शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

२०० जणांच्या उपस्थितीत होऊ द्या शुभमंगल सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2022 05:00 IST

कोरोनाचा ओमायक्रॉन हा विषाणू तेवढा धोकादायक नसून आता बाधितांची संख्याही कमी होताना दिसत असल्याने विवाह सोहळ्यांवरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यात आता शासनाने विवाह सोहळ्यांसाठी ५० ऐवजी २०० जणांना परवानगी दिली आहे. या निर्णयानंतर बहुतांश वर-वधू पित्यांची सोय होणार असून त्यांना विवाह सोहळा थाटामाटात पार पाडता येणार आहे. यामुळे आता येत्या काळात विवाह सोहळ्यांना चांगलाच बहर येणार यात काही शंका वाटत नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  कोरोनाची तिसरी लाट व झपाट्याने वाढत असलेला प्रादुर्भाव बघता राज्य शासनाने पुन्हा काही निर्बंध लावले आहेत. यामध्ये विवाह सोहळ्यांसाठी फक्त ५० जणांचीच परवानगी देण्यात आली होती. परिणामी एवढ्या मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा आटोपणे शक्य नसल्याने वर-वधू पित्यांची अडचण झाली होती. अशात कित्येकांना विवाह सोहळा पुढे ढकलावा लागला आहे. मात्र कोरोनाचा ओमायक्रॉन हा विषाणू तेवढा धोकादायक नसून आता बाधितांची संख्याही कमी होताना दिसत असल्याने विवाह सोहळ्यांवरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यात आता शासनाने विवाह सोहळ्यांसाठी ५० ऐवजी २०० जणांना परवानगी दिली आहे. या निर्णयानंतर बहुतांश वर-वधू पित्यांची सोय होणार असून त्यांना विवाह सोहळा थाटामाटात पार पाडता येणार आहे. यामुळे आता येत्या काळात विवाह सोहळ्यांना चांगलाच बहर येणार यात काही शंका वाटत नाही. 

मंगल कार्यालयांना दिलासा

शासनाने ५० जणांवरील निर्बंध हटवून त्यात २०० जणांची परवानगी दिली ही चांगली बाब आहे. मात्र यापेक्षा जास्त जणांची परवानगी अपेक्षित आहे. तरिही आता २०० जणांची उपस्थिती मिळाल्याने काही प्रमाणात विवाह सोहळे आटोपले जाणार असे अपेक्षित आहे.- मनोज बिसेन (लॉन व्यवसायी) 

शासनाने विवाह सोहळ्यांवरील निर्बंध शिथिल केले हा चांगला निर्णय आहे. मात्र २०० पेक्षा जास्त जणांची उपस्थिती देणे अपेक्षित आहे. कारण विवाह सोहळा एकदाच होत असून एवढ्या कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत तो उरकणे शक्य नाही. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. - कार्तिक चव्हाण (लॉन व्यवसायी) 

मंगल कार्यालयात २५ टक्के अथवा २०० जणशासनाने शिथिल केलेल्या या निर्बंधांनुसार आता मंगल कार्यालयात क्षमतेच्या २५ टक्के अथवा २०० जणांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. सर्वसाधारण पणे एवढ्या लोकांच्या उपस्थितीत विवाह आटोपता येत असल्याने विवाह संख्या वाढणार असे दिसून येते. 

फेब्रुवारीतील लग्नाचे मुहूर्तफेब्रुवारी महिन्यात ५, ६,११,१२,१८,१९,२१, २२ तारखेला असे एकूण ८ विवाह मुहूर्त आहेत. त्यात आता २०० लोकांची परवानगी असल्याने विवाह सोहळे आटोपणार. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न