शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

तिरोडा येथे कमी खर्चातून तयार केला बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 06:00 IST

अदानी फाऊंडेशन तिरोडाद्वारा दरवर्षी जलसंधारणाची कामे तालुक्यातील गावामध्ये करण्यात येते. तलाव खोलीकरण, नाला रुंदीकरण, नाला खोलीकरण यासारखी कामे केली जातात. सन २०१७ च्या उन्हाळ्यात नाला खोलीकरण व रुंदीकरण कामाची पाहणी करण्याकरिता तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी भेट देऊन त्यांनी एक संकल्पना सुचविली.

ठळक मुद्देसंडे अँकर । अभिमन्यू काळे यांचे मार्गदर्शन, अदानी फाऊंडेशनचा उपक्रम, शेतकऱ्यांना झाली मदत

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : बरेच शेतकरी शेतीला सिंचनासाठी नाल्याचा पाण्याचा वापर करतात. यासाठी नाला सरळीकरण आणि खोलीकरणावर शासन सुध्दा लाखो रुपयांचा खर्च करते. मात्र याच खर्चातून हेच काम करीत असताना बंधारा तयार करुन पाणी अडवून शेतीसाठी सिंचन केले जाऊ शकते. असाच कमी खर्चातून बंधारा तयार करण्याचा प्रयोग तिरोडा तालुक्यात करण्यात आला.अदानी फाऊंडेशन तिरोडाद्वारा दरवर्षी जलसंधारणाची कामे तालुक्यातील गावामध्ये करण्यात येते. तलाव खोलीकरण, नाला रुंदीकरण, नाला खोलीकरण यासारखी कामे केली जातात. सन २०१७ च्या उन्हाळ्यात नाला खोलीकरण व रुंदीकरण कामाची पाहणी करण्याकरिता तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी भेट देऊन त्यांनी एक संकल्पना सुचविली. त्यानुसार नाला खोलीकरण करीत असताना प्रत्येक १०० मिटर अंतरावर ५ ते ६ मिटरचा एक पट्टा तसाच ठेवायचा तो पट्टा नैसर्गिक बांधाचे काम करतो व त्या १०० मिटरच्या पट्यात नाल्याचे पाणी थांबून राहते. तसेच त्या ५ ते ६ मिटरच्या पट्यावरुन नाल्याच्या काठावरील शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी सुद्धा सोयीचे होते.काळे यांनी सुचविलेली संकल्पना अदानी फाऊंडेशनने प्रत्येक नाला खोलीकरणाच्या कामात अंमलात आणली आणि त्याचे फायदे दिसून येवू लागले. पावसाळ्यात नाले भरुन वाहतात. परंतु हिवाळ्याच्या शेवटी नाले कोरडे पडलेले दिसतात. परंतु सदरच्या संकल्पनेमुळे उन्हाळ्यात सुद्धा नाले तुडुंब भरलेले दिसत आहेत. पाणी वाहून न जाता ते पाणी जमिनीमध्ये झिरपल्याने पाणी पातळीत वाढ झाली तसेच नाल्याद्वारे वाहून जाणाारी माती सुद्धा जमिनीची धूप होणे थांबले. नाल्याच्या परिसरातील शेतकरी पाण्याचा वापर शेतीसाठी करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या शेतीच्या उत्पादनात वाढ होत आहे. नाला खोलीकरण करीत असताना प्रत्येक १०० मिटर, ५ ते ६ मिटरचा पट्टा खोलीकरणाच्या कामानंतर सोडल्यास होणारे फायदे, विलक्षण आहेत. तसेच या संकल्पनेमुळे अतिरिक्त खर्च न करता जलसाठा वाढतो तसेच शेतकºयांना ये-जा करण्यासाठी सोयीचे होते.

टॅग्स :Waterपाणी