शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
5
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
6
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
7
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
8
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
9
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
10
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
11
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
12
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
13
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
14
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
15
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
16
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
17
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
18
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
19
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
20
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?

विमा ग्राम पुरस्काराने केशोरी ग्रामपंचायत सन्मानित

By admin | Updated: October 17, 2015 02:32 IST

भारतीय जीवन विमा निगम शाखा साकोलीकडून सन २०१४-१५ या वर्षात बिमा ग्राम योजनेंतर्गत केशोरी...

केशोरी : भारतीय जीवन विमा निगम शाखा साकोलीकडून सन २०१४-१५ या वर्षात बिमा ग्राम योजनेंतर्गत केशोरी ग्रामपंचायत पात्र ठरल्यामुळे पारितोषिक धनादेश वितरण कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.सदस्या तेजूकला गहाणे, प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच अश्विनी मालाधरे, उपसरपंच हिरालाल पाटील शेंडे, शाखा व्यवस्थापक जांगळेकर, विकास अधिकारी धनंजय हेडाऊ, ग्रा.पं. सदस्य नंदू पाटील गहाणे, श्रीकांत घाटबांधे, वसंत नंदरधने, मनोहर ठाकरे महाराज, श्रीमती ममता समरीत, स्रेहा झोडे, विमा प्रतिनिधी, मुरलीधर ठलाल, संतोष बुकावन, धनंजय तिडके, गौतम तिरपुडे उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी विमा ग्राम योजनेंतर्गत केशोरी ग्रामपंचायतीला ५० हजार रुपयाचे धनादेश मा.जी.वि.मि.शाखा व्यवस्थापक जोगळेकर, सरपंच अश्विनी भालाधरे आणि उपसरपंच हिरालाल शेंडे यांच्या हस्ते देण्यात आले.याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी भारतीय जीवन विमा निगम कडून गावासाठी राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती सांगितली. यावेळी गावकऱ्यांना विम्याचे महत्व सांगण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत केशोरी येथील सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी केशोरी हे गाव विमा ग्राम करण्याचा संकल्प व्यक्त केला. संचालन भगवान गायकवाड यांनी केले तर आभार ग्राम विकास अधिकारी कुटे यांनी मानले. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. (वार्ताहर)