शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; गोपालदास अग्रवाल यांच्या नेतृत्त्वात विकास शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 06:00 IST

शासकीय विभागाची कार्यालये ठिकठिकाणी असल्याने नागरिकांना विविध कामांसाठी इतरत्र पायपीट करावी लागत होती. ती दूर करण्यासाठी प्रशासकीय इमारतीची निर्मिती करुन ३२ शासकीय विभागाच्या कार्यालयाचा कारभार एकाच इमारतीतून सुरू केला. यामुळे नागरिकांना विविध कामासाठी करावी लागणार पायपीट सुध्दा कमी झाली.

ठळक मुद्देकृष्णकुमार लिल्हारे : गोंदिया येथे प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्रात मागील पंधरा वर्षांत झालेल्या विकास कामांमुळे मोठा बदल झाला आहे. आ.गोपालदास अग्रवाल यांनी या मुंबईत आपले राजकीय वजन वापरुन कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक विकास कामे कोणत्या मतदार संघात झाली असतील तर ती गोंदिया विधानसभा मतदारसंघात झाली आहे. गोपालदास अग्रवाल यांच्या नेतृत्त्वातच या मतदारसंघाचा विकास शक्य असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले भाजी विक्रेता संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णकुमार लिल्हारे यांनी केले.गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे भाजप-सेना युतीचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्या निवडणूक प्रचारार्थ शहरात ठिकठिकाणी पदयात्रा व प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, शहरध्यक्ष सुनील केलनका, छत्रपाल तुरकर,रमेश अंबुले, घनश्याम पानतवने, शकील मन्सुरी, अशोक चौधरी, प्रकाश रहमतकर, संजय कुलकर्णी,नेत्रदीप गावंडे, नंदू बिसेन, दिनेश दादरीवाल, धनलाल ठाकरे उपस्थित होते. लिल्हारे म्हणाले, गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बाई गंगाबाई महिला रुग्णालयाचा विस्तार केला. तसेच हेल्थ वेलनेस योजनेत एकमेव गोंदिया तालुक्याचा समावेश केला.शासकीय विभागाची कार्यालये ठिकठिकाणी असल्याने नागरिकांना विविध कामांसाठी इतरत्र पायपीट करावी लागत होती. ती दूर करण्यासाठी प्रशासकीय इमारतीची निर्मिती करुन ३२ शासकीय विभागाच्या कार्यालयाचा कारभार एकाच इमारतीतून सुरू केला. यामुळे नागरिकांना विविध कामासाठी करावी लागणार पायपीट सुध्दा कमी झाली. मुंबईच्या धर्तीवर गोंदिया शहरात भाजी आणि फळबाजाराचा विकास करण्याचे काम त्यांच्याच माध्यमातून झाले. शेतकऱ्यांची सिंचनाची समस्या दूर करण्यासाठी नवेगाव काटी उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळवून आणली. यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाशी दोन हात करणे शक्य होणार आहे.एकंदरीत अनेक विकास कामे ही गोपालदास अग्रवाल यांच्या माध्यमातून करण्यात आली असल्याचे सांगितले. या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी सुध्दा सभेला संबोधित केले.

टॅग्स :gondiya-acगोंदियाGopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल