शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

खरेदी केंद्रावरील धानाला ताडपत्र्यांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:08 IST

जिल्ह्यात रविवारी (दि.९) रात्रीच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाचा फटका काही प्रमाणात आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावरील धानाला बसला.या मंडळाच्या जवळपास ४६ केंद्रावर खरेदी केलेला लाखो क्विंटल धान उघड्यावर पडून असून त्यांना केवळ ताडपत्र्यांचा आधार आहे.

ठळक मुद्देनुकसानीची शक्यता : गोदामांची अद्यापही व्यवस्था नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात रविवारी (दि.९) रात्रीच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाचा फटका काही प्रमाणात आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावरील धानाला बसला.या मंडळाच्या जवळपास ४६ केंद्रावर खरेदी केलेला लाखो क्विंटल धान उघड्यावर पडून असून त्यांना केवळ ताडपत्र्यांचा आधार आहे. अवकाळी पावसामुळे धान ओला होऊन नुकसान झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जातो.आदिवासी विकास महामंडळातंर्गत दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामात शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करुन हमीभावाने धान खरेदी केली जाते. मात्र दरवर्षी या विभागातर्फे खरेदी करण्यात येणारा धान सुरक्षीत ठेवण्यासाठी गोदामाची अडचण कायम असते. आठ वर्षांपूर्वी खरेदी केंद्रावरील धान उघड्यावर पडून असल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. मात्र यानंतरही शासनाने कसलाच धडा घेतलेला नाही. यंदा आदिवासी विकास महामंडळाने एकूण ४६ शासकीय धान खरेदी केंद्र सुरू केले आहे. आत्तापर्यंत या केंद्रावरुन २ लाख ४९ हजार ९५७ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. यापैकी बहुतांश धान गोदामाअभावी खरेदी केंद्रावरच पडला आहे. धानाच्या सुरक्षेकरीता ताडपत्र्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी सकाळी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका या केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानाला बसला. पावसामुळे काही केंद्रावरील धान ओले झाल्याची माहिती आहे.मात्र या संदर्भात या विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी पावसामुळे धानाचे नुकसान झाले नसल्याचे सांगितले. तसेच शासकीय धान खरेदी केंद्रावर ताडपत्र्या उपलब्ध करुन देण्यात आल्या असून गोदामाची व्यवस्था लवकरच केली जाणार असल्याचे सांगितले.दरवर्षी अवकाळी पावसामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावरील धान भिजतात. मात्र यानंतरही केंद्र सुरू झाल्यानंतरही गोदामांची व्यवस्था करण्याचा विसर या विभागाला पडत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.नुकसान झाल्यावर दखल घेणार का?आदिवासी विकास महामंडळाकडून दरवर्षी धान खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतरही गोदामांची व्यवस्था केली जात नाही. परिणामी खरेदी केलेला लाखो क्विंटल धान केवळ ताडपत्र्यांच्या भरोश्यावर उघड्यावर ठेवावा लागतो. यामुळे दरवर्षी या विभागाला लाखो रुपयांचे नुकसान देखील सहन करावे लागते. मात्र यानंतरही याची दखल घेतली नाही. त्यामुळे नुकसान झाल्यावर दखल घेणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.शेतकऱ्यांना कोण देणार नुकसान भरपाई?शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी नेणाऱ्या शेतकऱ्यांना आधीच बारदाण्याच्या अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच खरेदी केंद्रावर शेड अथवा पुरेशा प्रमाणात ताडपत्र्यांची सोय नसल्याने धान विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना विविध गैरसोयीेंना तोंड द्यावे लागत आहे. धान विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्याचे धान काटा करण्यापूर्वीच भिजल्यास त्यांना नुकसान भरपाई कोण देणार असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.बारदाण्याअभावी धान उघड्यावरआदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर अद्यापही बारदाण्याची समस्या सुटली नाही. परिणामी शेतकºयांना विक्रीसाठी आणलेला धान उघड्यावर ठेवावा लागत आहे. रविवारी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका या धानाला सुध्दा बसल्याची माहिती आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डRainपाऊस