शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी धान पिकांवर किडरोगांचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 05:00 IST

जिल्ह्यात खरीपानंतर रब्बी पिकांची सुध्दा लागवड केली जाते. यंदा जिल्ह्यातील ४० हजार हेक्टरवर रब्बी धानाची लागवड करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे ते शेतकरी सुध्दा धानाची लागवड करतात. यंदा सुरुवातीला रब्बी धान पिकाच्या वाढीसाठी अनुकुल वातावरण मिळाले. त्यामुळे धानाची चांगली वाढ झाली आहे. आता धान निसविण्याच्या स्थितीत असताना त्यावर विविध किडरोगांचे आक्रमण झाले आहे.

ठळक मुद्देहाती आलेले पीक गमाविण्याची वेळ : चार हजार हेक्टरमधील पिके बाधीत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ढगाळ व उष्ण दमट वातावरणाचा परिणाम रब्बी हंगामातील धान पिकांवर होत आहे. वातावरणातील बदलामुळे ४ हजार हेक्टरमधील धान पिकांवर करपा, मानमोडी या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे हाती आलेले धानपिके गमाविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे बळीराजा चिंतातूर आहे.जिल्ह्यात खरीपानंतर रब्बी पिकांची सुध्दा लागवड केली जाते. यंदा जिल्ह्यातील ४० हजार हेक्टरवर रब्बी धानाची लागवड करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे ते शेतकरी सुध्दा धानाची लागवड करतात. यंदा सुरुवातीला रब्बी धान पिकाच्या वाढीसाठी अनुकुल वातावरण मिळाले. त्यामुळे धानाची चांगली वाढ झाली आहे. आता धान निसविण्याच्या स्थितीत असताना त्यावर विविध किडरोगांचे आक्रमण झाले आहे.परिणामी धानावर खोडकिडा, पेरवा, मानमोडी, पर्णकोस, करपा, लोंबीवरील ढेकण्या या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने धानाचे लोंब पांढरे पडत असून शेतकºयांना हाती आलेले पीक गमाविण्याची वेळ आली आहे. कृषी विभागाच्या मते बदलत्या वातावरणाचा सर्वाधिक धान पिकावर परिणाम होत आहे. ढगाळ आणि उष्णदमट वातावरण बुरशीजन्य रोगांच्या वाढीसाठी अनुकुल असते. त्यामुळे सध्या बुरशीेजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने धानाचे लोंब पांढरे पडत आहे. ४० हजार हेक्टरपैकी जवळपास ४ हजार हेक्टरमध्ये या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सध्या धान निसविण्याच्या स्थितीत आहे याच कालावधी करपा, मानमोडी, पेरवा, खोडकिडा या किडरोगांचा प्रादुर्भाव वाढला असल्याने शेतकºयांना हाती आलेले पीक गमवावे तर लागणार नाही ना अशी चिंता सतावित आहेत. धानावरील किडरोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकरी विविध किटकनाशकांची फवारणी करीत आहेत. मात्र यानंतरही किडरोग आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे.सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव परिसराला फटकारब्बी हंगामातील धानाची सर्वाधिक लागवड ही अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी तालुक्यात आली आहे. मात्र या भागातील धान उत्पादक शेतकरी मागील पंधरा दिवसांपासून चिंतातूर आहे. ऐन धान निसविण्याच्या स्थितीत असताना त्यावर विविध किडरोगांचा प्रादुर्भाव झाल्याने त्यांना हाती आलेली पीक गमाविण्याची वेळ आली आहे. किटकनाशकांची फवारणी करुन सुध्दा किडरोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी सुध्दा यामुळे त्रस्त झाले आहे. किडरोगांचा प्रादुर्भाव पाहता शेतकºयांनी केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघणार की नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे.या धानावर कमी प्रादुर्भावइतर धानाच्या प्रजातींच्या तुलनेत सुमो,बाहुबली, १००१ या धानाच्या प्रजातीवर किडरोगांचा कमी प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. मागील वर्षी शेतकºयांनी अहिल्या प्रजातीच्या धानाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती. त्यापासून चांगले उत्पादन मिळाल्याने शेतकºयांनी यंदा देखील मोठ्या प्रमाणावर याच धानाची लावगड केली.मात्र सध्या या धानावर किडरोगाचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे.त्यामुळे शेतकºयांनी धानपिकावरील रोगाला सुध्दा सध्या कोरोना हे नाव दिल्याची माहिती आहे.ढगाळ आणि उष्ण दमट वातावरणामुळे धानपिकावर किडरोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. जिल्ह्यातील ४० हजार हेक्टर क्षेत्रापैकी ४ हजार हेक्टरमधील पिके किडरोगामुळे बाधीत झाली आहे. किडरोगाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने त्याच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्याचे अधिकार तालुका स्तरावर तहसीलदार आणि कृषी अधिकाºयांना सुध्दा आहे. तसेच शेतकºयांना मार्गदर्शन केले जात आहे.- गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :agricultureशेती