शहरं
Join us  
Trending Stories
1
शुक्रवारची रात्र असती तर...! गोव्यातील त्या क्लबमध्ये हाहाकार उडाला असता; नाताळ, थर्टीफर्स्टपूर्वी पर्यटकांत खळबळ...
2
स्फोटानंतर घाबरून बेसमेंटमध्ये पळाले लोक; २० जणांचा तिथेच गुदमरून जीव गेला, आतापर्यंत २५ मृत्यू
3
झोंबणाऱ्या थंडीनं भरलं कापरं, उत्तर भारतात थंडीची लाट; उत्तराखंड, हिमाचलमध्ये बर्फवृष्टीचा इशारा
4
शनिवारची रात्र, गोव्यात क्लबमध्ये सिलिंडर स्फोट; २५ मृतांमध्ये चार पर्यटक, उर्वरित नाईट क्लबचा स्टाफ...
5
आदिवासी, ओबीसींचा वेगळा विदर्भ व्हायला हवा; विजय वडेट्टीवार : काँग्रेस श्रेष्ठींकडे पाठपुरावा करणार
6
विरोधी पक्षनेता नसेल तर उपमुख्यमंत्रिपदही रद्द करा; उद्धव ठाकरे : सरकार विरोधी पक्षाला घाबरते का?
7
दिल्लीत PM नरेंद्र मोदी अन् राज ठाकरे एकत्र; मुलगा अमित अन् नातू किआननं मोदींसोबत काढला फोटो
8
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
9
Indigo आज १५०० उड्डाणे घेणार, १३५ ठिकाणांना जोडणार; एअरलाइन्सनं जारी केले निवेदन
10
आजचे राशीभविष्य, ०७ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभाची संधी पण नकारात्मक विचार दूर करणे हितावह राहील
11
‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
12
धक्कादायक... मेळघाटात व्यसनामुळे वाढतोय कॅन्सर; युवा ते प्रौढ व्यक्तींमध्ये रक्ताल्पता : संशोधन चमू काढणार निष्कर्ष
13
क्रेडिट कार्डांच्या विळख्यात..! क्रेडिट कार्डवर राेख रक्कम उचलली तर काय हाेते?
14
हा हा हा... आमच्यासारखे तुम्हाला भांडता येते का...?
15
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
16
घोडबंदर मार्गावर आज ‘अवजड’ प्रवेशबंदी; मोठा पोलिस फौजफाटा तैनात, पण कोंडी टळणार का?
17
इंडिगोवर रेल्वेचा दिलासा : ३७ ट्रेनला ११६ अतिरिक्त डबे, मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार ४९ विशेष फेऱ्या
18
डॉ. आंबेडकरांनी भारताच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले : राज्यपाल
19
राणीच्या बागेत झेब्रा, जिराफ, जॅग्वार, चिंपांझीसाठी लगबग..! ‘एक्झॉटिक झोन’साठी प्रक्रिया सुरू; १७ प्रदर्शिनी, सुविधा निर्माण करणार
20
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; गोपालदास अग्रवाल यांच्या नेतृत्त्वात विकास शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 06:00 IST

शासकीय विभागाची कार्यालये ठिकठिकाणी असल्याने नागरिकांना विविध कामांसाठी इतरत्र पायपीट करावी लागत होती. ती दूर करण्यासाठी प्रशासकीय इमारतीची निर्मिती करुन ३२ शासकीय विभागाच्या कार्यालयाचा कारभार एकाच इमारतीतून सुरू केला. यामुळे नागरिकांना विविध कामासाठी करावी लागणार पायपीट सुध्दा कमी झाली.

ठळक मुद्देकृष्णकुमार लिल्हारे : गोंदिया येथे प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्रात मागील पंधरा वर्षांत झालेल्या विकास कामांमुळे मोठा बदल झाला आहे. आ.गोपालदास अग्रवाल यांनी या मुंबईत आपले राजकीय वजन वापरुन कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक विकास कामे कोणत्या मतदार संघात झाली असतील तर ती गोंदिया विधानसभा मतदारसंघात झाली आहे. गोपालदास अग्रवाल यांच्या नेतृत्त्वातच या मतदारसंघाचा विकास शक्य असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले भाजी विक्रेता संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णकुमार लिल्हारे यांनी केले.गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे भाजप-सेना युतीचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्या निवडणूक प्रचारार्थ शहरात ठिकठिकाणी पदयात्रा व प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, शहरध्यक्ष सुनील केलनका, छत्रपाल तुरकर,रमेश अंबुले, घनश्याम पानतवने, शकील मन्सुरी, अशोक चौधरी, प्रकाश रहमतकर, संजय कुलकर्णी,नेत्रदीप गावंडे, नंदू बिसेन, दिनेश दादरीवाल, धनलाल ठाकरे उपस्थित होते. लिल्हारे म्हणाले, गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बाई गंगाबाई महिला रुग्णालयाचा विस्तार केला. तसेच हेल्थ वेलनेस योजनेत एकमेव गोंदिया तालुक्याचा समावेश केला.शासकीय विभागाची कार्यालये ठिकठिकाणी असल्याने नागरिकांना विविध कामांसाठी इतरत्र पायपीट करावी लागत होती. ती दूर करण्यासाठी प्रशासकीय इमारतीची निर्मिती करुन ३२ शासकीय विभागाच्या कार्यालयाचा कारभार एकाच इमारतीतून सुरू केला. यामुळे नागरिकांना विविध कामासाठी करावी लागणार पायपीट सुध्दा कमी झाली. मुंबईच्या धर्तीवर गोंदिया शहरात भाजी आणि फळबाजाराचा विकास करण्याचे काम त्यांच्याच माध्यमातून झाले. शेतकऱ्यांची सिंचनाची समस्या दूर करण्यासाठी नवेगाव काटी उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळवून आणली. यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाशी दोन हात करणे शक्य होणार आहे.एकंदरीत अनेक विकास कामे ही गोपालदास अग्रवाल यांच्या माध्यमातून करण्यात आली असल्याचे सांगितले. या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी सुध्दा सभेला संबोधित केले.

टॅग्स :gondiya-acगोंदियाGopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल