शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
5
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
8
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
9
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
10
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
11
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
12
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
13
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
14
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
15
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
16
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
17
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
18
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
19
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

२० हजार हेक्टरमधील पिकांवर कीडरोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:51 AM

आधी पावसाने पाठ फिरविल्याने आणि आता धानपिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्ह्यातील शेतकरी बेजार झाले आहेत.

ठळक मुद्देशासनाने दिले सर्वेक्षणाचे निर्देश : शेतकरी चिंतातूर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आधी पावसाने पाठ फिरविल्याने आणि आता धानपिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्ह्यातील शेतकरी बेजार झाले आहेत. कृषी विभागाने सुध्दा २० हजार हेक्टरमधील धान पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला असल्याचे म्हटले आहे. परिणामी जिल्ह्यातील धानपिक संकटात आल्याचे चित्र आहे.यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. पावसाचा खंड आणि ढगाळ वातावरणामुळे धानपिकांवर मोठ्या प्रमाणात मावा तुडतुडा, खोडकीडा या कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. कीडरोगांमुळे शेतकºयांना हाती आलेले पिक गमविण्याची वेळ आली आहे. कीडरोग नियंत्रणासाठी शेतकरी महागडी कीटकनाशके खरेदी करुन फवारणी करित आहे. मात्र कीडरोगासाठी पोषक वातावरण असल्याने फवारणीचा कसालाच उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. अर्जुनी-मोरगाव, सडक अर्जुनी, देवरी या तालुक्यातील धानपिकांवर कीडरोगांचा सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याची माहिती आहे. तीन दिवसांपूर्वी कीडरोगांमुळे शेतातील पूर्ण पिक फस्त झाल्याने देवलगाव येथील दोन शेतकºयांनी त्रस्त होवून साडेचार एकारातील धानपिक जाळून टाकले. आधीच कमी पावसामुळे धानाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यातच आता कीडरोगांचा प्रादुर्भाव झाल्याने केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघणार की नाही, अशी चिंता शेतकºयांना सतावित आहे.जिल्ह्यात १ लाख ८५ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. मात्र यंदा कमी पाऊस झाल्याने आधीच ७० हजार हेक्टर क्षेत्र पडीक राहिले. त्यातच आता धानाचे पिक शेतकºयांच्या हाती येण्याची स्थिती असताना २० हजार हेक्टरवरील धानपिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकºयांवर संकट ओढवले आहे. कीडरोग आणि वादळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन शेतकºयांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे.तातडीने पंचनामे कराजिल्ह्यात तीन चार दिवसांपूर्वी आलेल्या वादळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकºयांना सर्वेक्षण करुन आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेत धानपिकाच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश बुधवारी (दि.२५) जिल्हा प्रशासनाला दिले आहे. या दरम्यान कीडरोगामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण केले जाणार असल्याचीे माहिती आहे.