शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
2
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
3
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
4
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
5
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
6
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
7
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
8
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
9
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
10
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
11
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
12
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
13
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
14
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
15
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
16
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
17
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
18
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
19
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
20
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका

पाणी पुरवठा योजनेच्या कामात अनियमितता

By admin | Updated: October 7, 2015 00:29 IST

तिरोडा तालुक्यातील ैपरसवाडा येथील ग्रामीण पाणी पुरवठा योजना अंतर्गत केलेल्या कामात तत्कालीन सरपंच मणिराम हिंगे यांनी अनियमितता केली आहे

अधिकाऱ्यांकडे तक्रार: पाण्यासाठी नागरिकांची ओरडइंदोरा बु. : तिरोडा तालुक्यातील ैपरसवाडा येथील ग्रामीण पाणी पुरवठा योजना अंतर्गत केलेल्या कामात तत्कालीन सरपंच मणिराम हिंगे यांनी अनियमितता केली आहे. या कामात अनेक गैरप्रकार झाल्याची तक्रार माजी सरपंच चंदन वासनिक व राकेश वैद्य यांनी केली आहे.जिल्हा ग्रामीण पुरवठा अधिकारी गोंदिया, मुख्य कार्यपालन अधिकारी गोंदिया तसेच खंडविकास अधिकारी तिरोडा यांना दिलेल्या तक्रारीत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. परसवाडा येथे सन २०१०-११ या वर्षी ग्रामीण पाणी पुरवठा योजने अंतर्गत ५० लाख रुपये पाणी पुरवठा योजनेसाठी मंजूर करण्यात आले. या अगोदर सन २००१-०२ या वर्षा पासून या गावात जलस्वराज प्रकल्पांतर्गत चांदोरी खुर्द येथुन परसवाडा पर्यंत संपूर्ण गावात पाणी पुरवठा योजना सुरू होती. सन २०१०-११ मध्ये ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत तत्कालीन सरपंच व सध्याचे उपसरपंच मनिराम हिंगे यांनी ५० लाख रुपयाची योजना राबवितांना अनेक ठिकाणी पाईप लाईन नवीन न खोदता बिले मंजूर करून घेतली. शिल्लक असलेले १ हजार फूट पाईप स्वत:च्या शेती मध्ये उपयोगात आणले असे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. माहितीच्या अधिकारीखाली मिळालेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी पाईप लाईन खोदली नाही व नवीन पाईप लावलेच नाही तरी देखील ग्रामविकास अधिकारी तुरकर यांनी मोजमाप पुस्तीके मध्ये नोंद केली व बिलाची उचल केली आहे. नागरिक श्रीपत ठवकर व घनश्याम ठवकर यांच्या घरापर्यंत पाणी पुरवठा पाईप लाईन असुन सुद्धा घरेलू पाणी पुरवठ्याची जोडणी केली. ग्राम विकास अधिकारी यांनी नामंजूर केली. उपसरपंच मनिराम हिंगे यांच्या शेतावरील बोरवेलच्या पाईपला ग्राम पंचायतची पाईप लाइन जोडून विद्युत वितरण कंपनी परसवाडा यांनी खाजगीरित्या मासिक दराने पाणी पुरवठा केला आहे. ग्रा. पं.द्वारे खरेदी केलेल्या मोटारपंपचा उपयोग उपसरपंच स्वत:च्या शेतीसाठी करीत असल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणने आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत निधी आली व योजना कार्यान्वीत असतांना सुद्धा ग्राम विकास अधिकारी तुरकर हे नळ देण्यास तयार नाही व त्यांच्या घराजवळून पुढील विज वितरण कंपनीला पाणी देत आहेत. नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्या नंतर कुणालाही पाणी द्या. असा सूर गावकऱ्यांचा आहे. ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत कामात अनेक प्रकारचे गैरव्यवहार झाले. ही माहितीे माहितीच्या अधिकारातून मिळाली. संबंधीत कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून येथील नागरिकांना न्याय देण्यात यावे, अशी तक्रारकर्त्यांची मागणी आहे. (वार्ताहर)