शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

प्रधानमंत्री सडक योजनेतून निकृष्ट दर्जाचे बांधकाम

By admin | Updated: October 28, 2014 22:59 IST

सालेकसा तालुक्यातील तिरखेडी ते साकरीटोला - सातगाव रस्त्याचे बाधंकाम प्रधानमंत्री सडक योजनेंतर्गत सुरू आहे. सदर बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर केला जात आहे.

साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील तिरखेडी ते साकरीटोला - सातगाव रस्त्याचे बाधंकाम प्रधानमंत्री सडक योजनेंतर्गत सुरू आहे. सदर बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर केला जात आहे. यामुळे ठिकठिकाणी रस्ता उखडला असून वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. सदर कामात चांगल्या दर्जाचे साहित्य वापरून बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी ग्रामपंचायत गांधीटोलावासीयांनी केली आहे. प्राप्त माहितीनुसार, साकरीटोला ते सालेकसा मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने सदर मार्गाची दुर्दशा झाली होती. त्यामुळे या मार्गावर असणाऱ्या साकरीटोला, सातगाव, गांधीटोला, दुर्गटोला, गिरोला, भजीयादंड तसेच इतर गावातील नागरिकांना सालेकसा येथे तहसील कार्यालय तसेच पंचायत समितीच्या कामानिमित्त नेहमीच येणे-जाणे करावे लागते.परंतु सदर रस्त्याच्या दुर्दशेमुळे त्रास सहन करावा लागत होता. वाहन धारकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत असे. सदर मार्ग दुरूस्त करण्यात यावा, अशी मागणी अनेकदा लोकप्रतिनिधी व नागरिकांनी केली होती. त्यानुसार तिरखेडी ते साकरीटोला रस्त्याच्या कामाला पंतप्रधान सडक योजनेंतर्गत मंजुरी मिळाली व नुकतेच काम सुरू झाले. मात्र सदर कामात कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाची माती मिश्रीत खडी व मुरमाऐवजी पहाडीवरील मलब्याचा वापर केला जात असल्याने काम सुरू असतानाच ठिकठिकाणची गिट्टी उखडली आहे. त्यामुळे सदर मार्गावरून ये-जा करणे त्रासदायक ठरले आहे.सदर कत्राटंदार अंदाज पत्रकानुसार चांगल्या दर्जाच्या साहित्याचा वापर न करता मोठ्या प्रमाणात पैसे वाचविण्यासाठी निकृष्ट दर्जाच्या व कमी किमतीच्या साहित्यांचा वापर करून सदर मार्गाची ऐसीतैसी करीत आहे. जेव्हा की सदर मार्गावरून जवळच असलेल्या गांधीटोला, रूगांटोला, कडोतीटोला येथे चांगल्या दर्जाची खडी आणि पानगाव व कवडी येथे चांगल्या दर्जाचे मुरूम मोठ्या प्रमाणात उपल्बध आहे.असे असतानासुध्दा कंत्राटदार व संबंधित विभागाचे शाखा अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता यांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचे काम सुरू आह. ग्रामपंचायत गांधीटोला येथील सरपंच तसेच पदाधिकारी व परिसरातील नागरिकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाच्या माध्यमातून काम बंद करा किंवा कामाता उत्तम दर्जाच्या साहित्याचा वापर करा, अशी मागणी केली आहे. सदर मार्गावरील बांधकामात चांगल्या दर्जाच्या साहित्याचा वापर न केल्यास काम बंद पाडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. (वार्ताहर)