शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
3
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
4
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
6
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
7
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
8
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
9
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
10
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
11
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
12
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
13
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
14
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
15
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
16
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
17
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
18
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
19
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
20
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!

अपघात विमा जागृतीचा अभाव

By admin | Updated: June 29, 2017 00:50 IST

नैसर्गिक आपत्ती किंवा दुर्घटनेच्या स्थितीत शेतकरी कुटुंबाच्या आर्थिक मदतीसाठी राज्य शासनाद्वारे सुरू

 वर्षभरात ३७ आवेदन प्राप्त : केवळ दोन प्रस्ताव मंजूर देवानंद शहारे । लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : नैसर्गिक आपत्ती किंवा दुर्घटनेच्या स्थितीत शेतकरी कुटुंबाच्या आर्थिक मदतीसाठी राज्य शासनाद्वारे सुरू करण्यात आलेली गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना केवळ नावापुरतीच राहिली आहे. या योजनेबाबत माहितीच्या अभावामुळे अपेक्षेनुरूप शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. शेतकऱ्यांमध्ये या अपघात विमा योजनेच्या जागृतीचा अभावच दिसून येत आहे. जिल्ह्यात सन २०१६-१७ मध्ये केवळ दोन आवेदनांना मंजुरी देण्यात आली आहे. शेती व्यवसायादरम्यान वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विद्युत करंट आदी प्राकृतिक दुर्घटना; रस्ता, वाहन अपघात तथा इतर कोणत्याही कारणांमुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास किंवा शारीरिक अपंगत्वाच्या स्थितीत शेतकरी कुटुंबाला आर्थिक सहायतेसाठी राज्य शासनाद्वारे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली. कृषी विभागानुसार, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या सन २०१६-१७ मध्ये केवळ ३७ आवेदन प्राप्त झाले होते. यापैकी केवळ दोन आवेदन मंजूर करण्यात आले आहेत. नऊ प्रस्तावांमध्ये त्रुट्या आढळल्या आहेत, तर सहा पूर्ण प्रस्ताव होते. दुर्घटनेमुळे शेतकरी व त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्नाचे मार्गच बंद होवून जाते व कुटुंबाला समस्यांचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत दुर्घटनाग्रस्त शेतकरी व त्याच्या परिवाराला आर्थिक लाभासाठी कोणत्याही प्रकारची स्वतंत्र योजना नसल्यामुळे राज्य शासनाने सन २००५-०६ मध्ये शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना सुरू केली होती. यानंतर सन २००९-१० मध्ये या योजनेला शेतकरी जनता अपघात विमा योजना नाव देण्यात आले होते. सन २०१५-१६ मध्ये योजनेला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना नाव देण्यात आले. योजनेंतर्गत शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास दोन लाख रूपये, अपघातात दोन्ही डोळे किंवा दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख रूपये, एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास दोन लाख रूपये तथा एक डोळा किंवा एक अवयक निकामी झाल्यास एक लाख रूपयांच्या आर्थिक मदतीची तरतूद आहे. योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्याजवळ सातबारा, ८ अ, ६ क प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचे वयोगट १० ते ५० वर्षांदरम्यान असावे. वयासाठी तसे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. बँक खात्याची पासबुक असणे आवश्यक आहे. अपंगत्व आल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र गरजेचे आहे. सात तालुक्यातून एकही लाभार्थी नाही गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी जिल्ह्याच्या गोंदिया तालुक्यातील दोन, गोरेगाव चार, तिरोडा दोन, देवरी एक, सालेकसा दोन, आमगाव दोन व सडक-अर्जुनी तालुक्यातील पाच शेतकरी परिवारांद्वारे आवेदन करण्यात आले होते. यापैकी गोंदियातील दोन, गोरेगाव एक, तिरोडा एक, देवरी एक व आमगाव येथील एक प्रस्ताव पूर्ण आढळला. गोरेगाव तालुक्यातील तीन, तिरोडा येथील एक, आमगाव येथील एक व सडक-अर्जुनी तालुक्यातील दोन प्रस्तावांमध्ये त्रुट्या आढळल्या. त्यामुळे केवळ सडक-अर्जुनी तालुक्यातील दोन प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे, तर उर्वरित सातही तालुक्यातून एकही लाभार्थी नाही.