शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

२०० जणांच्या उपस्थितीत होऊ द्या शुभमंगल सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2022 05:00 IST

कोरोनाचा ओमायक्रॉन हा विषाणू तेवढा धोकादायक नसून आता बाधितांची संख्याही कमी होताना दिसत असल्याने विवाह सोहळ्यांवरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यात आता शासनाने विवाह सोहळ्यांसाठी ५० ऐवजी २०० जणांना परवानगी दिली आहे. या निर्णयानंतर बहुतांश वर-वधू पित्यांची सोय होणार असून त्यांना विवाह सोहळा थाटामाटात पार पाडता येणार आहे. यामुळे आता येत्या काळात विवाह सोहळ्यांना चांगलाच बहर येणार यात काही शंका वाटत नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  कोरोनाची तिसरी लाट व झपाट्याने वाढत असलेला प्रादुर्भाव बघता राज्य शासनाने पुन्हा काही निर्बंध लावले आहेत. यामध्ये विवाह सोहळ्यांसाठी फक्त ५० जणांचीच परवानगी देण्यात आली होती. परिणामी एवढ्या मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा आटोपणे शक्य नसल्याने वर-वधू पित्यांची अडचण झाली होती. अशात कित्येकांना विवाह सोहळा पुढे ढकलावा लागला आहे. मात्र कोरोनाचा ओमायक्रॉन हा विषाणू तेवढा धोकादायक नसून आता बाधितांची संख्याही कमी होताना दिसत असल्याने विवाह सोहळ्यांवरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यात आता शासनाने विवाह सोहळ्यांसाठी ५० ऐवजी २०० जणांना परवानगी दिली आहे. या निर्णयानंतर बहुतांश वर-वधू पित्यांची सोय होणार असून त्यांना विवाह सोहळा थाटामाटात पार पाडता येणार आहे. यामुळे आता येत्या काळात विवाह सोहळ्यांना चांगलाच बहर येणार यात काही शंका वाटत नाही. 

मंगल कार्यालयांना दिलासा

शासनाने ५० जणांवरील निर्बंध हटवून त्यात २०० जणांची परवानगी दिली ही चांगली बाब आहे. मात्र यापेक्षा जास्त जणांची परवानगी अपेक्षित आहे. तरिही आता २०० जणांची उपस्थिती मिळाल्याने काही प्रमाणात विवाह सोहळे आटोपले जाणार असे अपेक्षित आहे.- मनोज बिसेन (लॉन व्यवसायी) 

शासनाने विवाह सोहळ्यांवरील निर्बंध शिथिल केले हा चांगला निर्णय आहे. मात्र २०० पेक्षा जास्त जणांची उपस्थिती देणे अपेक्षित आहे. कारण विवाह सोहळा एकदाच होत असून एवढ्या कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत तो उरकणे शक्य नाही. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. - कार्तिक चव्हाण (लॉन व्यवसायी) 

मंगल कार्यालयात २५ टक्के अथवा २०० जणशासनाने शिथिल केलेल्या या निर्बंधांनुसार आता मंगल कार्यालयात क्षमतेच्या २५ टक्के अथवा २०० जणांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. सर्वसाधारण पणे एवढ्या लोकांच्या उपस्थितीत विवाह आटोपता येत असल्याने विवाह संख्या वाढणार असे दिसून येते. 

फेब्रुवारीतील लग्नाचे मुहूर्तफेब्रुवारी महिन्यात ५, ६,११,१२,१८,१९,२१, २२ तारखेला असे एकूण ८ विवाह मुहूर्त आहेत. त्यात आता २०० लोकांची परवानगी असल्याने विवाह सोहळे आटोपणार. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न