शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

‘आयटीआय’चे विद्यार्थी घाणीच्या साम्राज्यात

By admin | Updated: November 19, 2015 02:19 IST

आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षणाचे धडे देण्यासाठी शासनाने येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सुरू केले.

वीज, पाण्याचा अपव्यय : कोट्यवधीची इमारत ढाळतेय अश्रूसालेकसा : आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षणाचे धडे देण्यासाठी शासनाने येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सुरू केले. कोटीच्या घरात पैसे खर्च करून सुसज्ज इमारत उभी केली. मात्र आज त्या इमारतीची चांगलीच वाताहात झाली आहे. कोणतीही देखभाल नसल्यामुळे अक्षरश: घाणीच्या विळख्यात तेथील विद्यार्थ्यांना विद्याग्रहणाचे कार्य करावे लागत आहे.स्वच्छतेचे एवढे धिंडवडे उडाले आहेत की शौचालय, मुत्रीघर, वॉश बेसिन, स्नानगृह कुठेही स्वत:चा दिसत नाही. एवढेच नाही तर नळातून, बेसीनमधून सतत पाणी वाया जाऊन पाण्याचा अपव्यय होत आहे. दुसरीकडे कोणी असो किंवा नसो, पंखे व इतर विजेची उपकरणे सतत सुरू असतात. यामुळे या आयटीआयमध्ये कोणाचेच कोणावर नियंत्रण नाही की काय? अशी शंका यायला लागते. एकीकडे स्वच्छ भारत मिशन अभियान राबवून स्वच्छता राखण्याची शपथ घेतली जात असताना इथे मात्र या अभियानाची चक्क थट्टा केली जात आहे. वीज आणि पाणी या महत्वाच्या घटकांची बचत करण्याऐवजी त्याचा सतत अपव्यय केला जात आहे. या शासकीय आयटीआयमध्ये आपली जवाबदारी सांभाळणारा कोणी आहे की नाही किंवा यावर शासनाचे नियंत्रण आहे की नाही? अशी शंका येथील चित्र पाहिल्यानंतर येते. ‘लोकमत’ने या आयटीआय कॉलेजमध्ये अनेक वेळा भेट दिली असता प्रत्येक वेळी हेच वातावरण दिसून आले. याबाबत चर्चा करण्यासाठी प्राचार्याशी भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ते गैरहजर असल्याने त्यांच्याशी चर्चा होऊ शकली नाही. शेवटी एक दिवस त्यांची भेट झाली व त्यांच्या परवानगीने लोकमत चमुने तेथील आयटीआय परिसरात पाहणी केली. तेव्हा सर्वत्र अव्यवस्था व घाण पसरलेले दृश्य दिसून आले. आदिवासी अतिदुर्गम भागात शेवटच्या घटकापर्यंत कौशल्य विकास व्हावा व व्यवसायिक शिक्षण पोहोचावे या उद्देशाने शासनाकडून सालेकसा येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सुरू केली. त्यात आवश्यक सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. वेळोवेळी शासनाकडून वाटेल तेवढा निधी दिला जात असतो, परंतु खऱ्या अर्थाने याचा सदुपयोग होताना दिसून येत नाही. तंत्रशिक्षण विभागातील अधिकारी अशा ठिकाणी येवून कधी पाहणी करतात की नाही, किंवा कागदी घोडे नाचवून केवळ आकड्यांचा खेळ करतात का, असा प्रश्न येथील चित्र पाहिल्यानंतर पडल्याशिवाय राहात नाही.