शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या

By admin | Updated: November 15, 2014 01:47 IST

तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनिय आहे. कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ त्यात ...

अर्जुनी/मोरगाव : तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनिय आहे. कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ त्यात धानावर किडींचा प्रादुर्भाव यामुळे धान उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन शेतकरी डबघाईस येतो व शेतकरी कर्ज बजारी होऊन आत्महत्याकरीत आहेत. अर्जुनी/मोर तालुका हा धान उत्पादनाचा तालुका असल्याने विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना नव्या सरकारने न्याय देण्याची मागणी तालुका काँग्रेस कमेटीच्यावतीने नायब तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. अर्जुनी/मोर तालुक्यात हलक्या व भारी धानाचे पिक निघने सुरु झाले असले तरी धानखरेदी हमीभाव केंद्र सुरु न झाल्याने पडक्या भावात शेतकऱ्यांना धान व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील खोकरी येथील चंदू निंबार्ते या ७० वर्षिय शेतकऱ्यांनी त्यांच्यावरील थकीत कर्ज व व्याज असे एकूण पाच लाख ३७ हजार ३७५ रूपयांच्या वसुलीची नोटीसपाहून ६ नोव्हेंबर रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली. लोकप्रतिनिधींना त्यांच्या आत्महत्येची कल्पना देण्यात आली. परंतु कुणीही भेट दिली नाही. शेवटी काँग्रेस नेत्यांनी रेटा लावल्याने १० नोव्हेंबर रोजी आत्महत्येचा अहवाल तयार करुन तहसील कार्यालयाला सादर करण्यात आला. सदर शेतकऱ्यांची आत्महत्या म्हणून नोंद करुन मृतकावर असलेल्या कर्जाची योग्य विल्हेवाट लाऊन त्यांच्या कुटुंबास आत्महत्येच्या निकषानुसार सहकार्य देण्यात यावे. सदर गावात बऱ्याच शेतकऱ्यांना कर्ज वसुलीचे नोटीस बजावण्यात आल्याने गावात दहशत पसरली आहे.धान उत्पादक शेतकरी अन्य शेतकऱ्यांच्या तुलनेत अत्यंत दुर्लक्षीत आहेत व वेळोवेळी येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीने कमी अधीक पावसाने सतत उत्पादनात घट होत असते. तसेच उत्पादीत मालाला योग्य भाव नाही. त्यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावत आहे. तरी त्यांच्या उत्पादीत मालाला योग्य भाव व निवडणुकापुर्वी सतत सातबारा कोरा करण्याची चर्चा या दोन्ही बाबींवर गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. अन्यथा पश्चिम विदर्भासारखे आत्महत्येचे प्रमाण वाढल्याशिवाय राहणार नाही.महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या हिताकरीता सर्वत्र कृषी उत्पन्न बाजार समित्या निर्माण झाल्या असून शासनाकडून कोट्यवधींची रक्कम तेथील सुविधांवर खर्च केली आहे. परंतु प्रत्यक्षात बाजार समितीच्या यार्डवर शेतमालाची खरेदी होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव तर मिळत नाही. परंतु व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात फसगत होत आहे. बाजार समित्या आपली उद्दिष्टपुर्ती करीत नसल्याने अशा समित्या बरखास्त करुन प्रशासक नेमावे व बाजार समित्यांचा नुकताच होणारा राजकीय वापर थांबवावा. राज्यात बऱ्याच वर्षांपासून हमी भाव केंद्र सुरु करुन त्यांचे मार्फत शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करण्यात येत होती. परंतु सुरु हंगामात अजुनपर्यंत खरेदी केंद्र सुरु झाले नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. खाजगी व्यापारी त्यांचा गैरफायदा घेत आहेत. या सर्व समस्या तातडीने सोडविण्याच्या हेतुने तालुका काँग्रेस कमेटी तर्फे नायब तहसीलदार डडमल यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.निवेदन देताना तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष भागवत नाकाडे, विशाखा साखरे, जगदीश मोहबंसी ललीतचंद्र राजाभोज, रुशी पुस्तोडे, सुरेंद्रकुमार ठवरे, कृष्णा शहारे, लिलाधर ताराम, बंसीधर लंजे, विालास गायकवाड, देवीदास साखरी, बब्बु भंडारी, मोरेवर सोनवाने, अरविंद पालिवाल व अन्य उपस्थित होते.