शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

आॅगस्ट महिन्यात सिंचन प्रकल्प अर्धेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 21:28 IST

मागील दोन तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा हवामान विभागाने चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने दिलासा मिळाला होता. मात्र आॅगस्ट महिना अर्धा संपला असताना सिंचन प्रकल्प अर्धेच भरल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

ठळक मुद्देपावसाचा परिणाम : शेतकऱ्यांची भिस्त, पाणी टंचाईवर मात करण्यास मदत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील दोन तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा हवामान विभागाने चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने दिलासा मिळाला होता. मात्र आॅगस्ट महिना अर्धा संपला असताना सिंचन प्रकल्प अर्धेच भरल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यावर शेतकऱ्यांचे बरेच गणित अवलंबून असते. त्यामुळे सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ होण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम बोपाबोडी येथील तलावात केवळ ३.१३ टक्के, कोसबी बकी येथे ३.०४ टक्के पाणीसाठा आहे. स्थानीक स्तरच्या तलावांमध्ये सालेगाव ६.०३ टक्के व चारभाटा ६.४८ टक्के पाणीसाठा आहे. गिरोला तलावात १५.९२, चिरचाडी १३.५९, कोसमतोंडी १६.५०, खाडीपार १०.०६, मध्यम प्रकल्पांतर्गत चोरखमारा जलाशयात १८.३०, लघू प्रकल्पातील भदभद्या तलावात ३२.४६, रिसाला १०.२३, सालेगाव २१.८६, शेरेपार तलावात २९.७२, नवेगावबांध ३६.६७, तर ओवारा तलावात २५.९९ टक्के पाणीसाठा आहे. बोदलकसा जलाशयात ७७.३२, चुलबंद ५१.२७, खैरबंदा ५७.०९, मानागड ७७.८३, रेंगेपार ५४.५३, संग्रामपूर ९०.५३, कलपाथरी ५७.९५, आक्टीटोला ६८.१३, गुमडोह ६८.६७,कालीमाटी ६८.३०, मोगर्रा ६०.३२, पिपरीया ५७.९०, पांगडी ५६.२१, बडेगाव ८१.६६, जुनेवानी ६२.४४, बेवारटोला ८७.२०, भिवखिडकी ७५.१५, चान्ना-बाक्टी ८०.१५, धाबेटेकडी ६५.६५, गोठणगाव ५३.४४, कवठा ७०.४५, खैरी ८५.१६, खमारी ७९.३०, पळसगाव ५६.२२, पालडोंगरी ८१.६९, पळसगाव (डव्वा) ५९.९१, पुतळी ९८.५९, सौंदड ७५.११, तेढा ६९.११, ताडगाव ५६.५८ व छत्तरटोला तलावात ९३.२९ टक्के पाणीसाठा आहे. या तलावात सध्या तरी समाधानकारक पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे, ज्या तलावांत पाणीसाठा कमी आहे ते तलाव सिंचनासाठी महत्वपूर्ण आहेत. यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यास मदत होते.मागील वर्षीच्या तुलनेत समाधानकारक स्थितीमध्यम, लघू व जुन्या मालगुजारी तलावांची जिल्ह्यातील संख्या ६९ आहे. यात एकूण ५३.३१ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा त्यांची स्थिती उत्तम आहे. मागील वर्षी याच तारखेपर्यंत या तलावांत फक्त १७.७५ टक्के पाणीसाठा होता. मध्यम प्रकल्पांच्या नऊ जलाशयांत ५८.३१ टक्के पाणी असून मागील वर्षी फक्त १६.५७ टक्के पाणीसाठा होता. लघू प्रकल्पातील २० तलावांत ४४.७४ टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी २१.२८ टक्के पाणीसाठा होता. तर जुन्या मालगुजारी ३८ तलवांत यंदा ५६.५९ पाणीसाठा आहे तर मागील वर्षी फक्त २२.१५ टक्के पाणीसाठा होता.१० तलावात शंभर टक्केजिल्ह्यातील काही तलाव व जलाशय अद्याप तहानलेले असतानाच काही तलाव शंभर टक्के भरले आहेत.यात कटंगी, राजोली, सोनेगाव, उमरझरी, भानपूर, फुलचूर, गंगाझरी, मेंढा, मोरगाव व माहुरकुडा या तलावांचा समावेश आहे.

टॅग्स :Rainपाऊस