शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
5
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
6
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
7
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
8
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
9
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
10
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
11
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
12
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
13
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
14
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
15
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
16
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
17
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
18
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
19
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
20
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा

पाणी पुरवठा योजनेच्या कामात अनियमितता

By admin | Updated: October 7, 2015 00:29 IST

तिरोडा तालुक्यातील ैपरसवाडा येथील ग्रामीण पाणी पुरवठा योजना अंतर्गत केलेल्या कामात तत्कालीन सरपंच मणिराम हिंगे यांनी अनियमितता केली आहे

अधिकाऱ्यांकडे तक्रार: पाण्यासाठी नागरिकांची ओरडइंदोरा बु. : तिरोडा तालुक्यातील ैपरसवाडा येथील ग्रामीण पाणी पुरवठा योजना अंतर्गत केलेल्या कामात तत्कालीन सरपंच मणिराम हिंगे यांनी अनियमितता केली आहे. या कामात अनेक गैरप्रकार झाल्याची तक्रार माजी सरपंच चंदन वासनिक व राकेश वैद्य यांनी केली आहे.जिल्हा ग्रामीण पुरवठा अधिकारी गोंदिया, मुख्य कार्यपालन अधिकारी गोंदिया तसेच खंडविकास अधिकारी तिरोडा यांना दिलेल्या तक्रारीत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. परसवाडा येथे सन २०१०-११ या वर्षी ग्रामीण पाणी पुरवठा योजने अंतर्गत ५० लाख रुपये पाणी पुरवठा योजनेसाठी मंजूर करण्यात आले. या अगोदर सन २००१-०२ या वर्षा पासून या गावात जलस्वराज प्रकल्पांतर्गत चांदोरी खुर्द येथुन परसवाडा पर्यंत संपूर्ण गावात पाणी पुरवठा योजना सुरू होती. सन २०१०-११ मध्ये ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत तत्कालीन सरपंच व सध्याचे उपसरपंच मनिराम हिंगे यांनी ५० लाख रुपयाची योजना राबवितांना अनेक ठिकाणी पाईप लाईन नवीन न खोदता बिले मंजूर करून घेतली. शिल्लक असलेले १ हजार फूट पाईप स्वत:च्या शेती मध्ये उपयोगात आणले असे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. माहितीच्या अधिकारीखाली मिळालेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी पाईप लाईन खोदली नाही व नवीन पाईप लावलेच नाही तरी देखील ग्रामविकास अधिकारी तुरकर यांनी मोजमाप पुस्तीके मध्ये नोंद केली व बिलाची उचल केली आहे. नागरिक श्रीपत ठवकर व घनश्याम ठवकर यांच्या घरापर्यंत पाणी पुरवठा पाईप लाईन असुन सुद्धा घरेलू पाणी पुरवठ्याची जोडणी केली. ग्राम विकास अधिकारी यांनी नामंजूर केली. उपसरपंच मनिराम हिंगे यांच्या शेतावरील बोरवेलच्या पाईपला ग्राम पंचायतची पाईप लाइन जोडून विद्युत वितरण कंपनी परसवाडा यांनी खाजगीरित्या मासिक दराने पाणी पुरवठा केला आहे. ग्रा. पं.द्वारे खरेदी केलेल्या मोटारपंपचा उपयोग उपसरपंच स्वत:च्या शेतीसाठी करीत असल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणने आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत निधी आली व योजना कार्यान्वीत असतांना सुद्धा ग्राम विकास अधिकारी तुरकर हे नळ देण्यास तयार नाही व त्यांच्या घराजवळून पुढील विज वितरण कंपनीला पाणी देत आहेत. नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्या नंतर कुणालाही पाणी द्या. असा सूर गावकऱ्यांचा आहे. ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत कामात अनेक प्रकारचे गैरव्यवहार झाले. ही माहितीे माहितीच्या अधिकारातून मिळाली. संबंधीत कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून येथील नागरिकांना न्याय देण्यात यावे, अशी तक्रारकर्त्यांची मागणी आहे. (वार्ताहर)