शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Maharashtra Election 2019 ; गोपालदास अग्रवाल यांच्या नेतृत्त्वात विकास शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 06:00 IST

शासकीय विभागाची कार्यालये ठिकठिकाणी असल्याने नागरिकांना विविध कामांसाठी इतरत्र पायपीट करावी लागत होती. ती दूर करण्यासाठी प्रशासकीय इमारतीची निर्मिती करुन ३२ शासकीय विभागाच्या कार्यालयाचा कारभार एकाच इमारतीतून सुरू केला. यामुळे नागरिकांना विविध कामासाठी करावी लागणार पायपीट सुध्दा कमी झाली.

ठळक मुद्देकृष्णकुमार लिल्हारे : गोंदिया येथे प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्रात मागील पंधरा वर्षांत झालेल्या विकास कामांमुळे मोठा बदल झाला आहे. आ.गोपालदास अग्रवाल यांनी या मुंबईत आपले राजकीय वजन वापरुन कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक विकास कामे कोणत्या मतदार संघात झाली असतील तर ती गोंदिया विधानसभा मतदारसंघात झाली आहे. गोपालदास अग्रवाल यांच्या नेतृत्त्वातच या मतदारसंघाचा विकास शक्य असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले भाजी विक्रेता संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णकुमार लिल्हारे यांनी केले.गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे भाजप-सेना युतीचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्या निवडणूक प्रचारार्थ शहरात ठिकठिकाणी पदयात्रा व प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, शहरध्यक्ष सुनील केलनका, छत्रपाल तुरकर,रमेश अंबुले, घनश्याम पानतवने, शकील मन्सुरी, अशोक चौधरी, प्रकाश रहमतकर, संजय कुलकर्णी,नेत्रदीप गावंडे, नंदू बिसेन, दिनेश दादरीवाल, धनलाल ठाकरे उपस्थित होते. लिल्हारे म्हणाले, गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बाई गंगाबाई महिला रुग्णालयाचा विस्तार केला. तसेच हेल्थ वेलनेस योजनेत एकमेव गोंदिया तालुक्याचा समावेश केला.शासकीय विभागाची कार्यालये ठिकठिकाणी असल्याने नागरिकांना विविध कामांसाठी इतरत्र पायपीट करावी लागत होती. ती दूर करण्यासाठी प्रशासकीय इमारतीची निर्मिती करुन ३२ शासकीय विभागाच्या कार्यालयाचा कारभार एकाच इमारतीतून सुरू केला. यामुळे नागरिकांना विविध कामासाठी करावी लागणार पायपीट सुध्दा कमी झाली. मुंबईच्या धर्तीवर गोंदिया शहरात भाजी आणि फळबाजाराचा विकास करण्याचे काम त्यांच्याच माध्यमातून झाले. शेतकऱ्यांची सिंचनाची समस्या दूर करण्यासाठी नवेगाव काटी उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळवून आणली. यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाशी दोन हात करणे शक्य होणार आहे.एकंदरीत अनेक विकास कामे ही गोपालदास अग्रवाल यांच्या माध्यमातून करण्यात आली असल्याचे सांगितले. या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी सुध्दा सभेला संबोधित केले.

टॅग्स :gondiya-acगोंदियाGopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल