शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

जुन्या पाणी वितरिका मोजताहेत शेवटच्या घटका

By admin | Updated: April 4, 2015 01:19 IST

बाघ पाटबंधारे व्यवस्थापन विभागाने आमगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी सिंचन व्यवस्था झाली पाहिजे

पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष : माल्ही, शंभुटोलाची दुर्दशा, शेतकऱ्यांना पाणी नाहीआमगाव : बाघ पाटबंधारे व्यवस्थापन विभागाने आमगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी सिंचन व्यवस्था झाली पाहिजे म्हणून गावातील परिसरागा लागून वितरिका तयार केल्या. मात्र ४५ वर्षापूर्वी तयार झालेल्या अनेक वितरिका आता शेवटच्या घटका मोजत आहेत. यात माल्ही, शंभुटोला परिसरातील वितरिका सदर विभागाच्या दुर्लक्षितपणाला बळी पडल्या आहेत. या वितरिकांच्या दुर्गतीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात खरीप व रबी पाणी जात नाही. तरीही त्यांच्या दुरूस्तीकडे लक्ष दिले जात नाही.तीन धरणाचे पाणी तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळते. त्यात शेतकरी डिमांड भरुन लाखो रुपये शासनाच्या तिजोरीत जमा करतात. अनेक कर्मचारी अधिकारी शेतकऱ्यांना पाणी मिळण्याकरिता व व्यवस्थापनासाठी कार्यरत आहेत. मात्र फक्त कार्यालयात खुर्च्यात बसून पगार उचलण्याचेच काम शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता व इतर कर्मचाकी करताना दिसतात. ४० वर्षापूर्वी तयार झालेली माल्ही, शंभुटोला, महारीटोला पाणी वितरिकेची दुर्गती बघितल्यानंतर शेतकऱ्यांचा वाली कोण? असा प्रश्न आज उपस्थित होत आहे. १९६९, ७० व ७१ या तीन वर्षात आमगाव, माल्ही, शंभुटोला, महारीटोला पाणी वितरिकेचे काम करण्यात आले. हा तिन्ही गावांची शेती परिसर जवळपास २३०० एकराचा आहे. त्यात वितरिकेचे पाणी २१०० एकरात रबी व खरीप पिकाकरिता पाणी शेतकऱ्यांच्या शेतीला पुरविला जातो व दोनशे एकर शेती कोरडवाहू आहे. प्रयत्न केला तर या शेतीला पाणी जाऊ शकतो, अशी पतिक्रिया पाणी बाधित शेतकऱ्यांनी व्यक्त केली. या दोनशे एकरात उत्पन्न घेणारे शेतकरी अधिकारी यांना वजन देऊन आपले उत्पन्न घेतात. मात्र या वितरिकेवर १५वर्षापूर्वी काम झाले पण ते थातूरमातूर करण्यात आले. उपसा केला जातो मात्र शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रकारे शेतीला पाणी मिळत नाही. लाखो रुपये पाणीपट्टी कराचे वसुल करुन शेतकऱ्यांना पाणी नाही. वितरिकेची दुर्दशा झाली आहे. अनेक ठिकाणी सिमेंट काम नासधुस झाले आहेत. केव्हाही वितरिका ओलांडतानी धोका होऊ शकतो. मात्र अधिकारी वितरिकेच्या कामासाठी पूर्णपणे उदासीन आहेत किंवा त्याचे लक्ष नाही. बनगाव येथील नगराजवळील कालव्यात नागरिकांनी सांडपाणी सोडण्याचे पाईप लावले आहेत. दूषित पाण्यामुळे रोगराई पसरू शकते. त्याकडे लक्ष नाही. आज वितरिकेत पाणी नाही. मागील वर्षी रबीसाठी पाणी मिळाले नव्हते. शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाण्याकरिता कवायत करावी लागली. (तालुका प्रतिनिधी)शेतकऱ्यांचा विचार करावारोटेशननुसार यावर्षी वितरिकेला रबी पाणी नाही, मात्र पाण्याची भिषणता लक्षात घेता आठवड्यातून एकदा तरी पाणी देणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांनी माल्ही वितरिकेला पाणी जाऊ नये यासाठी वितरिकेत सिमेंट बांधकाम केल्याने एक थेंब पाणी येत नाही. एकंदरित आमगाव, माल्ही, शंभुटोलाला महारीटोला वितरिकेचे काम होणे गरजेचे आहे. मात्र स्थानिक अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे फटका शेतकऱ्यांना बसत आहे.