शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
2
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
3
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
4
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
5
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
6
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
7
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
8
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
9
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
10
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
11
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
12
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
13
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
14
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
15
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
16
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
17
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
18
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
19
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
20
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 

आमगाव-देवरी मार्ग मृत्यूला आमंत्रण

By admin | Updated: October 6, 2016 01:02 IST

सार्वजनिक बांधकाम विभाग रोहयो आमगाव येथील कार्यालयात अधिकारी नाहीत काय? याचे उदाहरण म्हणजे सततच्या पावसाने...

खड्ड्यात गेला रस्ता : सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी निंद्रावस्थेतआमगाव : सार्वजनिक बांधकाम विभाग रोहयो आमगाव येथील कार्यालयात अधिकारी नाहीत काय? याचे उदाहरण म्हणजे सततच्या पावसाने आमगाव-देवरी मार्गावर पडलेले खड्डे मृत्यूला आमंत्रण देत आहेत. मात्र अधिकारी किंवा कर्मचारी याची झोप अद्याप उघडली नसून ते निद्रीस्त असल्याचे समजते. अनेक दिवसांपासून आमगाव-देवरी मार्गावर ठिकठिकाणी जवळपास एक ते दोन फुटाच्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्याच खड्ड्यांतून चारचाकी, दुचाकी, सायकलस्वार प्रवास करीत आहेत. अनेक दुचाकीस्वार या खड्ड्यांत पडले. काहींना दुखापतही झाली. मात्र अधिकारी किंवा कर्मचारी समोर येऊन खड्ड्यात काही तरी गिट्टी टाकून त्यांना बुजविण्याचे धाडस अजूनपर्यंत कोणी केले नाही.पदमपूराच्या समोरील बाम्हणी रेल्वे फाटकाजवळील पुलावर ऐवढे खड्डे पटले आहेत की प्रवाशांना खड्ड्यात पाणी असल्याने अनुमान काढणे कठिण झाले आहे. त्याचा फटका वाहन चालकांना बसतो. दुचाकी सरळ खोल खड्ड्यात जाऊन अनेक प्रवाशी पडले व त्यांना दुखापत झाली. मात्र पडलेल्या खड्ड्यात गिट्टी किंवा मुरुम टाकण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग रोहयोकडून झाले नाही. याच मार्गावर अंजोरा समोरील पुलावर चित्र मोठे विचित्र आहे. कोणत्या बाजूने गाडी काढायची, असे गंभीर आव्हान चालकासमोर असते. तोल गेला तर पुलाच्या खाली अपघात नक्की होणार, हे निश्चित आहे. खड्डे वाचविण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या बाजूने येणाऱ्या वाहनाशी आमोरसमोर टक्कर होऊन अपघात झाल्याशिवाय राहत नाही, पुलावर अशी गंभीर स्थिती आहे. यापेक्षा आमगाव-देवरी मार्गावर अनेक ठिकाणी पडलेले खड्डे मृत्यूला आलिंगन देत आहेत. तसेच दरवर्षी त्याच ठिकाणी सतत खड्डे पडतात. त्याची उन्हाळ्यात दुरुस्ती होेते. मात्र पावसाळा लागला की त्याच ठिकाणी पुन्हा खड्डे पडतात, हे वेळापत्रक दरवर्षीचे ठरलेले आहे. एकंदरीत दाखविण्याकरिता काम घेतात, मात्र कामाचा दर्जा मुळीच राहत नाही. पोवारीटोला समोरील पुलावर दरवर्षी एकाच ठिकाणी खड्डे पडतात कसे, हा प्रवाशांसमोर मोठा बिकट प्रश्न आहे. कामाच्या नावावर बिल तयार करणे, कंत्राटदाराचे पोट भरणे, त्यात आपले चांगभलं करणे ही अधिकाऱ्यांची नित्याचीच बाब ठरली आहे. मात्र नेहमीकरिता उपाय अधिकाऱ्यांना सूचला नाही व उपाय सूचला असेल तर त्याची कायमस्वरुपी अंमलबजावणी होणार नाही किंवा अधिकारी करणार नाही. फक्त निधी नाही, नियोजन नाही, ही बोलभाषा अधिकाऱ्यांना पाठांतर झाली आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग रोहयोचे अधिकारी, कर्मचारी व चालकसुद्धा नगरात मुक्कामी नाही. गोंदिया-नागपूर हा वेळापत्रक ठरलेला आहे. जवळपास १२ वाजता येणे, चार तास थांबणे किंवा गोंदिया डिव्हिजनमध्ये गेले आहेत, असे उत्तर ऐकायला मिळते. लगेच चार वाजले की परतीचा प्रवास सुरू होतो, ही नित्याचीच बाब ठरली आहे. त्यामुळे खड्डे कुठे पडले, खड्ड्यांत कोण पडला याचे काही घेणे-देणे अधिकाऱ्यांना नाही. हे कार्यालय रामभरोसे सोडले, अशा अधिकाऱ्यांवर प्रथम कारवाई होणे गरजेचे असून रस्त्याची दुरूस्ती अत्यावश्यक झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)