शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

प्लास्टिक उद्योगाचा मुद्दा विधानसभेत उचलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 22:20 IST

प्लास्टिक उद्योगावर २३ मार्च २०१८ पासून राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने लावलेल्या बंदीच्या विरोधात प्लास्टिक उद्योगाचा विधानसभेत आ. गोपालदास अग्रवाल यांनी हा मुद्दा लावून धरुन याकडे शासनाचे लक्ष वेधले.

ठळक मुद्देअग्रवाल यांचा पुढाकार : उपाययोजनेसाठी तीन सदस्यीय समिती बनविण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्लास्टिक उद्योगावर २३ मार्च २०१८ पासून राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने लावलेल्या बंदीच्या विरोधात प्लास्टिक उद्योगाचा विधानसभेत आ. गोपालदास अग्रवाल यांनी हा मुद्दा लावून धरुन याकडे शासनाचे लक्ष वेधले. त्याबद्दल जिल्ह्यातील प्लास्टिक उत्पादन तसेच व्यायसायिकांच्या प्रतिनिधी मंडळाने आ.अग्रवाल यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले.राज्य शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाने २३ मार्च २०१८ रोजी प्लास्टिक झिल्ली-पॅकेट, डिस्पोजेबल वस्तू, फॅक्स बोर्ड यासह सर्व प्रकारच्या प्लास्टिक वस्तू, प्लास्टिक वस्तूंचे निर्माण व उपयोगावर बंदी घातली होती. त्यामुळे प्लास्टिक उद्योगात कार्यरत कामगार, कारखानदार व व्यवसाय करणारे २० लाखांपेक्षा अधिक लोक राज्यात बेरोजगार होण्याचा धोका निर्माण झाला. या संदर्भात जिल्ह्यातील प्लास्टिक व्यावसायिकांनी आ. अग्रवाल यांची भेट घेवून त्यांना या निर्णयाची माहिती दिली व सदर निर्णय रद्द करण्यात यावे, अशी मागणी केली.आ. अग्रवाल यांनी या मुद्यावर विधानसभेत शासनाचे लक्ष वेधले. एकीकडे शासन मॅग्नेटिक महाराष्टÑ योजनेंतर्गत मोठमोठे उद्योग राज्यात आणण्याचे आश्वासन देत आहे, तर दुसरीकडे नवनवीन नियम लावून स्थापित उद्योगांना बंद करीत आहे. त्यामुळे लाखो लोक बेरोजगार होत आहेत. प्लास्टिक उद्यागोशी २० लाख लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या जुळले आहेत. राज्यात प्लास्टिक उत्पादनांवर बंदी लागली तर २० लाखांपेक्षा अधिक लोकांवर नकारात्मक प्रभाव पडेल. प्लास्टिक उत्पादनांवर बंदीचा निर्णय घेण्यापूर्वी या लोकांचा विचार करणे आवश्यक आहे. या बंदीमुळे ग्राहकांना होणाऱ्या त्रासापोटी आधी पर्यायी व्यवस्था बंदीपूर्वी शासनाने करणे गरजेचे होते. शासनाने प्लास्टिक उत्पादनांवर बंदी आणावी, परंतु आधी या उद्योगाशी निगडीत लोकांना पर्यायी व्यवस्था करून द्यावी. तसेच ग्राहकांच्या त्रासासाठीसुद्धा पर्यायी व्यवस्था करावी व नंतरच प्लास्टिक उत्पादनांवर बंदी आणावी, असे सांगितले.त्यावेळी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्लास्टिक उत्पादनांवरील बंदी शासन परत घेणार नाही. परंतु आ. अग्रवाल यांनी मांडलेल्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेईल. प्लास्टिक झिल्लींवर बंदीमुळे सर्व प्रकारच्या ग्राहकांना अडचणी येत आहेत. उद्योगाशी निगडीत लोकांवरही बेरोजगारीचे सावट पसरले आहे. या सर्वांसाठी पर्यायी व्यवस्था-उपाययोजना करण्यासाठी विधान मंडळाची उपसमिती गठित करून निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. प्लास्टिक व्यावसायिक व उत्पादकांना दिलासा देण्यासाठी येणाºया तीन महिन्यांपर्यंत प्लास्टिक बंदी कायदा कठोरतेने लागू करण्यात येणार नाही. तसेच नागरिकांनाही प्लास्टिक बंदीसाठी काही कालावधी देण्यात येईल.या वेळी शिष्टमंडळात संतोष मुंदडा, विपूल पलन, संतोष फगवानी, विवेक असाटी, नरसिंग अग्रवाल, ओमप्रकाश पोरवाल, नितीश अग्रवाल, ओमप्रकार हंसपाल, शैलेश असाटी, दीपक चौरसिया, हरीश अडवानी, संजय खटवानी, अर्जुन नागवानी, पंकज वाधवानी, विजय शर्मा, जयकिशन मुंदडा आदी उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल