शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत?
3
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
4
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
5
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
6
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
7
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
8
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
9
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
10
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
11
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
12
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
13
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
14
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
15
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
16
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
17
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
18
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
19
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
20
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय

ठरावाला झुगारुन दिला दारू दुकानाचा परवाना

By admin | Updated: November 2, 2014 22:37 IST

गोंदिया जिल्ह्यात वाढत्या दारू व्यावसायामुळे व्यसनाधिशांची गर्दी वाढत असल्याने या व्यवसायामुळे कायदा, सुव्यवस्था व शांतता भंग होत असून व्यसनांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये वाढ होत आहे.

आमगाव : गोंदिया जिल्ह्यात वाढत्या दारू व्यावसायामुळे व्यसनाधिशांची गर्दी वाढत असल्याने या व्यवसायामुळे कायदा, सुव्यवस्था व शांतता भंग होत असून व्यसनांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये वाढ होत आहे. तर दुसरीकडे ग्रामसभेच्या अधिकारांवर अतिक्रमण करीत मंत्रालयाने दारू परवान्याला मंज़ुरी दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पुढे येत आहे.आमगाव तालुक्यात वाढत्या दारू व्यवसायामुळे अनेक गुन्हेगारी प्रकरणात वाढ झाली आहे. यासाठी नागरिकांनी दारू व्यवसायाला पायबंद करण्यासाठी पुढाकार घेत ग्रामसभेतून दारु दुकानांना परवानगी नाकारली आहे. परंतु काही पुढारी पैशाच्या लालसेपुढे बळी पडून दारू दुकानांना परवानगी देण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करताना दिसत आहे. आमगाव तालुक्यातील अंजोरा येथे दारू व्यवसामुळे वाढत्या गुन्हेगारीची दखल घेत नागारिकांनी महिलांच्या पुढाकाराने एल्गार पुकारुन ग्रामसभेच्या माध्यमाने दारु दुकान बंद करण्याचा ठराव पारीत केला. यावेळी, जिल्हाधिकारी विभागाचे अधीक्षक, शासकीय विभागातील अधिकारी उपस्थित होते. वाढत्या नागरिकांच्या उठावापुढे प्रशासनाला निर्णय घ्यावा लागला. परंतु रिसामा येथील बियरबारची परवानगी देताना नियमांना डावलून आबकारी विभागाने मंत्रालयातून परवाना मिळवून देण्यासाठी मोलाची भूमिका बजावल्याची माहिती पुढे येत आहे. रिसामा येथील रहिवासी निकेश मिश्रा यांनी गायत्रीमंदिर परिसरात बिअरबार करिता मागील तीन वर्षापासून ग्रामपंचायतकडे नाहरकरत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी धावपळ सुरू केली होती. स्वत: ग्रामपंचायत सदस्य असून त्यांना नागरिकांनी बिअरबार करिता नाहरकरत प्रमाणपत्र नाकारले होते.परंतु व्यवसाय सुरू करावा या हेतूने त्यांनी नागरिकांच्या मताविरुद्ध प्रयत्न सुरू ठेवले होते. दुसरीकडे नागरिकांनी ग्रामपंचायतच्या माध्यमाने ग्रामसभेतून २०१२ ला बिअरबारचा परवाना विषयी नाहरकत प्रमाणपत्र झुगारुन लावले. सलग दोन वर्षे हा विषय संपुष्टात असल्याचे भासवण्यात आले. मात्र बिअरबारच्या परवानगीसाठी जिल्हा अधिकारी अधीक्षक यांच्या मदतीने ग्रामसभेचे ठराव झुगारुन मंत्रालयातून बिअरबारकरिता परवाना मंजुर करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष उफाळून आला आहे. तर नागरिकांनी या बिअरबार विरुद्ध उठाव करण्यासाठी प्रशासनाला सचेत केले आहे. (शहर प्रतिनिधी)