शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

तलावांचा जिल्हा पाण्यासाठी कासाविस

By admin | Updated: March 22, 2016 02:17 IST

तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिध्द असलेल्या गोंदिया जिल्ह्याच्या मुख्यालयी केटीएस सामान्य जिल्हा रूग्णालय, बाई

गोंदिया : तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिध्द असलेल्या गोंदिया जिल्ह्याच्या मुख्यालयी केटीएस सामान्य जिल्हा रूग्णालय, बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय किंवा बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने रूग्णांच्या नातेवाईकांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागते. रुग्णसेवेसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना पिण्याच्या पाण्याची सोय होऊ नये, ही बाब दुर्दैवी ठरत आहे.गोंदिया एसटी बसच्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी हॉटेल, दुकानवर अवलंबून राहावे लागते. ज्यांची हॉटेलमध्ये पाय ठेवायची ऐपत नाही त्यांना एखाद्या घरातून पिण्याचे पाणी मागून आपली तहान भागवावी लागते.जिल्ह्यातील साडेतेरा लाख लोकसंख्येसाठी कोट्यवधी रुपये खर्चुनी जिल्हा सामान्य रूग्णालय उभारण्यात आले. येथे दररोज रूग्णांची गर्दी असते. परंतु रूग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याची येथे सोय नाही. गंगाबाई रुग्णालयात बाहेरील बोअरवेलचे अशुद्ध पाणी आणून रूग्णाचे नातेवाईक स्वयंपाक करतात. तर काही जण बाहेरून जेवनाचा डबा बोलावतात. त्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने बाहेरून पाणी आणावे लागते. रूग्णांच्या नातेवाईकांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी समोरील रस्ता ओलांडून जावे लागते. हा रस्ता वर्दळीचा असल्याने अपघातही होऊ शकतो. केटीएसमधील पिण्याच्या पाण्याची भिषण समस्या रूग्णांच्या नातेवाईकांसाठी जीवघेणी ठरू शकते. बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात फक्त एकच नळ रूग्णांच्या नातेवाईकांसाठी आहे. एक बोरवेल आहे. परंतु ती सुद्धा बंद पडली असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या रूग्णांच्या शेकडो नातेवाईकांना रुग्णालयाच्या बाहेरील बोरवेलवरून पाणी आणावे लागते. विशेष या या रुग्णालयाच्या बाहेर विविध भागातून गोळा केलेला कचरा उघड्यावर टाकला जातो. तिथे अतिशय घाण परिसर आहे. जुन्या बोअरवेलमध्ये औषधी टाकली जात नसतानाही येथील पाणी रूग्णांचे नातेवाईक वापरत आहेत. त्यामुळे ते आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.गोंदिया शहरातील बसस्थानक दरवर्षी कोट्यवधीचा नफा देणारे आहे. प्रवाश्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने प्रवाश्यांना पाण्याच्या शोधासाठी इतरत्र भटकावे लागते. या बस स्थानकावरील प्रवाश्यांना पाण्यासाठी रस्ता ओलांडून हॉटेलमधून किंवा इतर ठिकाणातून पाणी आणण्याचा प्रयत्न होत असताना अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी जीव कासावीस होत असताना रुग्णांच्या नातेवाईकांना, प्रवाशांना भटकावे लागण्याची वेळ येऊ नये, अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)