शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी कामधेनू प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 23:33 IST

जिल्ह्यात सर्वाधिक धानाची शेती केली जाते. मात्र मागील चार पाच वर्षांपासून बदलते वातावरण आणि नैसर्गिक संकटाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे धानाची शेती घाट्याचा सौदा होत चालली आहे.

ठळक मुद्देअदानी फाऊंडेशन : शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे धडे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात सर्वाधिक धानाची शेती केली जाते. मात्र मागील चार पाच वर्षांपासून बदलते वातावरण आणि नैसर्गिक संकटाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे धानाची शेती घाट्याचा सौदा होत चालली आहे. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावत चालली आहे. शेतकऱ्यांना शेतीवर आधारित जोडधंदे उपलब्ध करुन देऊन त्यांचा आर्थिकस्तर उंचाविण्यासाठी अदानी फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. कामधेनू प्रकल्पाच्या माध्यमातून २७ गावांमध्ये दुग्ध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जात आहे.शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध उत्पादन हा उत्तम जोडधंदा आहे. गायी, म्हशी यांच्या मलमुत्रापासून शेतकऱ्यांना नि:शुल्क सेंद्रिय खत सुध्दा मिळते. शिवाय दुधाच्या विक्रीतून चारपैसे देखील मिळत असल्याने वर्षभर कुुंटुंबांचा उदरनिर्वाह चालविण्यास शेतकऱ्यांना मदत होवू शकते.जिल्ह्यात दुधाळू जनावरांची संख्या दीड लाखावर आहे. मात्र दुधाळू जनावरांना पौष्टीक आहार आणि त्यांच्या योग्य संगोपनाची माहिती बऱ्याच शेतकऱ्यांना नाही. त्यामुळे त्याचा परिणाम दुग्ध उत्पादनावर होतो. अदानी फाऊंडेशनने नेमकी हीच बाब हेरून तिरोडा तालुक्यातील २७ गावांची निवड करुन तिथे दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी कामधेनू प्रकल्प राबविण्यास सुरूवात केली आहे.या प्रकल्पातंर्गत निवड केलेल्या गावातील दुधाळू जनावरांची नियमित तपासणी, कृत्रीम रेतन, प्रतिबंधात्मक लसीकरण व शेतकºयांना तज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना मार्फत मार्गदर्शन केले जात आहे. अदानी फाऊंडेशन द्वारा राबविण्यात येणाऱ्या कामधेनू प्रकल्पांतर्गत कृत्रीम रेतनाद्वारे जन्मास आलेल्या नवजात गिर, साहीवाल, थारपारकर आणि मुर्रा जातीच्या वासरांना पाहुन शेतकºयांना गोपालनाची प्रेरणा मिळत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकºयांना शेतीला जोडधंदा उपलब्ध व्हावा तसेच जिल्ह्यातील दुग्ध उत्पादनात वाढ व्हावी हा उद्देश असल्याचे अदानी फाऊंडेशनचे प्रकल्प प्रमुख नितीन शिराळकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.प्रदर्शनीतून सेंद्रिय शेतीवर मार्गदर्शनशेतीमध्ये रासायनिक खताच्या अतिवापरामुळे शेत जमीन निकृष्ट होत चालली आहे. त्याचा उत्पादनावर परिणाम होत असून शेतकऱ्यांनी वेळीच सावध होत सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे. सेंद्रिय शेतीचे अनेक फायदे असून यामुळे खर्चाची सुध्दा बचत होते. सेंद्रिय शेती करण्याकरीता गांडूळ खत, दर्शपर्णी अर्क, निमास्त्र, ब्रम्हास्त्र व अग्नीअस्त्र या कीड नियंत्रकांचा वापर करण्याचा सल्ला शेतकºयांना प्रदर्शनीचे आयोजन करुन फाऊंडेशन अंतर्गत दिला जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीcowगाय