शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचे पुन्हा तांडव

By admin | Updated: March 29, 2016 03:02 IST

कमी पावसामुळे आणि कीडीच्या प्रादुर्भावामुळे आधीच शेतकऱ्यांना अपेक्षित आले नसल्यामुळे परिस्थिती नाजूक झाली

गोंदिया : कमी पावसामुळे आणि कीडीच्या प्रादुर्भावामुळे आधीच शेतकऱ्यांना अपेक्षित आले नसल्यामुळे परिस्थिती नाजूक झाली आहे. त्यात रबीच्या पिकाच्या आशेवरही अवकाळी पावसामुळे पाणी फेरले जात आहे. महिन्याभरात तिसऱ्यांदा झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लावला आहे. मार्च महिना संपण्याच्या मार्गावर आहे. सोबतच उष्णतेचा प्रभाव वाढत जात आहे. परंतु यावर्षी वारंवार अवकाळी पाऊस बरसत असल्यामुळे रबी पिकांचे मोठे नुकसान होत आहे. रबीच्या धानासह आंब्याचा मोहोर आणि भाजीपाल्याच्या पिकांनाही याचा फटका बसला आहे.रविवारी २७ मार्चच्या रात्री ७.१५ वाजताच्या दरम्यान अचानक तीव्र गतीने वादळी वारा सुरू झाला. काही वेळानंतर ढगांच्या मोठ्या गडगडाटासह रिमझिम पाऊस पडू लागला. त्यानंतर जोराम पाऊस सुरू झाला. थांबत थांबत हा पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. माहितीनुसार २८ मार्चच्या पहाटे २.३० वाजतापर्यंत पाऊस व ढगांचा गडगडाट सुरू होता.शहरात सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार गोंदिया तालुक्यात ७४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. गोरेगाव तालुक्यात १०.२ मिमी, तिरोडा तालुक्यात ६६.७ मिमी, अर्जुनी-मोरगावमध्ये ७७.२ मिमी, देवरीमध्ये २५ मिमी, आमगावात २१.२ मिमी, सालेकसामध्ये २५.१ मिमी व सडक-अर्जुनी तालुक्यात ३४.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान रात्रभर विद्युतचा लपंडाव सुरू होता. अनेकांच्या घरी विद्युत पुरवठा खंडित झाल्याने त्यांना रात्रभर जागून काढावी लागली. तर अनेकांच्या घरातील फ्यूज उडाल्याने २८ मार्च रोजी दिवसासुद्धा नागरिकांना उष्णतेचा प्रकोप सहन करावा लागला. (प्रतिनिधी)तिरोड्यात वीज व पाणी पुरवठा ठप्प४रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह बरसलेल्या पावसाने अनेकांची झोप उडवून टाकली. अनेकांना रात्रभर अंधारात व डासांच्या त्रासात रात्र घालवावी लागली. काही ठिकाणी मध्यरात्री विजेचा पुरवठा सुरू झाला तर काही ठिकाणी अनेकांच्या घरी अंधारच होता. सोमवारी अनेक नागरिकांनी वीज कार्यालय गाठून तक्रारी नोंदविल्या. मात्र वीज कर्मचारी नागरिकांच्या घरी पोहोचलेच नाही. त्यामुळे तिरोडा शहरातील अनेक कुटुंब सोमवारची रात्रसुद्धा अंधारात व डासांच्या त्रासातच घालवतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकाराकडे लक्ष घालून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करावे, अशी तिरोडावासीयांची मागणी आहे. तसेच वीज पुरवठा खंडित असल्याने तिरोडावासीयांना सोमवारी सकाळी पाण्याचा पुरवठा होवू शकला नाही.विद्युत पुरवठा खंडिततीव्र वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी तार तुटले आहेत. तार तुटल्यामुळे विद्युत व्यवस्था पार कोलमडली व नागरिकांना रात्रभर विनाविजेनेच राहावे लागले. काही ठिकाणी विद्युत व्यवस्था २८ मार्चच्या सकाळीसुद्धा पूर्ववत झाली नाही. विद्युत व्यवस्था ठप्प पडल्यामुळे शहरातील काही भागात भारत-आॅस्ट्रेलिया दरम्यान क्रिकेट मॅच बघण्यापासून नागरिक वंचित झाले. पाणी पुरवठासुद्धा प्रभावितवादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या. तार टुटल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या टाक्यांपर्यंत पाणी पोहचू शकले नाही. त्यामुळे टाक्या रिक्त राहिल्या व याचा सरळ प्रभाव पाणी पुरवठ्यावर झाला. २८ मार्चच्या सकाळी शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा झाला नाही. त्यामुळे शहरातील नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी मात्र आपले अंग काढून घेतले.