शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

ठरावाला झुगारुन दिला दारू दुकानाचा परवाना

By admin | Updated: November 2, 2014 22:37 IST

गोंदिया जिल्ह्यात वाढत्या दारू व्यावसायामुळे व्यसनाधिशांची गर्दी वाढत असल्याने या व्यवसायामुळे कायदा, सुव्यवस्था व शांतता भंग होत असून व्यसनांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये वाढ होत आहे.

आमगाव : गोंदिया जिल्ह्यात वाढत्या दारू व्यावसायामुळे व्यसनाधिशांची गर्दी वाढत असल्याने या व्यवसायामुळे कायदा, सुव्यवस्था व शांतता भंग होत असून व्यसनांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये वाढ होत आहे. तर दुसरीकडे ग्रामसभेच्या अधिकारांवर अतिक्रमण करीत मंत्रालयाने दारू परवान्याला मंज़ुरी दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पुढे येत आहे.आमगाव तालुक्यात वाढत्या दारू व्यवसायामुळे अनेक गुन्हेगारी प्रकरणात वाढ झाली आहे. यासाठी नागरिकांनी दारू व्यवसायाला पायबंद करण्यासाठी पुढाकार घेत ग्रामसभेतून दारु दुकानांना परवानगी नाकारली आहे. परंतु काही पुढारी पैशाच्या लालसेपुढे बळी पडून दारू दुकानांना परवानगी देण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करताना दिसत आहे. आमगाव तालुक्यातील अंजोरा येथे दारू व्यवसामुळे वाढत्या गुन्हेगारीची दखल घेत नागारिकांनी महिलांच्या पुढाकाराने एल्गार पुकारुन ग्रामसभेच्या माध्यमाने दारु दुकान बंद करण्याचा ठराव पारीत केला. यावेळी, जिल्हाधिकारी विभागाचे अधीक्षक, शासकीय विभागातील अधिकारी उपस्थित होते. वाढत्या नागरिकांच्या उठावापुढे प्रशासनाला निर्णय घ्यावा लागला. परंतु रिसामा येथील बियरबारची परवानगी देताना नियमांना डावलून आबकारी विभागाने मंत्रालयातून परवाना मिळवून देण्यासाठी मोलाची भूमिका बजावल्याची माहिती पुढे येत आहे. रिसामा येथील रहिवासी निकेश मिश्रा यांनी गायत्रीमंदिर परिसरात बिअरबार करिता मागील तीन वर्षापासून ग्रामपंचायतकडे नाहरकरत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी धावपळ सुरू केली होती. स्वत: ग्रामपंचायत सदस्य असून त्यांना नागरिकांनी बिअरबार करिता नाहरकरत प्रमाणपत्र नाकारले होते.परंतु व्यवसाय सुरू करावा या हेतूने त्यांनी नागरिकांच्या मताविरुद्ध प्रयत्न सुरू ठेवले होते. दुसरीकडे नागरिकांनी ग्रामपंचायतच्या माध्यमाने ग्रामसभेतून २०१२ ला बिअरबारचा परवाना विषयी नाहरकत प्रमाणपत्र झुगारुन लावले. सलग दोन वर्षे हा विषय संपुष्टात असल्याचे भासवण्यात आले. मात्र बिअरबारच्या परवानगीसाठी जिल्हा अधिकारी अधीक्षक यांच्या मदतीने ग्रामसभेचे ठराव झुगारुन मंत्रालयातून बिअरबारकरिता परवाना मंजुर करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष उफाळून आला आहे. तर नागरिकांनी या बिअरबार विरुद्ध उठाव करण्यासाठी प्रशासनाला सचेत केले आहे. (शहर प्रतिनिधी)