शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

महागाईचा आगडोंब, शेतकऱ्यांची गळचेपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:28 IST

अर्जुनी मोरगाव : 'अच्छे दिन आएंगे'चा नारा काही वर्षांपूर्वी गुंजला होता. अच्छे दिन तर सोडाच मात्र जुने दिवससुद्धा कायम ...

अर्जुनी मोरगाव : 'अच्छे दिन आएंगे'चा नारा काही वर्षांपूर्वी गुंजला होता. अच्छे दिन तर सोडाच मात्र जुने दिवससुद्धा कायम राहू शकले नाहीत. महागाईचा आगडोंब उसळला आहे. सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे वाढती महागाई अशा दुष्टचक्रात जनता अडकली आहे. वाढत्या महागाईवर केंद्र सरकारने लगाम लावावा, अशी मागणी माजी जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केली आहे.

पेट्रोल, गॅस सिलिंडरच्या दरात दैनंदिन वाढ होत आहे. तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे गृहिणींचे घरगुती बजेट बिघडले आहे. गॅस सिलिंडरचे दर गेल्या एक महिन्यात सुमारे दोनशे रुपयांनी वाढले आहेत. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे दरवाढ झाल्याचे सांगितले जाते. मात्र तेलाच्या किमती कमी झाल्यानंतर त्या प्रमाणात किमती कमी होत नाहीत. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतुकीचे दर वाढले. या दरवाढीमुळे महागाई वाढत आहे. याचा विचार सरकारने केला पाहिजे, असे मत परशुरामकर यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे इफकोने खताच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. डीएपीच्या किमती ५८ टक्क्यांनी वाढल्या आहेत. राज्यातील शेतकरी डीएपीचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. रब्बी हंगामात अडीच लाख टन तर खरीपमध्ये सहा लाख टनांपर्यंत डीएपीची विक्री होते. १२०० रुपयात मिळणारे डीएपी १९०० रुपयात मिळणार आहे. १०:२६:२६ हे खत ११७५ रुपयात मिळत होते. ते आता १७७५ रुपयात मिळणार आहे. तर १२:३२:१६ हे खत ११८५ रुपयाला मिळत होते ते आता १८०० रुपयाला मिळणार आहे. या खत दरवाढीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. सरकारने याचा विचार करून दरवाढीवर नियंत्रण राखावे अन्यथा शेतकऱ्यांना जगणे दुष्कर होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.