शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

विहिरींवर लोखंडी कठडे बसविलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 21:11 IST

या परिसरातील वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी जंगलाला लागून असलेल्या शेतांमधील विहिरींवर वनविभागाकडून लोखंडी कठडे बसविण्यात येणार होते. मात्र तीन वर्षांचा काळ लोटूनही विहिरींवर कठडे बसविण्यात आले नाही.

ठळक मुद्देवनविभागाचे दुर्लक्ष : शेतकऱ्यानी केली कठड्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा (कोयलारी) : या परिसरातील वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी जंगलाला लागून असलेल्या शेतांमधील विहिरींवर वनविभागाकडून लोखंडी कठडे बसविण्यात येणार होते. मात्र तीन वर्षांचा काळ लोटूनही विहिरींवर कठडे बसविण्यात आले नाही. उलट या कामासाठी काही शेतकºयांकडून प्रती विहीर ३०० ते ४०० रुपयांची उगाही करण्यात आल्याचे बोलले जात आहे.शेंडा, कोयलारी, कोहळीपार, उशिखेडा व प्रधानटोला येथील काही शेतकºयांची शेती जंगलाला लागून आहे. वन्यप्राण्यांची रेलचेल अधिक प्रमाणात असल्याने कोणताही वन्यप्राणी धोक्याने विहिरीत पडू नये म्हणून त्यांच्या संरक्षणासाठी वनविभागाकडून लोखंडी कठडे बसविण्यात येणार होते. या कामासाठी प्रती विहीर ३०० ते ४०० रुपये घेण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे ही योजना फसवी होती की, लालच देणारी असे तर्क-वितर्क लावले जात आहेत.सध्या या परिसरातील शेतकºयांची धानपिकाची रोवणी झाली आहे. त्यामुळे सर्वत्र हिरवेगार रान दिसते. रात्रीच्या वेळेस जंगलातील सांबर, चितळ, रानडुकर व रानगव्या सारखे वन्य प्राणी याच धान पिकावर ताव मारुन शेतकºयांच्या पिकांचे मोठे नुकसान करतात. त्याचबरोबर प्रसंगावधनाने एखादा वन्य प्राणी विहिरीत पडू शकतो हे नाकारता येत नाही. हीच बाब लक्षात घेवून अशा विहिरींवर लोखंडी कठडे लावण्याचे वनविभागाकडून ठरविण्यात आले होते. त्याचे सर्वेक्षण करुन यादी तयार करण्यात आली होती. मात्र तीन वर्षांचा काळ लोटूनही वनविभागाकडून कोणतेच पाऊल उचलण्यात आले नसल्याने ही योजना फसवी होती की लालच देणारी होती हे कळायला मार्ग नाही.वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी तसेच शेतकºयांचे हित लक्षात घेता जंगल परिसरात तारेचे काटेरी कुंपन करणे तसेच विहिरींना लोखंडी कठडे लावणे गरजेचे आहे. यासाठी वनविभागाने त्वरित दखल घेवून जंगल व शेत शिवारातील विहिरींना लोखंडी कठडे बसविण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. सदर प्रकरणाची माहिती घेण्यासाठी सडक-अर्जुनी येथील वनपरिक्षेत्राधिकारी गोवर्धन राठोड यांचेशी मोबाईलवरुन संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.जंगल परिसरातील विहिरींची पाहणी करुन त्याची यादी वनक्षेत्राधिकारी कार्यालयास सादर करण्यात आली होती. परंतु त्याचे काय झाले हे कळले नाही.- मोहतुरेप्र.क्षेत्रसहायक शेंडा.

टॅग्स :forest departmentवनविभागFarmerशेतकरी