शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

Maharashtra Election 2019 ; विक्रमासाठी विद्यार्थ्यांना धरले वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 06:00 IST

गावोगावी विद्यार्थी, नागरीक, बचतगटांच्या महीला व गावकरी सहभागी झाले होते. या मोहीमेत सर्वच शाळांच्या जवळपास २९ हजार विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेण्यात आले. सकाळी ७.३० वाजपासून हे विद्यार्थी रस्त्याच्या कडेला श्रृंखला तयार करुन उभे होते. विद्यार्थ्यांना कुठला त्रास होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. मात्र या कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले.

ठळक मुद्देशिक्षकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : पालकांमध्ये रोष,चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा, मतदार जागृतीसाठी मानवी श्रृंखला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक विभाग आणि जिल्हा प्रशासनातर्फे विविध जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत. याच अंतर्गत जिल्हा प्रशासनाने बुधवारी (दि.१६) गोंदिया ते काटी विद्यार्थ्यांची मानवी श्रृखंला तयार करुन मतदार जागृती करुन विक्रम स्थापन करण्याचा प्रयत्न केला.मात्र या मानवी श्रृंखलेत सहभागी विद्यार्थ्यांना सकाळी ७.३० वाजतापासून रस्त्यावर उभे करण्यात आले. जवळपास दीड तास विद्यार्थ्यांसाठी ना पाण्याची ना बिस्कीटची सोय केली होती.त्यामुळे विक्रमासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याच्या प्रकाराबाबत शिक्षकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकाºयांनी याची दखल घेत पाणी आणि बिस्कीटची सोय करुन दिली. मात्र या प्रकाराबद्दल पालक आणि शिक्षकांनी रोष व्यक्त केल्याने चांगल्या उपक्रमाला गालबोट लागले.येत्या २१ ऑक्टोबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी मतदार जागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रम व नाविण्यपूर्ण कार्यक्र माचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून बुधवारी गोंदिया येथील पतंगा मैदानापासून ते काटी या गावापर्यंत मानवी श्रृंखला तयार करण्यात आली.ही मानवी श्रृंखला जवळपास २९ कि.मी. अंतराची होती. यामध्ये गावोगावी विद्यार्थी, नागरीक, बचतगटांच्या महीला व गावकरी सहभागी झाले होते.या मोहीमेत सर्वच शाळांच्या जवळपास २९ हजार विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेण्यात आले. सकाळी ७.३० वाजपासून हे विद्यार्थी रस्त्याच्या कडेला श्रृंखला तयार करुन उभे होते. विद्यार्थ्यांना कुठला त्रास होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. मात्र या कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले.विद्यार्थ्यांसाठी पाणी आणि साधी बिस्कीटाची सुध्दा सोय केली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना उपाशीच दीड तास उभे राहावे लागले.दरम्यान या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी याची जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांच्याकडे तक्रार केली.विद्यार्थ्यांना काही कमी जास्त झाल्यास याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेत जवाबदारी सोपविलेल्या कर्मचाऱ्यांना चांगलेच फटकारले.तसेच चार ते पाच कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून २४ तासात उत्तर देण्यास सांगितले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरीत पाणी आणि बिस्कीटाची विद्यार्थ्यांची सोय करुन दिली. मात्र हा प्रकार पालकांना कळल्यानंतर विक्रमासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.२९ कि.मी.ची मानवी श्रृंखलागोंदिया येथील पतंगा मैदान येथून सुरु झालेली मानवी श्रृंखला फुलचुर नाका, मनोहर चौक, जयस्तंभ चौक, नेहरु चौक, कालेखॉ चौक, पाल चौक, नमाद महाविद्यालय, कुडवा नाका, गुंडीटोला,जब्बारटोला, पांढराबोडी, लईटोला, गिरोला, सतीबोडी, निलज, दासगाव, तेढवा, मरारटोला ते काटी अशी २९ कि.मी.ची मानवी श्रृंखला तयार करण्यात आली होती.जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडीजिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी पतंगा मैदान येथे मानवी श्रृंखलेला हिरवी झेंडी दाखिवली. या वेळी गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निरिक्षक शौकत अहमद परे, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, स्वीपचे नोडल अधिकारी एस.ई.ए.हाश्मी, स्वीपचे सहायक नोडल अधिकारी राजकुमार हिवारे यांची प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी या मानवी श्रृंखलेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधून आपल्या पालकांना २१ ऑक्टोबरला मतदानाचा करण्याचा आग्रह धरला.

टॅग्स :gondiya-acगोंदिया