शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

अवकाळी पावसाचे पुन्हा तांडव

By admin | Updated: March 29, 2016 03:02 IST

कमी पावसामुळे आणि कीडीच्या प्रादुर्भावामुळे आधीच शेतकऱ्यांना अपेक्षित आले नसल्यामुळे परिस्थिती नाजूक झाली

गोंदिया : कमी पावसामुळे आणि कीडीच्या प्रादुर्भावामुळे आधीच शेतकऱ्यांना अपेक्षित आले नसल्यामुळे परिस्थिती नाजूक झाली आहे. त्यात रबीच्या पिकाच्या आशेवरही अवकाळी पावसामुळे पाणी फेरले जात आहे. महिन्याभरात तिसऱ्यांदा झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लावला आहे. मार्च महिना संपण्याच्या मार्गावर आहे. सोबतच उष्णतेचा प्रभाव वाढत जात आहे. परंतु यावर्षी वारंवार अवकाळी पाऊस बरसत असल्यामुळे रबी पिकांचे मोठे नुकसान होत आहे. रबीच्या धानासह आंब्याचा मोहोर आणि भाजीपाल्याच्या पिकांनाही याचा फटका बसला आहे.रविवारी २७ मार्चच्या रात्री ७.१५ वाजताच्या दरम्यान अचानक तीव्र गतीने वादळी वारा सुरू झाला. काही वेळानंतर ढगांच्या मोठ्या गडगडाटासह रिमझिम पाऊस पडू लागला. त्यानंतर जोराम पाऊस सुरू झाला. थांबत थांबत हा पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. माहितीनुसार २८ मार्चच्या पहाटे २.३० वाजतापर्यंत पाऊस व ढगांचा गडगडाट सुरू होता.शहरात सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार गोंदिया तालुक्यात ७४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. गोरेगाव तालुक्यात १०.२ मिमी, तिरोडा तालुक्यात ६६.७ मिमी, अर्जुनी-मोरगावमध्ये ७७.२ मिमी, देवरीमध्ये २५ मिमी, आमगावात २१.२ मिमी, सालेकसामध्ये २५.१ मिमी व सडक-अर्जुनी तालुक्यात ३४.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान रात्रभर विद्युतचा लपंडाव सुरू होता. अनेकांच्या घरी विद्युत पुरवठा खंडित झाल्याने त्यांना रात्रभर जागून काढावी लागली. तर अनेकांच्या घरातील फ्यूज उडाल्याने २८ मार्च रोजी दिवसासुद्धा नागरिकांना उष्णतेचा प्रकोप सहन करावा लागला. (प्रतिनिधी)तिरोड्यात वीज व पाणी पुरवठा ठप्प४रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह बरसलेल्या पावसाने अनेकांची झोप उडवून टाकली. अनेकांना रात्रभर अंधारात व डासांच्या त्रासात रात्र घालवावी लागली. काही ठिकाणी मध्यरात्री विजेचा पुरवठा सुरू झाला तर काही ठिकाणी अनेकांच्या घरी अंधारच होता. सोमवारी अनेक नागरिकांनी वीज कार्यालय गाठून तक्रारी नोंदविल्या. मात्र वीज कर्मचारी नागरिकांच्या घरी पोहोचलेच नाही. त्यामुळे तिरोडा शहरातील अनेक कुटुंब सोमवारची रात्रसुद्धा अंधारात व डासांच्या त्रासातच घालवतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकाराकडे लक्ष घालून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करावे, अशी तिरोडावासीयांची मागणी आहे. तसेच वीज पुरवठा खंडित असल्याने तिरोडावासीयांना सोमवारी सकाळी पाण्याचा पुरवठा होवू शकला नाही.विद्युत पुरवठा खंडिततीव्र वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी तार तुटले आहेत. तार तुटल्यामुळे विद्युत व्यवस्था पार कोलमडली व नागरिकांना रात्रभर विनाविजेनेच राहावे लागले. काही ठिकाणी विद्युत व्यवस्था २८ मार्चच्या सकाळीसुद्धा पूर्ववत झाली नाही. विद्युत व्यवस्था ठप्प पडल्यामुळे शहरातील काही भागात भारत-आॅस्ट्रेलिया दरम्यान क्रिकेट मॅच बघण्यापासून नागरिक वंचित झाले. पाणी पुरवठासुद्धा प्रभावितवादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या. तार टुटल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या टाक्यांपर्यंत पाणी पोहचू शकले नाही. त्यामुळे टाक्या रिक्त राहिल्या व याचा सरळ प्रभाव पाणी पुरवठ्यावर झाला. २८ मार्चच्या सकाळी शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा झाला नाही. त्यामुळे शहरातील नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी मात्र आपले अंग काढून घेतले.