शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नुसतीच फॅशन की जिवाला धोका? गोंदियात ५१७ जणांकडे बंदूक परवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 15:44 IST

शस्त्र बाळगण्याची गरज नसलेल्यांकडेही परवाने : पडताळणी करण्याची आहे गरज

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : सध्याच्या डिजिटल युगात स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्यापेक्षा फॅशन म्हणूनच शस्त्र बाळगणाऱ्यांची संख्या वाढतेय, गोंदियात ५१७ जणांकडे बंदूक परवाने आहेत. राजकीय नेते, व्यापारी यांसह गावगुंडही कमरेला शस्त्र बाळगण्याची फॅशन करीत आहेत. 

शस्त्र परवाना काढण्यासाठीचे नियम अत्यंत कठोर आहेत. परंतु मधला मार्ग काढून अनेक जण शस्त्र परवाने काढण्यात यशस्वी होतात, तर काही जणांना गरज असतानाही अनेक वर्षे शस्त्र परवाना मिळत नाही. त्यामुळे ज्यांना शस्त्र बाळगण्याची गरज नाही, अशा शस्त्रधारी मंडळींची पडताळणी होण्याची गरज आहे. 

शस्त्र परवाना कोणाला दिला जातो ?खरे तर बंदूक परवाना हा काही विशिष्ठ कारणांसाठी दिला जातो. एखाद्याला दुसऱ्यापासून धोका आहे, असे वाटत असेल तर स्वसंरक्षणासाठी तो परवान्याची मागणी करू शकतो. त्याचबरोबर ही प्रामुख्याने दोन कारणे शेतीचे प्राण्यांकडून होणारे नुकसान टाळण्यासाठी शस्त्र परवाना दिला जातो. हि प्रामुख्याने दोन कारणे शस्त्रांचा परवाना देण्यामागे असतात. मात्र, अनेक जण या दोन्ही कारणांचा वापर केवळ फॅशन म्हणून करतात. आपल्याकडे पिस्तूल आहे, हे समजण्यासाठी अनेक जण कमरेला पिस्तूल लावून समाजात फिरत असतात. यामुळे आपली प्रतिष्ठा वाढेल, अशी त्यांची समजूत असते. पाच वर्षांत वाढले अर्ज वर्षांत शस्त्र परवाना काढणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेकांनी स्वसंर क्षणासाठी शस्त्र परवाना काढण्यावर भर दिला आहे. यातील अनेकांना शस्त्र परवाने मिळाले आहेत. 

शस्त्र परवाना काढायचा कसा? कुटुंबातील सर्व सदस्यांचे प्रतिज्ञापत्र, मेडिकल प्रमाणपत्र, पोलिस पाटील, तलाठी दाखला, पोलिसांकडून गुन्ह्यांची पडताळणी होते. जिल्हाधिकारी सुनावणी घेतात. खात्री झाल्यानंतरच परवाना मिळतो.

नियम कडक करण्याची आवश्यकतापरवाना मिळण्यासाठी असलेली प्रक्रिया किचकट असली तरी आणखी नियम कडक करणे गरजेचे आहे. खरी गरज असेल त्यालाच परवाना मिळणे गरजेचे आहे. मात्र, अनेक जण फॅशन म्हणून परवाना घेत आहेत, यावर जरब हवी.

तर होणार कारवाई शस्त्र सांभाळणे कठीण

  • शस्त्राचा चुकीचा वापर झाला तर तो गुन्हा आहे. यासाठी शस्त्र वापरताना नियम पाळावे लागतात. आचारसंहिता काळात शस्त्रे जमा करावी लागतात. जर काही अघटित झाले तर कारवाई होते. 
  • अनेकदा घरामध्ये कौटुंबिक वाद होतात. अशा वेळी रागाच्या भरात परवाना मिळालेल्या शस्त्राचा वापर होऊ शकतो. त्यामुळे शस्त्र सांभाळणे कठीणच आहे. 
  • जिल्ह्यात निवडणूक जाहीर झाल्यानंतर ज्यांच्याकडे शस्त्र परवाने आहेत, त्यांना आपले शस्त्र नजीकच्या पोलिस ठाण्यात जमा करावे लागते.
टॅग्स :gondiya-acगोंदिया