शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
5
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
7
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
8
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
9
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
10
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
11
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
12
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
13
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
14
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
15
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
16
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
17
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
18
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
19
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
20
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा

तलावांचा जिल्हा पाण्यासाठी कासाविस

By admin | Updated: March 22, 2016 02:17 IST

तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिध्द असलेल्या गोंदिया जिल्ह्याच्या मुख्यालयी केटीएस सामान्य जिल्हा रूग्णालय, बाई

गोंदिया : तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिध्द असलेल्या गोंदिया जिल्ह्याच्या मुख्यालयी केटीएस सामान्य जिल्हा रूग्णालय, बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय किंवा बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने रूग्णांच्या नातेवाईकांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागते. रुग्णसेवेसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना पिण्याच्या पाण्याची सोय होऊ नये, ही बाब दुर्दैवी ठरत आहे.गोंदिया एसटी बसच्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी हॉटेल, दुकानवर अवलंबून राहावे लागते. ज्यांची हॉटेलमध्ये पाय ठेवायची ऐपत नाही त्यांना एखाद्या घरातून पिण्याचे पाणी मागून आपली तहान भागवावी लागते.जिल्ह्यातील साडेतेरा लाख लोकसंख्येसाठी कोट्यवधी रुपये खर्चुनी जिल्हा सामान्य रूग्णालय उभारण्यात आले. येथे दररोज रूग्णांची गर्दी असते. परंतु रूग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याची येथे सोय नाही. गंगाबाई रुग्णालयात बाहेरील बोअरवेलचे अशुद्ध पाणी आणून रूग्णाचे नातेवाईक स्वयंपाक करतात. तर काही जण बाहेरून जेवनाचा डबा बोलावतात. त्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने बाहेरून पाणी आणावे लागते. रूग्णांच्या नातेवाईकांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी समोरील रस्ता ओलांडून जावे लागते. हा रस्ता वर्दळीचा असल्याने अपघातही होऊ शकतो. केटीएसमधील पिण्याच्या पाण्याची भिषण समस्या रूग्णांच्या नातेवाईकांसाठी जीवघेणी ठरू शकते. बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात फक्त एकच नळ रूग्णांच्या नातेवाईकांसाठी आहे. एक बोरवेल आहे. परंतु ती सुद्धा बंद पडली असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या रूग्णांच्या शेकडो नातेवाईकांना रुग्णालयाच्या बाहेरील बोरवेलवरून पाणी आणावे लागते. विशेष या या रुग्णालयाच्या बाहेर विविध भागातून गोळा केलेला कचरा उघड्यावर टाकला जातो. तिथे अतिशय घाण परिसर आहे. जुन्या बोअरवेलमध्ये औषधी टाकली जात नसतानाही येथील पाणी रूग्णांचे नातेवाईक वापरत आहेत. त्यामुळे ते आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.गोंदिया शहरातील बसस्थानक दरवर्षी कोट्यवधीचा नफा देणारे आहे. प्रवाश्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने प्रवाश्यांना पाण्याच्या शोधासाठी इतरत्र भटकावे लागते. या बस स्थानकावरील प्रवाश्यांना पाण्यासाठी रस्ता ओलांडून हॉटेलमधून किंवा इतर ठिकाणातून पाणी आणण्याचा प्रयत्न होत असताना अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी जीव कासावीस होत असताना रुग्णांच्या नातेवाईकांना, प्रवाशांना भटकावे लागण्याची वेळ येऊ नये, अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)