शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

एकही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही याची काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 05:00 IST

जिल्ह्यात २६ ते २९ ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होवून याचा फटका गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील ३० गावांना बसला. शनिवारी (दि.५) खा.प्रफुल्ल पटेल यांनी तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील पूर बाधित गावांची पाहणी करुन तेथील गावकºयांशी संवाद साधला. पुरामुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जात पुरामुळे नुकसान झालेल्या धान पिकांची पाहणी केली.

ठळक मुद्दे प्रफुल्ल पटेल । पूरबाधित भागाची केली पाहणी,अधिकाऱ्यांकडून घेतली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. तर हजारो हेक्टरमधील धान पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. पूर बाधितांना शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली आहे. नुकसान भरपाईपासून एकही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही याची काळजी घेत वस्तूनिष्ठ आणि कुठलाही भेदभाव न करता सर्वेक्षण करुन मदत द्यावी असे निर्देश खा.प्रफुल्ल पटेल यांनी महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.जिल्ह्यात २६ ते २९ ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होवून याचा फटका गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील ३० गावांना बसला. शनिवारी (दि.५) खा.प्रफुल्ल पटेल यांनी तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील पूर बाधित गावांची पाहणी करुन तेथील गावकºयांशी संवाद साधला. पुरामुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जात पुरामुळे नुकसान झालेल्या धान पिकांची पाहणी केली. तसेच उपस्थित महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना नुकसानीचे योग्य सर्वेक्षण करुन एकही पूर बाधित व्यक्ती शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले.तसेच नुकसानग्रस्तांच्या याद्या तयार झाल्यानंतर त्यातून गावातील कोणत्या व्यक्तीचे नाव सुटू नये यासाठी या नुकसानग्रस्तांच्या याद्यांचे तलाठी, ग्रामसेवक आणि मुख्याध्यापकांनी चावडी वाचन करावे. त्यामुळे एकही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही.पुरामुळे ज्यांच्या घरांची पूर्णपणे पडझड झाली आहे. त्यांना पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरकुल देण्यात यावे. याचे प्रस्ताव त्वरीत तयार करुन पंचायत समितीकडे पाठविण्यात यावे. ज्यांच्या घरांची अशंता पडझड झाली आहेआणि ज्यांच्या घरात पुराचे पाणी साचल्याने नुकसान झाले. त्यांना खावटी मदत आणि नुकसान भरपाई त्वरीत देण्यास संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. द्रारिद्रय रेषेखालील आणि निराधार कुटुंबांना सुध्दा शासनाच्या निकषानुसार त्वरीत मदत देण्याचे निर्देश त्यांनी तहसीलदारांना दिले. या वेळी त्यांनी मुरदाडा, महालगाव, लोधीटोला,धापेवाडा, किन्ही गावांना भेट देवून नुकसानीची पाहणी केली. यंत्रणेला युध्द पातळीवर पंचनामे पूर्ण करुन त्वरीत मदत देण्यास सांगितले. या वेळी त्यांच्यासोबत माजी आ.राजेंद्र जैन, माजी खा.खुशाल बोपचे, रॉष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन, राजलक्ष्मी तुरकर, विनोद हरिणखेडे, घनश्याम मस्करे, कुंदन कटारे, बालकृष्ण पटले, देवेंद्रनाथ चौबे, राजू एन. जैन, जितेश टेंभरे, कल्लू मस्करे, प्रदीप रोकडे, निरज उपवंशी, महेंद्र बघेले, गोविंद तुरकर, सुनील पटले, रवि कावरे, जितेंद्र मेश्राम उपस्थित होते.

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेल