शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

तेंदूपत्ता तोडणाऱ्या मजुरांना हिवतापाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 20:56 IST

तेंदूपत्ता तोडण्यासाठी इतर राज्यांमध्ये गेलेल्या मजुरांवर आता जिल्हा मलेरिया विभागाची नजर लागून आहे. या मजुरांचा परतीचा प्रवास आता सुरू आहे. हे मजूर आपल्यासह मलेरियाचा आजार तर घेवून येणार नाही, याची चिंता विभागाला सतावत आहे.

ठळक मुद्देदोन महिन्यांत १६ पॉझिटिव्ह : १९० दिवसांचा मलेरिया निर्मूलन कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तेंदूपत्ता तोडण्यासाठी इतर राज्यांमध्ये गेलेल्या मजुरांवर आता जिल्हा मलेरिया विभागाची नजर लागून आहे. या मजुरांचा परतीचा प्रवास आता सुरू आहे. हे मजूर आपल्यासह मलेरियाचा आजार तर घेवून येणार नाही, याची चिंता विभागाला सतावत आहे.दरवर्षी जिल्ह्यातील मजूर तेंदूपत्ता तोडण्यासाठी मध्य प्रदेश, छत्तीसगड व इतर राज्यांमध्ये जातात व तेथे ते जंगलातच राहतात. या दरम्यान डासांनी चावा घेतल्यामुळे त्यांना मलेरिया होत आहे. ते जेव्हा स्वगृही परततात तेव्हा ते मलेरियाचे रूग्ण असतात. परंतु याची माहिती त्यांना राहत नाही. त्यांचे शरीर तापलेले असते.ज्यांचा वेळेवर उपचार होतो ते या आजारातून वाचतात. एकदा तर गोंदिया जिल्ह्यात केवळ एका वर्षात मलेरियामुळे १४ जणांचा मृत्यू झाला होता. परंतु आता प्रयत्नातील सातत्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले आहे. मागील वर्षी जिल्ह्यात मलेरियाच्या आजाराने एकाचाही मृत्यू झाला नाही.तेंदूपत्ता मजूर केवळ बाहेरील राज्यातच जात नाही तर जिल्ह्यातसुद्धा हजारो तेंदूपत्ता मजुरांना काम मिळत आहे. हे काम उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेत होते.त्यावेळी नाल्यांमध्ये पाणी वाहते राहत नाही. त्यामुळे शहरांमध्ये डासांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे मेलेरिया आजाराचा प्रभावही दिसून येत नाही. परंतु जे मजूर तेंदूपत्ता तोडण्यासाठी जातात, ते जंगलात राहतात. तेथेच भोजन करतात व झोपतात. जंगलात वृक्षांवरून पाने पडण्याची एक प्रक्रिया सुरू असते. या पडलेल्या वाळल्या पानांमध्ये डासांचा प्रादुर्भाव होतो व डासांनी चावल्यामुळे मजुरांना मलेरिया होत आहे.१९० गावांमध्ये फवारणी कार्यक्रमजिल्हा हिवताप विभागाच्यावतीने या मजुरांच्या परतीच्या प्रवासाची वेळ बघता कीटनाशक फवारणी कार्यक्रम ११ जूनपासून सुरू करण्यात आला आहे. हा कार्यक्रम १९० गावांमध्ये सुरू आहे व ११ आॅगस्टपर्यंत चालणार आहे. यात प्रामुख्याने आदिवासी गावांचा समावेश आहे. तसेच काही बिगर आदिवासी गावांचा समावेश आहे. तेंदूपत्ता तोडण्याच्या कामावरून परतलेल्या मजुरांना मलेरियाचे औषध कोणत्याही स्थितीत उपलब्ध व्हावे, या बाबीकडे सर्वेक्षणात विशेष लक्ष दिले जात आहे.जून महिन्यात ९ पॉझिटिव्हमे २०१८ मध्ये जिल्ह्यात केवळ ७ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. परंतु जून महिन्यात आतापर्यंत ९ मलेरिया बाधित आढळले आहेत. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने फाईलेरिया, डेंग्यू व मलेरिया आजारांच्या जनजागृतीसाठी प्रशिक्षण दिले जात आहे. त्या अंतर्गत डिजिटल बॅनर व पोस्टर्सचे वितरण प्राथमिक आरोग्य केंद्रांत करण्यात आले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यforestजंगल