शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

विहिरींवर लोखंडी कठडे बसविलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 21:11 IST

या परिसरातील वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी जंगलाला लागून असलेल्या शेतांमधील विहिरींवर वनविभागाकडून लोखंडी कठडे बसविण्यात येणार होते. मात्र तीन वर्षांचा काळ लोटूनही विहिरींवर कठडे बसविण्यात आले नाही.

ठळक मुद्देवनविभागाचे दुर्लक्ष : शेतकऱ्यानी केली कठड्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा (कोयलारी) : या परिसरातील वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी जंगलाला लागून असलेल्या शेतांमधील विहिरींवर वनविभागाकडून लोखंडी कठडे बसविण्यात येणार होते. मात्र तीन वर्षांचा काळ लोटूनही विहिरींवर कठडे बसविण्यात आले नाही. उलट या कामासाठी काही शेतकºयांकडून प्रती विहीर ३०० ते ४०० रुपयांची उगाही करण्यात आल्याचे बोलले जात आहे.शेंडा, कोयलारी, कोहळीपार, उशिखेडा व प्रधानटोला येथील काही शेतकºयांची शेती जंगलाला लागून आहे. वन्यप्राण्यांची रेलचेल अधिक प्रमाणात असल्याने कोणताही वन्यप्राणी धोक्याने विहिरीत पडू नये म्हणून त्यांच्या संरक्षणासाठी वनविभागाकडून लोखंडी कठडे बसविण्यात येणार होते. या कामासाठी प्रती विहीर ३०० ते ४०० रुपये घेण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे ही योजना फसवी होती की, लालच देणारी असे तर्क-वितर्क लावले जात आहेत.सध्या या परिसरातील शेतकºयांची धानपिकाची रोवणी झाली आहे. त्यामुळे सर्वत्र हिरवेगार रान दिसते. रात्रीच्या वेळेस जंगलातील सांबर, चितळ, रानडुकर व रानगव्या सारखे वन्य प्राणी याच धान पिकावर ताव मारुन शेतकºयांच्या पिकांचे मोठे नुकसान करतात. त्याचबरोबर प्रसंगावधनाने एखादा वन्य प्राणी विहिरीत पडू शकतो हे नाकारता येत नाही. हीच बाब लक्षात घेवून अशा विहिरींवर लोखंडी कठडे लावण्याचे वनविभागाकडून ठरविण्यात आले होते. त्याचे सर्वेक्षण करुन यादी तयार करण्यात आली होती. मात्र तीन वर्षांचा काळ लोटूनही वनविभागाकडून कोणतेच पाऊल उचलण्यात आले नसल्याने ही योजना फसवी होती की लालच देणारी होती हे कळायला मार्ग नाही.वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी तसेच शेतकºयांचे हित लक्षात घेता जंगल परिसरात तारेचे काटेरी कुंपन करणे तसेच विहिरींना लोखंडी कठडे लावणे गरजेचे आहे. यासाठी वनविभागाने त्वरित दखल घेवून जंगल व शेत शिवारातील विहिरींना लोखंडी कठडे बसविण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. सदर प्रकरणाची माहिती घेण्यासाठी सडक-अर्जुनी येथील वनपरिक्षेत्राधिकारी गोवर्धन राठोड यांचेशी मोबाईलवरुन संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.जंगल परिसरातील विहिरींची पाहणी करुन त्याची यादी वनक्षेत्राधिकारी कार्यालयास सादर करण्यात आली होती. परंतु त्याचे काय झाले हे कळले नाही.- मोहतुरेप्र.क्षेत्रसहायक शेंडा.

टॅग्स :forest departmentवनविभागFarmerशेतकरी