शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
2
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
3
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
4
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
5
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
6
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
7
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
8
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
9
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
10
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
11
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
12
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
13
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
14
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
15
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
16
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
17
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
18
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
19
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
20
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!

भाजीपाल्याला लागला महागाईचा तडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:19 IST

गोंदिया : कोरोनाची दुसरी आल्याने राज्य शासनाने दुसऱ्यांचा लॉकडाऊन केला होता. या काळात अनेक व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने याचा ...

गोंदिया : कोरोनाची दुसरी आल्याने राज्य शासनाने दुसऱ्यांचा लॉकडाऊन केला होता. या काळात अनेक व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने याचा शेती व्यवसायाला फटका बसला होता. मात्र, आता जून महिन्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य शासनाने अनलॉक प्रक्रिया सुरू केली आहे. गोंदिया आणि लगतच्या बालाघाट जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकाचे उत्पन्न घेतले जाते. मात्र, मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे कांदा व इतर भाज्या, फळे बाहेरील जिल्ह्यातून येथे विक्रीसाठी येत आहेत. लॉकडाऊननंतर सुरू झालेली अनलॉक प्रक्रिया आणि डिझेल, पेट्रोलचे सातत्याने वाढत असलेले दर लक्षात घेता भाजीपाला महागला असल्याचे दिसून येत आहे. सध्या बाजारात कांदे ३० रुपये किलो, तर बटाटे २५ रुपये किलो, टोमॅटो ३० रुपये, वांगे ३० रुपये किलो, पालेभाज्या १५-२० रुपये जुडी, भेंडी ६० रुपये किलो असे भाज्यांचे दर वाढलेले दिसून येत आहेत. त्यामुळे आता गृहिणींकडून पुन्हा एकदा कडधान्य, डाळींचा वापर वाढल्याचे दिसत आहे. एकीकडे भाजीपाल्याचे दर वाढले असले तरी दुसरीकडे मात्र प्रत्यक्ष शेतकऱ्यांना कमी दरानेच भाजीपाला विकावा लागत आहे. यात व्यापारीच मोठे होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

------------------------

आज सर्वसामान्य माणसांना जगताना मोठी कसरत करावी लागत आहे. आठवड्याचा भाजीपाला घ्यायचे म्हटले तर २००-३०० रुपये लागतात. त्याऐवजी डाळींचा, कडधान्याचा अधिक वापर करावा लागत आहे. पावसाळ्यात भाजीपाला व्यवस्थित येत नसल्यानेही कडधान्य जास्त वापरणे ठीक आहे.

- संध्या विश्वकर्मा (गृहिणी)

--------

आज भाजीपाला घ्यायला जाणे म्हणजे थैलीत पैसा व खिशात भाजीपाला अशी स्थिती आहे. त्यात अनलॉकनंतर आणखीच दर वधारल्याचे दिसत आहे. यामुळे आता भाजीपाला खाणे परवडणारे राहिले नाही. त्यामुळे कडधान्य खाणे जास्त परवडणारे ठरत आहे. यामुळे कडधान्यांचा समावेश होत आहे.

- सीमा बन्सोड (गृहिणी)

-------

बाजारात जिल्ह्यातील भाजीपाला कमी प्रमाणात येत आहे. त्या तुलनेत जिल्ह्याबाहेरून येणारा भाजीपाला हा महागला असल्याने त्यामुळे दर काहीसे वाढले आहेत.

-राजू देशमुख, भाजीपाला व्यापारी.

--------------

लोकांना असे वाटते की, भाजीपाला विक्रेत्यांकडून अधिक दराने भाजीपाला विकला जातो. मात्र, प्रत्यक्षात आम्हालाही जादा दराने खरेदी करावी लागते. स्वस्तात मिळाल्यास आम्हीही ग्राहकांना कमी दराने विकतो.

-राजेश येटरे, भाजीपाला व्यापारी.

-------

मी कारले, चवळी, वांग्याची लागवड केली होती. याला चांगला दरही मिळाला. मात्र, आता इथून पुढे लागवड केलेल्या भाजीपाल्याला चांगला दर मिळेलच याची खात्री नाही. शासनाने खतांचे, बियाणांचे दर कमी करायला हवेत.

-दसाराम बिसेन, भाजीपाला उत्पादक शेतकरी, मुंडीपार

-----------

भाजीपाला लागवड फायदेशीर ठरते. मात्र, कोरोना परिस्थितीत मजूर मिळत नव्हते. इतर कामातही अडचणी येत होत्या. यावर्षी धानाचे क्षेत्र कमी केले आहे. आता भाजीपाला पिकाचे क्षेत्र वाढवले आहे. त्यामुळे विक्रीला भाजीपाला येईपर्यंत दर किती राहतो, हे सांगता येणार नाही.

-निहारीलाल दमाहे, भाजीपाला उत्पादक शेतकरी, लोधीटोला