शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

तिरोडा आगारात पाठविल्या जातात खटारा बसेस

By admin | Updated: August 1, 2015 02:15 IST

गोंदिया-भंडारा जिल्ह्याशी प्रत्येक ठिकाणी व विभागात पक्षपात केला जातो. हा कदाचित विदर्भाला मागासलेले समजण्यात येत असण्याचाच प्रकार आहे.

काचेवानी : गोंदिया-भंडारा जिल्ह्याशी प्रत्येक ठिकाणी व विभागात पक्षपात केला जातो. हा कदाचित विदर्भाला मागासलेले समजण्यात येत असण्याचाच प्रकार आहे. अशीच बाब रा.प. परिवहन महामंडळ विभागात अनेक वर्षांपासून पहायला मिळत आहे. गोंदिया जिल्ह्यात व खास म्हणजे तिरोडा आगारात राज्यातील प्रमुख ठिकाणी वापरण्यात आलेल्या खटारा बसेस पाठविण्यात येत असल्याने प्रवाशांची मोठीच गैरसोय होत आहे. या बसेस कधीही व कुठेही बंद पडतात.ग्रामपंचायत निवडणुकीच्या एका दिवसापूर्वी तिरोडा-कोडेलोहारा-करडी ही १२ ते एक वाजताची तिरोडा आगाराची बस (एमएच ४०/एन-८५८९) नांदलपार ते लोणारा गावांच्या मध्यभागी बिघडली. ती दुरूस्त करण्याकरिता आगार व्यवस्थापकांनी (एमएच १४/बीटी-०८१२) बसवर दोन यांत्रिकांना पाठविले. मात्र दोन तास प्रयत्न करूनही त्या बसमध्ये सुधार झाला नाही. दरम्यान शनिवारी ग्रामपंचायतची निवडणूक असल्याने मतदान केंद्र अधिकाऱ्यांना सोडण्याकरिता (एमएच ४०/८९४७) बस सोडण्यात आली. रस्ता अरूंद असल्यामुळे पूर्वीच्या दोन बसेस लटकल्या होत्या. निवडणूक पार्टी घेवून जाणारी तिसरी बससुद्धा लटकली. त्यामुळे त्यांना तीन ते पाच वाजतापर्यंत तिथेच ठान मांडून रहावे लागले. या बिघडलेल्या बसमध्ये १२ ते ५.३० वाजतापर्यंत प्रवाशांची मोठीच बिकट अवस्था झाली होती. प्रवाशांजवळ लहान मुलेसुद्धा होते. सर्व प्रयत्न झाल्यानंतर शेवटी १० ते १२ प्रवाशांनी बिघडलेल्या बसला २०० ते ३०० मीटरपर्यंत ढकलत नेले व गाडी निघेल अशी जागा तयार करण्यात आली. तेव्हा सायंकाळी ५ ते ५.३० वाजेदरम्यान गाड्या सोडण्यात आल्या. निवडणूक अधिकारी सहा वाजता आपल्या गंतव्य स्थळी पोहोचले. दरम्यान त्यांना मोठाच त्रास सहन करावा लागला. तिरोडा आगाराला नेहमीच खटारा बसेस पाठविण्यात आल्या. राज्यभरातील विविध आगारात वापरलेल्या बसेस या आगारात पाठविल्या जातात. त्या कधी व कुठे बंद पडतील व प्रवाशांची गैरसोय होईल, हे सांगता येत नाही. (वार्ताहर)