शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यात यंदा २ लाख २० हजार हेक्टरवर खरिपाची लागवड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 15:12 IST

Gondia News गोंदिया जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात २ लाख २० हजार हेक्टरवर विविध पिकांची लागवड करण्यात येणार असून त्यासाठी बळीराजा सज्ज झाला आहे.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे, खरीप हंगामाच्या कामाला सुरुवातधानाचे क्षेत्र सर्वाधिक

 लोकमत न्यूज नेटवर्क  गोंदिया : कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून बळीराजा अनेक संकटांना तोंड देत आहे. मात्र, यामुळे खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने खरीप हंगामाच्या कामाला लागला आहे. मृग नक्षत्राला सुरुवात होण्यापूर्वी खरिपातील पेरणीपूर्व कामे आटोपण्याचा प्रयत्न करीत आहे. यंदा खरीप हंगामात २ लाख २० हजार हेक्टरवर विविध पिकांची लागवड करण्यात येणार असून त्यासाठी बळीराजा सज्ज झाला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे उत्पादन घेतले जाते. खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक लागवडीसाठी २ लाख २० हजार २४० हेक्टर क्षेत्र निर्धारित करण्यात आला आहे. यापैकी १ लाख ८६ हजार ४३१ हेक्टर क्षेत्रावर धानाची लागवड केली जाणार आहे. उर्वरित क्षेत्रात तूर, तीळ, हळद, आले, मका, सोयाबीन, ऊस व भाजीपाला पिकांची लागवड केली जाणार आहे. लागवड क्षेत्रापैकी १ लाख ६ हजार ३२३ हेक्टर क्षेत्र खरीप सिंचनाखाली आहे. जिल्ह्यात सुमारे २ लाख ७२ हजार १७८ शेतकरी आहेत. कृषी विभागाने खरीप हंगामासाठी ४८९६० क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे. त्यापैकी २३३६७ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. मागील खरीप हंगामात ५६९४३ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला होता. ९७७०४ मेट्रिक टन खताच्या मागणीपैकी ८१३२ मेट्रिक टन खताचा पुरवठा झाला आहे. सद्यस्थितीत २३९८९ मेट्रिक टन खताचा साठा असल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे.

शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त

शेतकरी हंगामपूर्व शेत मशागतीच्याकामात व्यस्त आहे. बियाणे, खते, कीटकनाशके व कृषी साहित्य खरेदीचे नियोजन बळीराजाने केले आहे. अनेक शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्ज उपलब्ध झाले नसल्याने त्यांना बँकांच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. भरघोस उत्पन्नाची अपेक्षा मनात बाळगून जगाचा पोशिंदा पूर्ण उमेदीने खरीप हंगामात पीक लागवडीसाठी सज्ज झाल्याचे चित्र आहे.

भरारी पथकांची राहणार नजर

कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. बियाणे, खतांची मागणी नोंदविण्यात आली आहे. यापैकी २३३६७ क्विंटल बियाणे व ८१३२ मेट्रिक टन खताचा पुरवठा झाला आहे. निर्धारित किमतीपेक्षा अधिक दराने कृषी निविष्ठांची विक्री करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. अधिक दराने बियाणे खते व अन्य कृषी निविष्ठांची विक्री करणाऱ्यांची तक्रार आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेती