विवाहित महिला मनिषा अरविंद गेडाम (२५) हिला माहेरून पैसे आणण्यासाठी तिच्या सासरच्या मंडळीकडून वारंवार शारीरिक व मानसिक

हुंडाबळी : पती, सासू, सासरा व नणद यांना अटकबोंडगावदेवी : अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील येरंडी/देवलगाव येथील विवाहित महिला मनिषा अरविंद गेडाम (२५) हिला माहेरून पैसे आणण्यासाठी तिच्या सासरच्या मंडळीकडून वारंवार शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता. या कटकटीला कंटाळून तिने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. अखेर नवेगावबांध पोलिसांनी २५ आॅगस्ट रोजी मनिषाचा पती, सासू, सासरा व नणद यांना अटक केली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बोंडगावदेवी येथील खुशाल ठवरे यांची मुलगी मनिषा हिचे लग्न येरंडी/देवलगाव येथील अरविंद सदाराम गेडाम (३५) याच्यासोबत जानेवारी २०१० मध्ये जातीरिवाजानुसार झाले होते. लग्न झाल्यापासून एक वर्षापर्यंत सासरच्या मंडळीकडून तिला चांगली वागणूक मिळाली होती. मात्र केवळ बारा महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर मनिषाचा पती अरविंद, सासरा सदाराम, सासू पंचशीला तसेच खांबी येथे राहणारी नणद ही येरंडीला वारंवार येत होती. त्या सर्वांनी संगनमत करून मनिषाला माहेरून ३० हजार रूपये आण, असे बोलून मानसिक व शारीरिक त्रास सुरू केला होता. वारंवार मारहाण करून तिला जेवणसुद्धा करू देत नसत. सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या या त्रासाची तसेच हुंड्यासाठी करण्यात येणाऱ्या छळाची माहिती मनिषाने आपले आई-वडील व भावाला दिली होती. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने सासरकडील मागणी तिचे आई-वडील पूर्ण करू शकत नव्हते. मुलीच्या घरच्या लोकांच्या वागण्यात सुधारणा होवून मनिषाला ते चांगली वागणूक देतील, अशी समजूत घालून मुलीला सासरी पाठवित होते. काही दिवस लोटल्यानंतर घटनेच्या दोन वर्षांपूर्वी माहेरून ३० हजार रूपये आण, अशी दमदाटी ्रकरून त्यांना मनिषाला तिच्या माहेरी बोंडगावदेवी येथे पाठविले होते. तेव्हापासून ती आपल्या मुलासोबत येथे होती. त्यावेळीसुद्धा मनिषाने आपल्या आई-वडील व भावाजवळ हुंड्यासाठी नेहमी मारझोड करून सासरचे लोक छळ करीत असल्याचे तिने सांगितले होते. दोन दिवसांनी मनिषाचा पती अरविंद हा बोंडगावदेवी येथे येवून जोरजबरदस्तीने मुलाला घेवून गेला. नंतर मनिषाचा सासरा सदराम आला व त्याने मुलगा तुझ्याशिवाय राहूच शकत नाही, असे सांगून तिला घेवून गेला. गावाजवळच राहत असलेली नणद रंजना रामटेके ही वारंवार येरंडी येथे येवून आपल्या आई-वडील, भाऊ व मनिषासोबत वारंवार भांडायची. १२ आॅगस्ट २०१४ रोजी मनिषा राखी बांधण्यासाठी माहेरी आली. त्यावेळीसुद्धा तिने हुंड्यासाठी पती, सासू व सासरा मारझोड करीत असल्याचे आई-वडील व भावाला सांगितले होते. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने पैसे देवू शकत नाही, असे मनिषाला तिच्या आई-वडिलांनी समजावून सांगितले. त्यामुळे १४ आॅगस्ट रोजी सासरी जाताना ‘ही शेवटची भेट आहे, यापुढे मी तुमच्या डोळ्याने दिसणार नाही,’ अशी मनिषा बोलली होती. १७ आॅगस्ट रोजी मनिषाने उंदिर मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती असलेल्या मनिषाला तिच्या आई-वडिलांनी विचारले असता तिने तिचा पती अरविंद, सासरा सदाराम, सासू पंचशीला व ननद रंजना रामटेके यांच्याकडून हुंड्यासाठी होणाऱ्या छळ व माराला त्रासून उंदिर मारण्याचे विषारी औषध प्राशन केल्याचे सांगितले. अखेर मनिषाने १९ आॅगस्टच्या रात्री ८.४५ वाजता जीव सोडून आपली इहलोकीची यात्रा संपविली. नवेगावबांध पोलिसांनी पती अरविंद, सासरा सदाराम, सासू पंचशीला, ननद रंजना रामटेके यांना अटक केली. तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (वार्ताहर)