शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

तिरोडा आगारात पाठविल्या जातात खटारा बसेस

By admin | Updated: August 1, 2015 02:15 IST

गोंदिया-भंडारा जिल्ह्याशी प्रत्येक ठिकाणी व विभागात पक्षपात केला जातो. हा कदाचित विदर्भाला मागासलेले समजण्यात येत असण्याचाच प्रकार आहे.

काचेवानी : गोंदिया-भंडारा जिल्ह्याशी प्रत्येक ठिकाणी व विभागात पक्षपात केला जातो. हा कदाचित विदर्भाला मागासलेले समजण्यात येत असण्याचाच प्रकार आहे. अशीच बाब रा.प. परिवहन महामंडळ विभागात अनेक वर्षांपासून पहायला मिळत आहे. गोंदिया जिल्ह्यात व खास म्हणजे तिरोडा आगारात राज्यातील प्रमुख ठिकाणी वापरण्यात आलेल्या खटारा बसेस पाठविण्यात येत असल्याने प्रवाशांची मोठीच गैरसोय होत आहे. या बसेस कधीही व कुठेही बंद पडतात.ग्रामपंचायत निवडणुकीच्या एका दिवसापूर्वी तिरोडा-कोडेलोहारा-करडी ही १२ ते एक वाजताची तिरोडा आगाराची बस (एमएच ४०/एन-८५८९) नांदलपार ते लोणारा गावांच्या मध्यभागी बिघडली. ती दुरूस्त करण्याकरिता आगार व्यवस्थापकांनी (एमएच १४/बीटी-०८१२) बसवर दोन यांत्रिकांना पाठविले. मात्र दोन तास प्रयत्न करूनही त्या बसमध्ये सुधार झाला नाही. दरम्यान शनिवारी ग्रामपंचायतची निवडणूक असल्याने मतदान केंद्र अधिकाऱ्यांना सोडण्याकरिता (एमएच ४०/८९४७) बस सोडण्यात आली. रस्ता अरूंद असल्यामुळे पूर्वीच्या दोन बसेस लटकल्या होत्या. निवडणूक पार्टी घेवून जाणारी तिसरी बससुद्धा लटकली. त्यामुळे त्यांना तीन ते पाच वाजतापर्यंत तिथेच ठान मांडून रहावे लागले. या बिघडलेल्या बसमध्ये १२ ते ५.३० वाजतापर्यंत प्रवाशांची मोठीच बिकट अवस्था झाली होती. प्रवाशांजवळ लहान मुलेसुद्धा होते. सर्व प्रयत्न झाल्यानंतर शेवटी १० ते १२ प्रवाशांनी बिघडलेल्या बसला २०० ते ३०० मीटरपर्यंत ढकलत नेले व गाडी निघेल अशी जागा तयार करण्यात आली. तेव्हा सायंकाळी ५ ते ५.३० वाजेदरम्यान गाड्या सोडण्यात आल्या. निवडणूक अधिकारी सहा वाजता आपल्या गंतव्य स्थळी पोहोचले. दरम्यान त्यांना मोठाच त्रास सहन करावा लागला. तिरोडा आगाराला नेहमीच खटारा बसेस पाठविण्यात आल्या. राज्यभरातील विविध आगारात वापरलेल्या बसेस या आगारात पाठविल्या जातात. त्या कधी व कुठे बंद पडतील व प्रवाशांची गैरसोय होईल, हे सांगता येत नाही. (वार्ताहर)