शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

स्वयंरोजगाराची कास धरा

By admin | Updated: January 13, 2015 23:02 IST

विदर्भ हा कोणत्याही बाबतीत मागासलेला नसून आता येथील युवकांनी येथील जमीन, पाणी, वन, गौणखनिज आदी नैसर्गिक स्त्रोतांच्या माध्यमातून व शिक्षणासह स्वकौशल्याच्या बळावर

अनिल सोले यांचा सल्ला : भाजयुमोचा रोजगार मार्गदर्शन मेळावागोंदिया : विदर्भ हा कोणत्याही बाबतीत मागासलेला नसून आता येथील युवकांनी येथील जमीन, पाणी, वन, गौणखनिज आदी नैसर्गिक स्त्रोतांच्या माध्यमातून व शिक्षणासह स्वकौशल्याच्या बळावर रोजगार निर्मिती करावी, असे आवाहन आमदार प्रा. अनिल सोले यांनी केले.भारतीय जनता युवा मोर्चातर्फे १२ जानेवारी रोजी युवा दिनानिमित्त पवार बोर्डिंग येथे आयोजित रोजगार मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल होते. मंचावर प्रामुख्याने खासदार नाना पटोले, जिल्हा परिषद सभापती प्रकाश गहाणे, जिल्हा महामंत्री संतोष चव्हाण, भाजयुमो जिल्हाध्यक्ष संजय कुळकर्णी, भाजप शहर अध्यक्ष भरत क्षत्रीय, जयंत शुक्ला, सविता इसरका, मुनाफ कुरेशी, डॉ. सुवर्णा हुबेकर, ऋशीकांत साहू, डॉ. लक्ष्मण भगत, दुर्गाप्रसाद नागभिरे, पंकज सोनवाने, शुक्राचार्य ठाकरे, तानाजी लंजे, देवचंद नागपूरे, विकास पटले, गुड्डू डोंगरवार, संदीप कापगते, निलेश दमाहे, मनोज दमाहे, राजेश शाह आदी उपस्थित होते.भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. स्वामी विवेकानंद यांचा आदर्श जोपासत केंद्र व राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देशाच्या विकासाकरीता युवाशक्तीचा वापर करुन भारताला जगापुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे. रोजगाराभिमुख विकास हा राज्य व केंद्राचा प्रमुख कार्यक्रम आहे. आजघडीला रोजगाराच्या अपरिमित संधी निर्माण होत असून कौशल्यप्राप्त मुनष्यबळाची मोठी आवश्यकता आहे. त्यामुळे युवकांनी पुस्तकी ज्ञानासोबत स्वकौशल्य विकसीत करुन केवळ नोकरीच नव्हे तर उद्योग व व्यवसायाकडे वळावे असे आ.सोले म्हणाले. विदर्भातील युवकांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी माहिती मिळावी, यासाठी नागपूर येथे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यातून युवकांना रोजगाराची दिशा मिळणार आहे. यावेळी खासदार पटोले यांनी, गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी अनेक प्रकल्पांचा विचार सुरु असून त्याकरीता केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. लवकरच या माध्यमातून क्षेत्राचा विकास साधला जाणार असल्याचे सांगितले. जिल्हाध्यक्ष अग्रवाल यांनी, युवकांना स्वामी विवेकानंदांच्या विचारांपासून संधी निर्माण करुन देशाला पुढे नेले. आता पंतप्रधान मोदी देशातील युवकांच्या शक्ती व कौशल्यावर विश्वास ठेवून भारताला विश्वगुरु करण्याचे स्वप्न बघत आहेत. त्याकरीता युवकांनी परिश्रम करुन संधीचे सोने करावे, असे आवाहन केले . दरम्यान आ. प्रा. सोले यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून युवकांना रोजगारा संदर्भात मार्गदर्शनपर चित्रफित दाखविली. यावेळी अनेक युवकांनी भाजयुमोमध्ये प्रवेश केला. संचालन मुकेश चन्ने यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजयुमो जिल्हाध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी मांडले. आभार शुक्राचार्य ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी निकुंज साहू, रोहित अग्रवाल, निरज ठाकूर, छोटू भाटिया, छोटू रामटेककर, दिलीप पिल्ले, सतीश मेश्राम, बाबा बिसेन, संदीप पटले, शैलेश ढाले, विवेक भुंबर, रंजित नागपूरे, अनुराग शुक्ला, प्रसन्ना ठाकूर, राजेंद्र कावळे, गोल्डी गावंडे, गोल्डी मारवाहे, कनिराम तवाडे, योगेंद्र हरिणखेडे, कुणाल बिसेन, कमलेश सोनवाने, प्रकाश पटले, संजय जगने, ज्ञानचंद जमईवार, फणेंद्र पटले, कमलेश आतीलकर, कमलेश चुटे, कुशल अग्रवाल यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदादिकारी व सदस्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)