शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
3
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
4
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
5
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
6
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
7
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
8
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
9
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
10
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
11
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
12
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
14
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
15
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
16
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
17
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
18
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
19
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
20
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा

सिंचनासाठी इटियाडोह व पुजारीटोलाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:25 IST

धो-धो बरसल्यानंतर आता मागील १५ दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसामुळे रोवणी धोक्यात आली आहे. परिणामी शेतकरी चिंतेत असून रोवणी वाचविण्यासाठी पाण्याची मागणी करीत आहेत. यामुळे सिंचनासाठी इटियाडोह व पुजारीटोला प्रकल्पांचे पाणी सोडले जात आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात पावसाने मारली दडी : पाण्याअभावी शेतकरी चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : धो-धो बरसल्यानंतर आता मागील १५ दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसामुळे रोवणी धोक्यात आली आहे. परिणामी शेतकरी चिंतेत असून रोवणी वाचविण्यासाठी पाण्याची मागणी करीत आहेत. यामुळे सिंचनासाठी इटियाडोह व पुजारीटोला प्रकल्पांचे पाणी सोडले जात आहे.मध्यंतरी वरूणराज चांगलेच बरसले होते. त्यामुळे रोवणीची कामे जोमात झाली. मात्र आता मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. अचानक पावसाने दडी मारल्यामुळे झालेल्या रोवणीला पाण्याची गरज आहे. तर ज्यांची रोवणी झाली नाही त्यांनाही रोवणी करण्यासाठी पाण्याची गरज आहे. मात्र पाऊस बरसत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत अडकला आहे. मागील वर्षी पावसाने दगा दिल्याने पुर्ण हंगाम हातून निघाला होता. यंदाही तीच परिस्थिती निर्माण तर होणार नाही अशी चिंता त्यांना भेडसावत आहे. अशात प्रकल्पातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत.शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेत २७ जुलैपासून इटियाडोह प्रकल्पातून पाणी कालव्यांत सोडले जात होते. तर ३ तारखेला विभागाने पाणी सोडणे बंद केले होते. मात्र स्थिती बघता पुन्हा ३ तारखेला दुपारी १२ वाजतापासून पाणी सोडले जात आहे. सद्यस्थितीत प्रकल्पातून ५०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. इटियाडोह प्रकल्पातून अर्जुनी-मोरगाव तालुक्याला सिंचन होत आहे.मात्र अन्य भागात पाण्याची गरज असल्याने आता पुजारीटोला प्रकल्पातूनही पाणी सोडले जात आहे. पुजारीटोला प्रकल्पातील डावा व उजव्या कालव्यातून प्रत्येकी २०० क्युसेक सोडले जात आहे. यात पुजारीटोला प्रकल्पातून सालेकसा, आमगाव व गोंदिया तालुक्यातील शेतीला पाणी मिळणार आहे. शिवाय लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील काही शेतीलाही यातून सिंचन होणार आहे. उल्लेखनीय असे की, ३ तारखेपासूनच दोन्ही प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे.धापेवाडाचेही पाणी सोडलेतिरोडा तालुक्यातील ग्राम कवलेवाडा जवळ वैनगंगा नदीचे पाणी धापेवाडा प्रकल्पात अडविले जाते. या प्रकल्पातून तिरोडा तालुक्यातील १३ गावांना कालव्यांच्या माध्यमातून पाणी दिले जात आहे. शनिवारी (दि.४) दुपारी १२ वाजतापासून पाणी सोडले जात आहे. मागील काही दिवसांत या प्रकल्पातील २३ द्वारांतून पाणी सोडले गेले होते. परिणामी प्रकल्पात फक्त १.५० टक्के पाणी उरले होते. तर आता त्यात सुमारे ९ टक्के पाणी आहे. अचानक पुन्हा ३ द्वार ०.३० सेमी पर्यंत उघडण्यात आले असून पाणी सोडले जात आहे. रविवारी (दि.५) सकाळी १ द्वार बंद करण्यात आले. याशिवाय बोदलकसा टप्पा-१ मधील दोन पंपांनी शेतीला पाणी सोडले जात आहे. ५२.८ क्यु. पाणी शेतीसाठी सोडले जात असल्याची माहिती आहे. यातून तिरोडा तालुक्यातील चार हजार हेक्टर शेतीला सिंचनाची सोय होणार आहे.

टॅग्स :Itiadoh Projectइटियाडोह प्रकल्पDamधरण