शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

पोलीस पाटील दडवतात अवैध धंद्यांची माहिती

By admin | Updated: October 29, 2014 22:52 IST

गावातील शासनाचा प्रतिनिधी म्हणजे पोलीस पाटील असतो. परंतु हा पोलीस पाटील गावातील अवैध धंद्यांची माहिती पोलीसांना देत नसल्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच फावते.

गोंदिया : गावातील शासनाचा प्रतिनिधी म्हणजे पोलीस पाटील असतो. परंतु हा पोलीस पाटील गावातील अवैध धंद्यांची माहिती पोलीसांना देत नसल्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच फावते. परिणामी अवैध धंद्याला चालना मिळते. पोलीस पाटील गावातील अवैध धंद्यांची माहिती लपवितात असा सूर नागरिकांचा आहे.गावात शांतता नांदून सर्वत्र सुबत्ता नांदावी, अशी सर्वानची अपेक्षा असते. गावात वास्तव्य करणाऱ्या विविध जाती धर्माच्या लोकांमध्ये एकोपा नांदत राहावा यासाठी गावातील सृजन नागरिक प्रयत्नही करतात. गावात काही असामाजिक तत्वांचा शिरकाव झाल्याने गावात अवैध धंद्याला ऊत येते. या अवैध धंद्यामुळे गावात अराजकता पसरते व त्यातूनच भांडण-तंटे निर्माण होते.ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी पंचायत राजच्या माध्यमातून ग्राम पंचायतमध्ये सरळ निधी येतो. स्थानिक स्वराज्य संस्था ग्राम पंचायतच्या माध्यामातून गावात मूलभूत सोयी उपलब्ध करून सार्वजनिक कार्याला गती दिली जाते. गावातील आपसामधील भांडण-तंटे गावातच मिटवून गावात शांतता अबाधित राखण्यासाठी गावात असलेली महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती प्रयत्न करते. गावातील भांडण तंटे सामोपचाराने सोडविण्याबरोबर गावातील अवैध धंद्यावर आळा घालण्याचा प्रयत्न महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती करीत असते. परंतु काही गावातीलच तंटामुक्त समित्या या अवैध धंद्यांच्या विरोधात एल्गार पुकारतात. परंतु बहुतांश गावातील तंटामुक्त गाव समित्या अवैध धंद्दे बंद करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. अवैध धंदे करणाऱ्यांसोबत आपले वैर का करावे असे गृहीत धरून अनेक तंटामुक्तीचे पदाधिकारी अवैध धंदे करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करीत नाही. परंतु पोलीसांच्या सहकार्यासाठी शासनाने प्रत्येक गावात पोलीस पाटलाची नियुक्ती केली. पोलीसांचे काम अवैध धंद्यावर आळा घालण्याचे आहे. मग या अवैध धंद्दे करणाऱ्यांची माहिती पोलीस पाटील पोलीसांना न देता का दडवतात असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. गाव व शासन यातील दुवा समजला जाणारा पोलीस पाटील अवैध धंद्याना आळा घालण्यासाठी कवडीचेही प्रयत्न करीत नाही. गावात कश्या प्रकारचे अवैध व्यवसाय चालते याची इतंभूत माहिती पोलीस पाटलांना असते. मात्र या धंद्यांची माहिती ते पोलीसांपर्यंत का पोहचवित नाही हे न सुटणारे कोडे आहे. पोलीस पाटील पोलीसांना मदत करण्यासाठी नसून फक्त मानधन उचलण्यापुरतेच राहीले असल्याची टिका काही लोकांकडून ऐकीवात येते. पोलीस पाटलांनी अवैध धंद्यांना गावातून नायनाट करण्याचा चंग बांधल्यास गावात शांतता नांदायला वेळ लागणार नाही, असाही नागरिकांचा सूर आहे. (तालुका प्रतिनिधी)