शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
2
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
3
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
4
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
5
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
6
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
7
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
8
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
9
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
10
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
11
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
12
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
13
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
14
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
15
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
16
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
17
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
18
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
19
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
20
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?

सिंचनासाठी इटियाडोह व पुजारीटोलाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:25 IST

धो-धो बरसल्यानंतर आता मागील १५ दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसामुळे रोवणी धोक्यात आली आहे. परिणामी शेतकरी चिंतेत असून रोवणी वाचविण्यासाठी पाण्याची मागणी करीत आहेत. यामुळे सिंचनासाठी इटियाडोह व पुजारीटोला प्रकल्पांचे पाणी सोडले जात आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात पावसाने मारली दडी : पाण्याअभावी शेतकरी चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : धो-धो बरसल्यानंतर आता मागील १५ दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसामुळे रोवणी धोक्यात आली आहे. परिणामी शेतकरी चिंतेत असून रोवणी वाचविण्यासाठी पाण्याची मागणी करीत आहेत. यामुळे सिंचनासाठी इटियाडोह व पुजारीटोला प्रकल्पांचे पाणी सोडले जात आहे.मध्यंतरी वरूणराज चांगलेच बरसले होते. त्यामुळे रोवणीची कामे जोमात झाली. मात्र आता मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. अचानक पावसाने दडी मारल्यामुळे झालेल्या रोवणीला पाण्याची गरज आहे. तर ज्यांची रोवणी झाली नाही त्यांनाही रोवणी करण्यासाठी पाण्याची गरज आहे. मात्र पाऊस बरसत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत अडकला आहे. मागील वर्षी पावसाने दगा दिल्याने पुर्ण हंगाम हातून निघाला होता. यंदाही तीच परिस्थिती निर्माण तर होणार नाही अशी चिंता त्यांना भेडसावत आहे. अशात प्रकल्पातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत.शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेत २७ जुलैपासून इटियाडोह प्रकल्पातून पाणी कालव्यांत सोडले जात होते. तर ३ तारखेला विभागाने पाणी सोडणे बंद केले होते. मात्र स्थिती बघता पुन्हा ३ तारखेला दुपारी १२ वाजतापासून पाणी सोडले जात आहे. सद्यस्थितीत प्रकल्पातून ५०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. इटियाडोह प्रकल्पातून अर्जुनी-मोरगाव तालुक्याला सिंचन होत आहे.मात्र अन्य भागात पाण्याची गरज असल्याने आता पुजारीटोला प्रकल्पातूनही पाणी सोडले जात आहे. पुजारीटोला प्रकल्पातील डावा व उजव्या कालव्यातून प्रत्येकी २०० क्युसेक सोडले जात आहे. यात पुजारीटोला प्रकल्पातून सालेकसा, आमगाव व गोंदिया तालुक्यातील शेतीला पाणी मिळणार आहे. शिवाय लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील काही शेतीलाही यातून सिंचन होणार आहे. उल्लेखनीय असे की, ३ तारखेपासूनच दोन्ही प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे.धापेवाडाचेही पाणी सोडलेतिरोडा तालुक्यातील ग्राम कवलेवाडा जवळ वैनगंगा नदीचे पाणी धापेवाडा प्रकल्पात अडविले जाते. या प्रकल्पातून तिरोडा तालुक्यातील १३ गावांना कालव्यांच्या माध्यमातून पाणी दिले जात आहे. शनिवारी (दि.४) दुपारी १२ वाजतापासून पाणी सोडले जात आहे. मागील काही दिवसांत या प्रकल्पातील २३ द्वारांतून पाणी सोडले गेले होते. परिणामी प्रकल्पात फक्त १.५० टक्के पाणी उरले होते. तर आता त्यात सुमारे ९ टक्के पाणी आहे. अचानक पुन्हा ३ द्वार ०.३० सेमी पर्यंत उघडण्यात आले असून पाणी सोडले जात आहे. रविवारी (दि.५) सकाळी १ द्वार बंद करण्यात आले. याशिवाय बोदलकसा टप्पा-१ मधील दोन पंपांनी शेतीला पाणी सोडले जात आहे. ५२.८ क्यु. पाणी शेतीसाठी सोडले जात असल्याची माहिती आहे. यातून तिरोडा तालुक्यातील चार हजार हेक्टर शेतीला सिंचनाची सोय होणार आहे.

टॅग्स :Itiadoh Projectइटियाडोह प्रकल्पDamधरण