शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

खरेदी केंद्रावरील धानाला ताडपत्र्यांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:08 IST

जिल्ह्यात रविवारी (दि.९) रात्रीच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाचा फटका काही प्रमाणात आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावरील धानाला बसला.या मंडळाच्या जवळपास ४६ केंद्रावर खरेदी केलेला लाखो क्विंटल धान उघड्यावर पडून असून त्यांना केवळ ताडपत्र्यांचा आधार आहे.

ठळक मुद्देनुकसानीची शक्यता : गोदामांची अद्यापही व्यवस्था नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात रविवारी (दि.९) रात्रीच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाचा फटका काही प्रमाणात आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावरील धानाला बसला.या मंडळाच्या जवळपास ४६ केंद्रावर खरेदी केलेला लाखो क्विंटल धान उघड्यावर पडून असून त्यांना केवळ ताडपत्र्यांचा आधार आहे. अवकाळी पावसामुळे धान ओला होऊन नुकसान झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जातो.आदिवासी विकास महामंडळातंर्गत दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामात शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करुन हमीभावाने धान खरेदी केली जाते. मात्र दरवर्षी या विभागातर्फे खरेदी करण्यात येणारा धान सुरक्षीत ठेवण्यासाठी गोदामाची अडचण कायम असते. आठ वर्षांपूर्वी खरेदी केंद्रावरील धान उघड्यावर पडून असल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. मात्र यानंतरही शासनाने कसलाच धडा घेतलेला नाही. यंदा आदिवासी विकास महामंडळाने एकूण ४६ शासकीय धान खरेदी केंद्र सुरू केले आहे. आत्तापर्यंत या केंद्रावरुन २ लाख ४९ हजार ९५७ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. यापैकी बहुतांश धान गोदामाअभावी खरेदी केंद्रावरच पडला आहे. धानाच्या सुरक्षेकरीता ताडपत्र्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी सकाळी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका या केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानाला बसला. पावसामुळे काही केंद्रावरील धान ओले झाल्याची माहिती आहे.मात्र या संदर्भात या विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी पावसामुळे धानाचे नुकसान झाले नसल्याचे सांगितले. तसेच शासकीय धान खरेदी केंद्रावर ताडपत्र्या उपलब्ध करुन देण्यात आल्या असून गोदामाची व्यवस्था लवकरच केली जाणार असल्याचे सांगितले.दरवर्षी अवकाळी पावसामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावरील धान भिजतात. मात्र यानंतरही केंद्र सुरू झाल्यानंतरही गोदामांची व्यवस्था करण्याचा विसर या विभागाला पडत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.नुकसान झाल्यावर दखल घेणार का?आदिवासी विकास महामंडळाकडून दरवर्षी धान खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतरही गोदामांची व्यवस्था केली जात नाही. परिणामी खरेदी केलेला लाखो क्विंटल धान केवळ ताडपत्र्यांच्या भरोश्यावर उघड्यावर ठेवावा लागतो. यामुळे दरवर्षी या विभागाला लाखो रुपयांचे नुकसान देखील सहन करावे लागते. मात्र यानंतरही याची दखल घेतली नाही. त्यामुळे नुकसान झाल्यावर दखल घेणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.शेतकऱ्यांना कोण देणार नुकसान भरपाई?शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी नेणाऱ्या शेतकऱ्यांना आधीच बारदाण्याच्या अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच खरेदी केंद्रावर शेड अथवा पुरेशा प्रमाणात ताडपत्र्यांची सोय नसल्याने धान विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना विविध गैरसोयीेंना तोंड द्यावे लागत आहे. धान विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्याचे धान काटा करण्यापूर्वीच भिजल्यास त्यांना नुकसान भरपाई कोण देणार असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.बारदाण्याअभावी धान उघड्यावरआदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर अद्यापही बारदाण्याची समस्या सुटली नाही. परिणामी शेतकºयांना विक्रीसाठी आणलेला धान उघड्यावर ठेवावा लागत आहे. रविवारी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका या धानाला सुध्दा बसल्याची माहिती आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डRainपाऊस