शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

तलावांचा जिल्हा पाण्यासाठी कासाविस

By admin | Updated: March 22, 2016 02:17 IST

तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिध्द असलेल्या गोंदिया जिल्ह्याच्या मुख्यालयी केटीएस सामान्य जिल्हा रूग्णालय, बाई

गोंदिया : तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिध्द असलेल्या गोंदिया जिल्ह्याच्या मुख्यालयी केटीएस सामान्य जिल्हा रूग्णालय, बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय किंवा बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने रूग्णांच्या नातेवाईकांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागते. रुग्णसेवेसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना पिण्याच्या पाण्याची सोय होऊ नये, ही बाब दुर्दैवी ठरत आहे.गोंदिया एसटी बसच्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी हॉटेल, दुकानवर अवलंबून राहावे लागते. ज्यांची हॉटेलमध्ये पाय ठेवायची ऐपत नाही त्यांना एखाद्या घरातून पिण्याचे पाणी मागून आपली तहान भागवावी लागते.जिल्ह्यातील साडेतेरा लाख लोकसंख्येसाठी कोट्यवधी रुपये खर्चुनी जिल्हा सामान्य रूग्णालय उभारण्यात आले. येथे दररोज रूग्णांची गर्दी असते. परंतु रूग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याची येथे सोय नाही. गंगाबाई रुग्णालयात बाहेरील बोअरवेलचे अशुद्ध पाणी आणून रूग्णाचे नातेवाईक स्वयंपाक करतात. तर काही जण बाहेरून जेवनाचा डबा बोलावतात. त्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने बाहेरून पाणी आणावे लागते. रूग्णांच्या नातेवाईकांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी समोरील रस्ता ओलांडून जावे लागते. हा रस्ता वर्दळीचा असल्याने अपघातही होऊ शकतो. केटीएसमधील पिण्याच्या पाण्याची भिषण समस्या रूग्णांच्या नातेवाईकांसाठी जीवघेणी ठरू शकते. बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात फक्त एकच नळ रूग्णांच्या नातेवाईकांसाठी आहे. एक बोरवेल आहे. परंतु ती सुद्धा बंद पडली असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या रूग्णांच्या शेकडो नातेवाईकांना रुग्णालयाच्या बाहेरील बोरवेलवरून पाणी आणावे लागते. विशेष या या रुग्णालयाच्या बाहेर विविध भागातून गोळा केलेला कचरा उघड्यावर टाकला जातो. तिथे अतिशय घाण परिसर आहे. जुन्या बोअरवेलमध्ये औषधी टाकली जात नसतानाही येथील पाणी रूग्णांचे नातेवाईक वापरत आहेत. त्यामुळे ते आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.गोंदिया शहरातील बसस्थानक दरवर्षी कोट्यवधीचा नफा देणारे आहे. प्रवाश्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने प्रवाश्यांना पाण्याच्या शोधासाठी इतरत्र भटकावे लागते. या बस स्थानकावरील प्रवाश्यांना पाण्यासाठी रस्ता ओलांडून हॉटेलमधून किंवा इतर ठिकाणातून पाणी आणण्याचा प्रयत्न होत असताना अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी जीव कासावीस होत असताना रुग्णांच्या नातेवाईकांना, प्रवाशांना भटकावे लागण्याची वेळ येऊ नये, अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)