शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

नैसर्गिक शेतीसाठी वीज प्रकल्पाचा पुढाकार

By admin | Updated: May 25, 2014 23:42 IST

दिवसेंदिवस रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत घसरत जात आहे. तो कायम ठेवण्यासाठी आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी तिरोडा येथील अदानी ऊर्जा निर्मिती प्रकल्पाने पुढाकार घेतला आहे.

तिरोडा : दिवसेंदिवस रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत घसरत जात आहे. तो कायम ठेवण्यासाठी आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी तिरोडा येथील अदानी ऊर्जा निर्मिती प्रकल्पाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी प्रकल्पातील कोळशाच्या राखेतून गांढूळ खताची निर्मिती करून ती परिसरातील शेतकर्‍यांना पुरविली जात आहे. याचा लाभ परिसरातील १८ गावांमधील शेतकर्‍यांना होणार आहे.

या उपक्रमानुसार या परिसरातील शेतकर्‍यांना गांढूळ खत बनवण्याचे तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले आहे. दोन महिन्याच्या काळात १000 शेतकरी १000 मेट्रिक टन फ्लायअँशने गांढूळ खत निर्मिती करू शकतात, असा अंदाज आहे. शेतकर्‍यांसह अंदाजे ४00 स्थानिकांना कवलेवाडा, धामणेवाडा, गराडा, चुरडी, काचेवानी, जमुनिया, बरबसपूरा, ठाणेगाव, भिवापूर, चिरेखाणी, चिखली व खामरी या गावातील गांढूळ खत निर्मितीबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.

फ्लाय अँशचे शेणाच्या रुपात ऑरगॅनिक साहित्यासोबत १:१ या प्रमाणात मिश्रण कर करून ५0 दिवस त्यावर प्रक्रिया केली जाते. गांढूळ, राख व ऑरगॅनिक साहित्याच्या या मिश्रणात फॉस्फेट सोल्युबलायजिंग बॅक्टेरियाचे (पीएसबी) प्रमाण अनेक पटींनी वाढते.

यामुळे फ्लायअँशमधील लक्षणीय प्रमाणातील इनसोल्युबल मिनरलचे रुपांतर विरघळणार्‍या स्वरुपात करण्यास मदत होते आणि त्यामुळे व्हॅर्मिकम्पोस्टमधील पोषण मूल्यांची जैवउपलब्धता वाढते.

प्रकल्पाजवळच्या गावांमध्ये शेण मुबलक उपलब्ध आहे. त्यामुळे कोळशाची राख आणि गुरांचे शेण यांच्या योग्य व्यवस्थापनातून मोठय़ा प्रमाणात गांढूळ खत निर्मिती करणे शक्य होणार आहे. ज्यामुळे पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन होईलच, शिवाय त्यामध्ये समाविष्ट असलेली महत्वाची पोषणद्रव्ये जतन होण्यासाठीही मदत होणार आहे.

अदानी पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत जैन यांनी सांगितले की, आम्ही नेहमीच आमचे ऊर्जा प्रकल्प पर्यावरणदृष्ट्या सुरक्षित वातावरणात चालवणार्‍या मताचे आहोत.

मुंद्रा (गुजरात) येथील गांढूळ खताच्या प्रायोगिक प्रकल्पाच्या यशानंतर आम्ही हा उपक्रम तिरोडा येथे यशस्वीपणे सुरू केला असल्याचे त्यांनी कळविले.(तालुका प्रतिनिधी)