शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
4
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
5
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
6
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
7
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
8
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
9
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
10
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
11
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
12
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
13
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
14
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
15
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
16
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
17
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
18
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
19
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
20
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स

खरेदी केंद्रावरील धानाला ताडपत्र्यांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:08 IST

जिल्ह्यात रविवारी (दि.९) रात्रीच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाचा फटका काही प्रमाणात आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावरील धानाला बसला.या मंडळाच्या जवळपास ४६ केंद्रावर खरेदी केलेला लाखो क्विंटल धान उघड्यावर पडून असून त्यांना केवळ ताडपत्र्यांचा आधार आहे.

ठळक मुद्देनुकसानीची शक्यता : गोदामांची अद्यापही व्यवस्था नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात रविवारी (दि.९) रात्रीच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाचा फटका काही प्रमाणात आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावरील धानाला बसला.या मंडळाच्या जवळपास ४६ केंद्रावर खरेदी केलेला लाखो क्विंटल धान उघड्यावर पडून असून त्यांना केवळ ताडपत्र्यांचा आधार आहे. अवकाळी पावसामुळे धान ओला होऊन नुकसान झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जातो.आदिवासी विकास महामंडळातंर्गत दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामात शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करुन हमीभावाने धान खरेदी केली जाते. मात्र दरवर्षी या विभागातर्फे खरेदी करण्यात येणारा धान सुरक्षीत ठेवण्यासाठी गोदामाची अडचण कायम असते. आठ वर्षांपूर्वी खरेदी केंद्रावरील धान उघड्यावर पडून असल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. मात्र यानंतरही शासनाने कसलाच धडा घेतलेला नाही. यंदा आदिवासी विकास महामंडळाने एकूण ४६ शासकीय धान खरेदी केंद्र सुरू केले आहे. आत्तापर्यंत या केंद्रावरुन २ लाख ४९ हजार ९५७ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. यापैकी बहुतांश धान गोदामाअभावी खरेदी केंद्रावरच पडला आहे. धानाच्या सुरक्षेकरीता ताडपत्र्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी सकाळी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका या केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानाला बसला. पावसामुळे काही केंद्रावरील धान ओले झाल्याची माहिती आहे.मात्र या संदर्भात या विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी पावसामुळे धानाचे नुकसान झाले नसल्याचे सांगितले. तसेच शासकीय धान खरेदी केंद्रावर ताडपत्र्या उपलब्ध करुन देण्यात आल्या असून गोदामाची व्यवस्था लवकरच केली जाणार असल्याचे सांगितले.दरवर्षी अवकाळी पावसामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावरील धान भिजतात. मात्र यानंतरही केंद्र सुरू झाल्यानंतरही गोदामांची व्यवस्था करण्याचा विसर या विभागाला पडत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.नुकसान झाल्यावर दखल घेणार का?आदिवासी विकास महामंडळाकडून दरवर्षी धान खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतरही गोदामांची व्यवस्था केली जात नाही. परिणामी खरेदी केलेला लाखो क्विंटल धान केवळ ताडपत्र्यांच्या भरोश्यावर उघड्यावर ठेवावा लागतो. यामुळे दरवर्षी या विभागाला लाखो रुपयांचे नुकसान देखील सहन करावे लागते. मात्र यानंतरही याची दखल घेतली नाही. त्यामुळे नुकसान झाल्यावर दखल घेणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.शेतकऱ्यांना कोण देणार नुकसान भरपाई?शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी नेणाऱ्या शेतकऱ्यांना आधीच बारदाण्याच्या अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच खरेदी केंद्रावर शेड अथवा पुरेशा प्रमाणात ताडपत्र्यांची सोय नसल्याने धान विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना विविध गैरसोयीेंना तोंड द्यावे लागत आहे. धान विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्याचे धान काटा करण्यापूर्वीच भिजल्यास त्यांना नुकसान भरपाई कोण देणार असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.बारदाण्याअभावी धान उघड्यावरआदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर अद्यापही बारदाण्याची समस्या सुटली नाही. परिणामी शेतकºयांना विक्रीसाठी आणलेला धान उघड्यावर ठेवावा लागत आहे. रविवारी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका या धानाला सुध्दा बसल्याची माहिती आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डRainपाऊस