शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
5
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
6
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
7
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
8
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
9
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
10
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
11
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी कामधेनू प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 23:33 IST

जिल्ह्यात सर्वाधिक धानाची शेती केली जाते. मात्र मागील चार पाच वर्षांपासून बदलते वातावरण आणि नैसर्गिक संकटाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे धानाची शेती घाट्याचा सौदा होत चालली आहे.

ठळक मुद्देअदानी फाऊंडेशन : शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे धडे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात सर्वाधिक धानाची शेती केली जाते. मात्र मागील चार पाच वर्षांपासून बदलते वातावरण आणि नैसर्गिक संकटाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे धानाची शेती घाट्याचा सौदा होत चालली आहे. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावत चालली आहे. शेतकऱ्यांना शेतीवर आधारित जोडधंदे उपलब्ध करुन देऊन त्यांचा आर्थिकस्तर उंचाविण्यासाठी अदानी फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. कामधेनू प्रकल्पाच्या माध्यमातून २७ गावांमध्ये दुग्ध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जात आहे.शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध उत्पादन हा उत्तम जोडधंदा आहे. गायी, म्हशी यांच्या मलमुत्रापासून शेतकऱ्यांना नि:शुल्क सेंद्रिय खत सुध्दा मिळते. शिवाय दुधाच्या विक्रीतून चारपैसे देखील मिळत असल्याने वर्षभर कुुंटुंबांचा उदरनिर्वाह चालविण्यास शेतकऱ्यांना मदत होवू शकते.जिल्ह्यात दुधाळू जनावरांची संख्या दीड लाखावर आहे. मात्र दुधाळू जनावरांना पौष्टीक आहार आणि त्यांच्या योग्य संगोपनाची माहिती बऱ्याच शेतकऱ्यांना नाही. त्यामुळे त्याचा परिणाम दुग्ध उत्पादनावर होतो. अदानी फाऊंडेशनने नेमकी हीच बाब हेरून तिरोडा तालुक्यातील २७ गावांची निवड करुन तिथे दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी कामधेनू प्रकल्प राबविण्यास सुरूवात केली आहे.या प्रकल्पातंर्गत निवड केलेल्या गावातील दुधाळू जनावरांची नियमित तपासणी, कृत्रीम रेतन, प्रतिबंधात्मक लसीकरण व शेतकºयांना तज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना मार्फत मार्गदर्शन केले जात आहे. अदानी फाऊंडेशन द्वारा राबविण्यात येणाऱ्या कामधेनू प्रकल्पांतर्गत कृत्रीम रेतनाद्वारे जन्मास आलेल्या नवजात गिर, साहीवाल, थारपारकर आणि मुर्रा जातीच्या वासरांना पाहुन शेतकºयांना गोपालनाची प्रेरणा मिळत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकºयांना शेतीला जोडधंदा उपलब्ध व्हावा तसेच जिल्ह्यातील दुग्ध उत्पादनात वाढ व्हावी हा उद्देश असल्याचे अदानी फाऊंडेशनचे प्रकल्प प्रमुख नितीन शिराळकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.प्रदर्शनीतून सेंद्रिय शेतीवर मार्गदर्शनशेतीमध्ये रासायनिक खताच्या अतिवापरामुळे शेत जमीन निकृष्ट होत चालली आहे. त्याचा उत्पादनावर परिणाम होत असून शेतकऱ्यांनी वेळीच सावध होत सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे. सेंद्रिय शेतीचे अनेक फायदे असून यामुळे खर्चाची सुध्दा बचत होते. सेंद्रिय शेती करण्याकरीता गांडूळ खत, दर्शपर्णी अर्क, निमास्त्र, ब्रम्हास्त्र व अग्नीअस्त्र या कीड नियंत्रकांचा वापर करण्याचा सल्ला शेतकºयांना प्रदर्शनीचे आयोजन करुन फाऊंडेशन अंतर्गत दिला जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीcowगाय