शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

अनियमित बसगाड्यांमुळे विद्यार्थिनींसह प्रवाशांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 06:00 IST

भंडारा जिल्ह्यातील साकोली आगारामधून साकोलीवरुन केशोरी करीता सुटणाºया सर्वच बसफेºया कधीच वेळेवर पोहोचत नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना जाण्या-येण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. या बसमध्ये प्रवासी सुद्धा असतात. त्यांना देखील निर्धारित वेळेत कधीच पोहोचता येत नाही. त्यामुळे त्यांची कामे खोळंबत आहेत.

ठळक मुद्देआगार व्यवस्थापकाचे दुर्लक्ष : शैक्षणिक नुकसान, आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : साकोली आगारातील बसगाड्या साकोली-केशोरी, साकोली-राजोली, साकोली-दिनकरनगर या दैनंदिन बसफेऱ्या सुरु असून या गाड्या कधीच वेळेत पोहोचत नाही. दररोज या गाड्यांच्या नियमित वेळापत्रकात बदलामुळे शालेय विद्यार्थिनीसह प्रवाशांना सुद्धा याचा फटका बसत आहे. गेल्या महिनाभरापासून हा प्रकार सुरू आहे.यामुळे बस ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होत आहे. नियमित बससेवा सुरू ठेवली नाही तर सावित्रींच्या लेकींना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा विद्यार्थी संघटनांनी दिला आहे.भंडारा जिल्ह्यातील साकोली आगारामधून साकोलीवरुन केशोरी करीता सुटणाºया सर्वच बसफेºया कधीच वेळेवर पोहोचत नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना जाण्या-येण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. या बसमध्ये प्रवासी सुद्धा असतात. त्यांना देखील निर्धारित वेळेत कधीच पोहोचता येत नाही. त्यामुळे त्यांची कामे खोळंबत आहेत. साकोलीवरुन ५.३० वाजताच्या दरम्यान सुटणारी साकोली-केशोरी रात्रफेरी बस नवेगाववरुन रेल्वे प्रवाशांना पिकप करुन पुढच्या प्रवासासाठी निघणे असा साकोली आगार प्रमुखांचा आदेश असताना सुद्धा ही बस फेरीचे चालक-वाहक रेल्वेच्या प्रवाशांची वाट न पाहता नवेगाववरुन बस सोडून पुढच्या प्रवासाला निघून जातात. परिणामी प्रवाशांना त्रास भोगून केशोरीपर्यंत यावे लागते. मानव विकास अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी बससेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.ही बस फेरीसुद्धा निश्चित केलेल्या वेळेत कधीच येत नाही. त्यामुळे विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत अहे. या बसच्या अनियमितपणामुळे या परिसरात परिवहन मंडळाविषयी असंतोष व्याप्त आहे. अनेकदा शाळा प्रमुखांनी यासंबंधी आगार प्रमुखाकडे तक्रार केली पण त्यांनी सुध्दा त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे विद्यार्थिनी आणि प्रवाशांची समस्या कायम आहे. साकोलीवरुन केशोरीकरिता सुटणारी रात्रपाळीतील बस नवेगावबांध येथे रेल्वे प्रवाशी आल्याशिवाय सोडू नये,त्याचप्रमाणे गेल्या महिनाभरापासून साकोली-केशोरी, साकोली-राजोली, साकोली कुरखेडा,साकोली दिनकरनगर या बसफेऱ्या विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना ये-जा करण्यासाठी वेळेवर सोडण्यात याव्यात, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा विद्यार्थी संघटना प्रमुख पिंटू मशिद यांनी दिला आहे.

टॅग्स :state transportएसटी