शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

तेंदूपत्ता तोडणाऱ्या मजुरांना हिवतापाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 20:56 IST

तेंदूपत्ता तोडण्यासाठी इतर राज्यांमध्ये गेलेल्या मजुरांवर आता जिल्हा मलेरिया विभागाची नजर लागून आहे. या मजुरांचा परतीचा प्रवास आता सुरू आहे. हे मजूर आपल्यासह मलेरियाचा आजार तर घेवून येणार नाही, याची चिंता विभागाला सतावत आहे.

ठळक मुद्देदोन महिन्यांत १६ पॉझिटिव्ह : १९० दिवसांचा मलेरिया निर्मूलन कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तेंदूपत्ता तोडण्यासाठी इतर राज्यांमध्ये गेलेल्या मजुरांवर आता जिल्हा मलेरिया विभागाची नजर लागून आहे. या मजुरांचा परतीचा प्रवास आता सुरू आहे. हे मजूर आपल्यासह मलेरियाचा आजार तर घेवून येणार नाही, याची चिंता विभागाला सतावत आहे.दरवर्षी जिल्ह्यातील मजूर तेंदूपत्ता तोडण्यासाठी मध्य प्रदेश, छत्तीसगड व इतर राज्यांमध्ये जातात व तेथे ते जंगलातच राहतात. या दरम्यान डासांनी चावा घेतल्यामुळे त्यांना मलेरिया होत आहे. ते जेव्हा स्वगृही परततात तेव्हा ते मलेरियाचे रूग्ण असतात. परंतु याची माहिती त्यांना राहत नाही. त्यांचे शरीर तापलेले असते.ज्यांचा वेळेवर उपचार होतो ते या आजारातून वाचतात. एकदा तर गोंदिया जिल्ह्यात केवळ एका वर्षात मलेरियामुळे १४ जणांचा मृत्यू झाला होता. परंतु आता प्रयत्नातील सातत्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले आहे. मागील वर्षी जिल्ह्यात मलेरियाच्या आजाराने एकाचाही मृत्यू झाला नाही.तेंदूपत्ता मजूर केवळ बाहेरील राज्यातच जात नाही तर जिल्ह्यातसुद्धा हजारो तेंदूपत्ता मजुरांना काम मिळत आहे. हे काम उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेत होते.त्यावेळी नाल्यांमध्ये पाणी वाहते राहत नाही. त्यामुळे शहरांमध्ये डासांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे मेलेरिया आजाराचा प्रभावही दिसून येत नाही. परंतु जे मजूर तेंदूपत्ता तोडण्यासाठी जातात, ते जंगलात राहतात. तेथेच भोजन करतात व झोपतात. जंगलात वृक्षांवरून पाने पडण्याची एक प्रक्रिया सुरू असते. या पडलेल्या वाळल्या पानांमध्ये डासांचा प्रादुर्भाव होतो व डासांनी चावल्यामुळे मजुरांना मलेरिया होत आहे.१९० गावांमध्ये फवारणी कार्यक्रमजिल्हा हिवताप विभागाच्यावतीने या मजुरांच्या परतीच्या प्रवासाची वेळ बघता कीटनाशक फवारणी कार्यक्रम ११ जूनपासून सुरू करण्यात आला आहे. हा कार्यक्रम १९० गावांमध्ये सुरू आहे व ११ आॅगस्टपर्यंत चालणार आहे. यात प्रामुख्याने आदिवासी गावांचा समावेश आहे. तसेच काही बिगर आदिवासी गावांचा समावेश आहे. तेंदूपत्ता तोडण्याच्या कामावरून परतलेल्या मजुरांना मलेरियाचे औषध कोणत्याही स्थितीत उपलब्ध व्हावे, या बाबीकडे सर्वेक्षणात विशेष लक्ष दिले जात आहे.जून महिन्यात ९ पॉझिटिव्हमे २०१८ मध्ये जिल्ह्यात केवळ ७ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. परंतु जून महिन्यात आतापर्यंत ९ मलेरिया बाधित आढळले आहेत. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने फाईलेरिया, डेंग्यू व मलेरिया आजारांच्या जनजागृतीसाठी प्रशिक्षण दिले जात आहे. त्या अंतर्गत डिजिटल बॅनर व पोस्टर्सचे वितरण प्राथमिक आरोग्य केंद्रांत करण्यात आले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यforestजंगल