शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

बिरसी विमानतळात स्थानिकांना काम बंदचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:15 IST

गोंदिया : तालुक्यातील बिरसी विमानतळ प्रकल्पाच्या विस्तारीकरणाला २००७ पासून सुरुवात झाली तेव्हापासून या प्रकल्पात स्थानिक नागरिकांना व प्रकल्पग्रस्तांना अधिकाधिक ...

गोंदिया : तालुक्यातील बिरसी विमानतळ प्रकल्पाच्या विस्तारीकरणाला २००७ पासून सुरुवात झाली तेव्हापासून या प्रकल्पात स्थानिक नागरिकांना व प्रकल्पग्रस्तांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन तत्कालीन जिल्हा व विमानतळ प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी दिले होते.

बिरसी परिसरातील अनेक बेरोजगार युवकांना या प्रकल्पात सुरक्षारक्षक म्हणून रोजगारही उपलब्ध करून देण्यात आला. हे जरी खरे असले तरी आता तब्बल तेरा वर्षे नोकरी केल्यानंतर या सर्व नागरिकांना विमानतळ प्रशासनाने कामावरून बंद केल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. विमानतळ प्रशासनाने स्थानिक नागरिकांच्या विरोधात घेतलेल्या या पवित्र्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. विमानतळ निर्देशकावर कारवाई करून बंद केलेल्या सर्व सुरक्षारक्षकांना त्वरित कामावर घेण्याची मागणी सुरक्षारक्षकांनी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. बिरसी, कामठा, परसवाडा तसेच झिलमिली या गावातील नागरिकांच्या शेतजमिनी व घरेदेखील अधिग्रहित करण्यात आली. मोबदल्यात परिसरातील नागरिकांना सुरक्षारक्षक म्हणून रोजगार उपलब्ध करून दिला. तब्बल तेरा वर्षांचा काळ उलटला आहे. या सेवेवरच ते आपल्या कुटुंबाचा गाडा चालवीत आहेत. परंतु इतकी वर्षे सेवा केल्यानंतर आता विमानतळ प्रशासनाने या सर्व कामगारांना कामावरून काढून कायमचे बंद केले आहे. त्यामुळे या सर्वांच्या कुटुंबांवर उपासमारीची पाळी आली आहे. विमानतळ प्रशासनाने यांना कोणतीही सूचना किंवा नोटीससुध्दा दिली नाही. जिल्हा प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी याची दखल घेऊन या सर्व कामगारांना पुन्हा कामावर सामावून घेण्याची मागणी केली आहे.