शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

सिंचनासाठी इटियाडोह व पुजारीटोलाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:25 IST

धो-धो बरसल्यानंतर आता मागील १५ दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसामुळे रोवणी धोक्यात आली आहे. परिणामी शेतकरी चिंतेत असून रोवणी वाचविण्यासाठी पाण्याची मागणी करीत आहेत. यामुळे सिंचनासाठी इटियाडोह व पुजारीटोला प्रकल्पांचे पाणी सोडले जात आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात पावसाने मारली दडी : पाण्याअभावी शेतकरी चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : धो-धो बरसल्यानंतर आता मागील १५ दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसामुळे रोवणी धोक्यात आली आहे. परिणामी शेतकरी चिंतेत असून रोवणी वाचविण्यासाठी पाण्याची मागणी करीत आहेत. यामुळे सिंचनासाठी इटियाडोह व पुजारीटोला प्रकल्पांचे पाणी सोडले जात आहे.मध्यंतरी वरूणराज चांगलेच बरसले होते. त्यामुळे रोवणीची कामे जोमात झाली. मात्र आता मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. अचानक पावसाने दडी मारल्यामुळे झालेल्या रोवणीला पाण्याची गरज आहे. तर ज्यांची रोवणी झाली नाही त्यांनाही रोवणी करण्यासाठी पाण्याची गरज आहे. मात्र पाऊस बरसत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत अडकला आहे. मागील वर्षी पावसाने दगा दिल्याने पुर्ण हंगाम हातून निघाला होता. यंदाही तीच परिस्थिती निर्माण तर होणार नाही अशी चिंता त्यांना भेडसावत आहे. अशात प्रकल्पातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत.शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेत २७ जुलैपासून इटियाडोह प्रकल्पातून पाणी कालव्यांत सोडले जात होते. तर ३ तारखेला विभागाने पाणी सोडणे बंद केले होते. मात्र स्थिती बघता पुन्हा ३ तारखेला दुपारी १२ वाजतापासून पाणी सोडले जात आहे. सद्यस्थितीत प्रकल्पातून ५०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. इटियाडोह प्रकल्पातून अर्जुनी-मोरगाव तालुक्याला सिंचन होत आहे.मात्र अन्य भागात पाण्याची गरज असल्याने आता पुजारीटोला प्रकल्पातूनही पाणी सोडले जात आहे. पुजारीटोला प्रकल्पातील डावा व उजव्या कालव्यातून प्रत्येकी २०० क्युसेक सोडले जात आहे. यात पुजारीटोला प्रकल्पातून सालेकसा, आमगाव व गोंदिया तालुक्यातील शेतीला पाणी मिळणार आहे. शिवाय लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील काही शेतीलाही यातून सिंचन होणार आहे. उल्लेखनीय असे की, ३ तारखेपासूनच दोन्ही प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे.धापेवाडाचेही पाणी सोडलेतिरोडा तालुक्यातील ग्राम कवलेवाडा जवळ वैनगंगा नदीचे पाणी धापेवाडा प्रकल्पात अडविले जाते. या प्रकल्पातून तिरोडा तालुक्यातील १३ गावांना कालव्यांच्या माध्यमातून पाणी दिले जात आहे. शनिवारी (दि.४) दुपारी १२ वाजतापासून पाणी सोडले जात आहे. मागील काही दिवसांत या प्रकल्पातील २३ द्वारांतून पाणी सोडले गेले होते. परिणामी प्रकल्पात फक्त १.५० टक्के पाणी उरले होते. तर आता त्यात सुमारे ९ टक्के पाणी आहे. अचानक पुन्हा ३ द्वार ०.३० सेमी पर्यंत उघडण्यात आले असून पाणी सोडले जात आहे. रविवारी (दि.५) सकाळी १ द्वार बंद करण्यात आले. याशिवाय बोदलकसा टप्पा-१ मधील दोन पंपांनी शेतीला पाणी सोडले जात आहे. ५२.८ क्यु. पाणी शेतीसाठी सोडले जात असल्याची माहिती आहे. यातून तिरोडा तालुक्यातील चार हजार हेक्टर शेतीला सिंचनाची सोय होणार आहे.

टॅग्स :Itiadoh Projectइटियाडोह प्रकल्पDamधरण