शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; भाजपा सरकारने गोसीखुर्दचा निधी रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 23:38 IST

गोंदिया-भंडारा नव्हे तर पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गोसीखुर्द राष्टÑीय प्रकल्पासाठी भाजपा सरकारने निधी उपलब्ध करुन न दिल्याने या प्रकल्पाचे काम रखडले आहे.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : जुमलेबाजांना जनताच धडा शिकविणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया-भंडारा नव्हे तर पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गोसीखुर्द राष्टÑीय प्रकल्पासाठी भाजपा सरकारने निधी उपलब्ध करुन न दिल्याने या प्रकल्पाचे काम रखडले आहे. परिणामी लाखो हेक्टर शेती सिंचनाखाली येण्यापासून वंचित असून शेतकऱ्यांचे समृध्द होण्याचे स्वप्न या सरकारने या प्रकल्पासाठी लागणार निधी रोखून पूर्ण होवू दिले नाही. केवळ विकासाच्या नावावर गप्पा मारणाºया भाजपा सरकारचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला असून जतनाच त्यांना धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन प्रफुल्ल पटेल यांनी केले.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेस व महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या निवडणूक प्रचारार्थ भंडारा जिल्ह्यातील आसगाव, भागडी, विरली, मांगली चौरस, कोंढा, कोसरा, चिचाड, पवनी व भुयार येथे शनिवारी (दि.३०) आयोजित प्रचार सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी उमेदवार नाना पंचबुध्दे, जि.प.अध्यक्ष रमेश डोंगरे, प्रेमसागर गणवीर, मनोहर राऊत, नरेश दिवटे, बल्लु चुन्ने व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रफुल्ल पटेल म्हणाले, गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी आपण कोणती विकास कामे केली हे सांगण्याची गरज नसून जनतेलाच ती माहिती आहेत.गोसीखुर्द सिंचन प्रकल्प पूृर्ण करणे हे आपले स्वप्न आहे. ही योजना कार्यान्वीत झाल्यास दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी सिंचनाच्या बाबातीत समृध्द होतील. त्यामुळेच हा प्रकल्प मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न होता.मात्र भाजपा सरकारने या प्रकल्पासाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला नसल्याचा आरोप केला. बावनथडी, धापेवाडा हे प्रकल्प या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. गोसीखुर्द प्रकल्प पूर्ण करणे तर दूरच राहिले उलट नागपूर शहरातील घाण पाणी नाग नदीच्या माध्यमातून या प्रकल्पात सोडले जात असल्याने पाण्याचे प्रदूषण होत आहे. या दोन्ही जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी आपण भेल प्रकल्प मंजूर केला मात्र भाजप सरकार सत्तेवर येताच भेल प्रकल्प सुरू करण्याऐवजी तो बंद पाडला. परिणामी हजारो बेरोजगारांना रोजगार मिळण्यापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे जनतेनीच काय योग्य आहे ते ठरवून सजग राहू मतदान करावे. नाना पंचबुध्दे म्हणाले, भाजप सरकारने ना शेतकºयांसाठी ना बेरोजगार युवकांसाठी काही केले, उलट मोठ मोठ्या योजनांची घोषणा व जुमलेबाजी करुन केवळ जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले. त्यामुळे अशा विश्वासघाती सरकारला जनतेनीच बाहेरचा रस्ता दाखविण्याची गरज असल्याचे सांगितले. उपस्थित अन्य मान्यवरांनी सुध्दा या वेळी मार्गदर्शन केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकprafull patelप्रफुल्ल पटेल