शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

पोलीस पाटील दडवतात अवैध धंद्यांची माहिती

By admin | Updated: October 29, 2014 22:52 IST

गावातील शासनाचा प्रतिनिधी म्हणजे पोलीस पाटील असतो. परंतु हा पोलीस पाटील गावातील अवैध धंद्यांची माहिती पोलीसांना देत नसल्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच फावते.

गोंदिया : गावातील शासनाचा प्रतिनिधी म्हणजे पोलीस पाटील असतो. परंतु हा पोलीस पाटील गावातील अवैध धंद्यांची माहिती पोलीसांना देत नसल्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच फावते. परिणामी अवैध धंद्याला चालना मिळते. पोलीस पाटील गावातील अवैध धंद्यांची माहिती लपवितात असा सूर नागरिकांचा आहे.गावात शांतता नांदून सर्वत्र सुबत्ता नांदावी, अशी सर्वानची अपेक्षा असते. गावात वास्तव्य करणाऱ्या विविध जाती धर्माच्या लोकांमध्ये एकोपा नांदत राहावा यासाठी गावातील सृजन नागरिक प्रयत्नही करतात. गावात काही असामाजिक तत्वांचा शिरकाव झाल्याने गावात अवैध धंद्याला ऊत येते. या अवैध धंद्यामुळे गावात अराजकता पसरते व त्यातूनच भांडण-तंटे निर्माण होते.ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी पंचायत राजच्या माध्यमातून ग्राम पंचायतमध्ये सरळ निधी येतो. स्थानिक स्वराज्य संस्था ग्राम पंचायतच्या माध्यामातून गावात मूलभूत सोयी उपलब्ध करून सार्वजनिक कार्याला गती दिली जाते. गावातील आपसामधील भांडण-तंटे गावातच मिटवून गावात शांतता अबाधित राखण्यासाठी गावात असलेली महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती प्रयत्न करते. गावातील भांडण तंटे सामोपचाराने सोडविण्याबरोबर गावातील अवैध धंद्यावर आळा घालण्याचा प्रयत्न महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती करीत असते. परंतु काही गावातीलच तंटामुक्त समित्या या अवैध धंद्यांच्या विरोधात एल्गार पुकारतात. परंतु बहुतांश गावातील तंटामुक्त गाव समित्या अवैध धंद्दे बंद करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. अवैध धंदे करणाऱ्यांसोबत आपले वैर का करावे असे गृहीत धरून अनेक तंटामुक्तीचे पदाधिकारी अवैध धंदे करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करीत नाही. परंतु पोलीसांच्या सहकार्यासाठी शासनाने प्रत्येक गावात पोलीस पाटलाची नियुक्ती केली. पोलीसांचे काम अवैध धंद्यावर आळा घालण्याचे आहे. मग या अवैध धंद्दे करणाऱ्यांची माहिती पोलीस पाटील पोलीसांना न देता का दडवतात असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. गाव व शासन यातील दुवा समजला जाणारा पोलीस पाटील अवैध धंद्याना आळा घालण्यासाठी कवडीचेही प्रयत्न करीत नाही. गावात कश्या प्रकारचे अवैध व्यवसाय चालते याची इतंभूत माहिती पोलीस पाटलांना असते. मात्र या धंद्यांची माहिती ते पोलीसांपर्यंत का पोहचवित नाही हे न सुटणारे कोडे आहे. पोलीस पाटील पोलीसांना मदत करण्यासाठी नसून फक्त मानधन उचलण्यापुरतेच राहीले असल्याची टिका काही लोकांकडून ऐकीवात येते. पोलीस पाटलांनी अवैध धंद्यांना गावातून नायनाट करण्याचा चंग बांधल्यास गावात शांतता नांदायला वेळ लागणार नाही, असाही नागरिकांचा सूर आहे. (तालुका प्रतिनिधी)