शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

१३८९४ हेक्टरला सिंचनाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील बहुतांश शेती आजही वरथेंबी आहे. अशात चांगला पाऊस पडल्यास खरिपाचा हंगाम चांगला निघून जातो. शिवाय रबीसाठीही शेतकऱ्यांना सिंचनाची सोय पाटबंधारे विभागाकडून करून दिली जाते. अन्यथा खरिपात शेती करायची व रबीत बहुतांश शेतकऱ्यांना पाण्याअभावी कोणतेही पीक घेता येत नाही. मात्र, मागील वर्षी जिल्ह्यात चांगलाच पाऊस झाल्याने आजही प्रकल्पांत पुरेपूर पाणीसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देरबीचा हंगाम फुलणार : ३ री पाळी झाली सुरू

कपिल केकतलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यावर यंदा वरुणराजा चांगलाच मेहरबान होता व त्यामुळे अद्याप येथील प्रकल्पांत भक्कम पाणीसाठा आहे. हे बघता यंदा पाटबंधारे विभागाकडून जिल्ह्यात रबीसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. याबाबत कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून यंदा १३८९४ हेक्टरसाठी सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेती आजही वरथेंबी आहे. अशात चांगला पाऊस पडल्यास खरिपाचा हंगाम चांगला निघून जातो. शिवाय रबीसाठीही शेतकऱ्यांना सिंचनाची सोय पाटबंधारे विभागाकडून करून दिली जाते. अन्यथा खरिपात शेती करायची व रबीत बहुतांश शेतकऱ्यांना पाण्याअभावी कोणतेही पीक घेता येत नाही. मात्र, मागील वर्षी जिल्ह्यात चांगलाच पाऊस झाल्याने आजही प्रकल्पांत पुरेपूर पाणीसाठा शिल्लक आहे. यात उन्हा‌ळ्याची सोय करून ठेवल्यानंतरही पाणी शिल्लक राहणार एवढा साठा दिसून येत आहे. याकडे लक्ष देत यंदा जिल्ह्यात रबीसाठी सिंचनाची सोय करण्याचे ठरले आहे. यासाठी नुकतीच कालवे सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. त्यात रबीसाठी सिंचन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, यंदा जिल्ह्यातील १३८९४ हेक्टरला सिंचन केले जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पाद्वारे ९९३४ हेक्टरचे तर बाघ प्रकल्पातून (पुजारीटोला) ३९६० म्हणजेच एकूण १३८९४ हेक्टरचे सिंचन केले जाणार आहे. रबीसाठी सिंचनाची सोय होणार असल्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा दुसरा हंगामही फुलणार आहे. विशेष म्हणजे, यांतर्गत आता पाण्याची ३ री पाळी सुरू आहे. 

असे करण्यात आले आहे नियोजन सिंचनासाठी करण्यात आलेल्या नियोजनांतर्गत, इटियाडोह प्रकल्पातून ९९३४ हेक्टरचे नियोजन असून यात अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ३५ टक्के म्हणजेच ३४७७ हेक्टर, लखांदूर (भंडारा) तालुक्यातील २५ टक्के म्हणजेच २४८३ हेक्टर तर वडसा व आरमोरी (गडचिरोली)  तालुक्यातील ४० टक्के म्हणजेच ३९७४ हेक्टरचा समावेश आहे. तसेच बाघ प्रकल्पातून ३९६० हेक्टरचे नियोजन करण्यात आले असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील ५० टक्के म्हणजेच १९८० हेक्टर, आमगाव तालुक्यातील ३० टक्के म्हणजेच ११८८ हेक्टर तर सालेकसा तालुक्यातील २० टक्के म्हणजेच ७९२ हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प