शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ठरावाला झुगारुन दिला दारू दुकानाचा परवाना

By admin | Updated: November 2, 2014 22:37 IST

गोंदिया जिल्ह्यात वाढत्या दारू व्यावसायामुळे व्यसनाधिशांची गर्दी वाढत असल्याने या व्यवसायामुळे कायदा, सुव्यवस्था व शांतता भंग होत असून व्यसनांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये वाढ होत आहे.

आमगाव : गोंदिया जिल्ह्यात वाढत्या दारू व्यावसायामुळे व्यसनाधिशांची गर्दी वाढत असल्याने या व्यवसायामुळे कायदा, सुव्यवस्था व शांतता भंग होत असून व्यसनांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये वाढ होत आहे. तर दुसरीकडे ग्रामसभेच्या अधिकारांवर अतिक्रमण करीत मंत्रालयाने दारू परवान्याला मंज़ुरी दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पुढे येत आहे.आमगाव तालुक्यात वाढत्या दारू व्यवसायामुळे अनेक गुन्हेगारी प्रकरणात वाढ झाली आहे. यासाठी नागरिकांनी दारू व्यवसायाला पायबंद करण्यासाठी पुढाकार घेत ग्रामसभेतून दारु दुकानांना परवानगी नाकारली आहे. परंतु काही पुढारी पैशाच्या लालसेपुढे बळी पडून दारू दुकानांना परवानगी देण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करताना दिसत आहे. आमगाव तालुक्यातील अंजोरा येथे दारू व्यवसामुळे वाढत्या गुन्हेगारीची दखल घेत नागारिकांनी महिलांच्या पुढाकाराने एल्गार पुकारुन ग्रामसभेच्या माध्यमाने दारु दुकान बंद करण्याचा ठराव पारीत केला. यावेळी, जिल्हाधिकारी विभागाचे अधीक्षक, शासकीय विभागातील अधिकारी उपस्थित होते. वाढत्या नागरिकांच्या उठावापुढे प्रशासनाला निर्णय घ्यावा लागला. परंतु रिसामा येथील बियरबारची परवानगी देताना नियमांना डावलून आबकारी विभागाने मंत्रालयातून परवाना मिळवून देण्यासाठी मोलाची भूमिका बजावल्याची माहिती पुढे येत आहे. रिसामा येथील रहिवासी निकेश मिश्रा यांनी गायत्रीमंदिर परिसरात बिअरबार करिता मागील तीन वर्षापासून ग्रामपंचायतकडे नाहरकरत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी धावपळ सुरू केली होती. स्वत: ग्रामपंचायत सदस्य असून त्यांना नागरिकांनी बिअरबार करिता नाहरकरत प्रमाणपत्र नाकारले होते.परंतु व्यवसाय सुरू करावा या हेतूने त्यांनी नागरिकांच्या मताविरुद्ध प्रयत्न सुरू ठेवले होते. दुसरीकडे नागरिकांनी ग्रामपंचायतच्या माध्यमाने ग्रामसभेतून २०१२ ला बिअरबारचा परवाना विषयी नाहरकत प्रमाणपत्र झुगारुन लावले. सलग दोन वर्षे हा विषय संपुष्टात असल्याचे भासवण्यात आले. मात्र बिअरबारच्या परवानगीसाठी जिल्हा अधिकारी अधीक्षक यांच्या मदतीने ग्रामसभेचे ठराव झुगारुन मंत्रालयातून बिअरबारकरिता परवाना मंजुर करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष उफाळून आला आहे. तर नागरिकांनी या बिअरबार विरुद्ध उठाव करण्यासाठी प्रशासनाला सचेत केले आहे. (शहर प्रतिनिधी)