शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Gondia; गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यात कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 18:28 IST

मागील दहा दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शनिवारी (दि.३०) पुन्हा चार नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने रुग्ण वाढीचा वेग कायम आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात चार कोरोनाबाधित रुग्णांची भर

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मागील दहा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शनिवारी (दि.३०) पुन्हा चार नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने रुग्ण वाढीचा वेग कायम आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या देवरी तालुक्यात सुध्दा शनिवारी कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आता जिल्ह्यातील आठही तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही ग्रामीण भागात वाढत असल्याने चिंता वाढली आहे. मात्र शनिवारी चार कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात मुंबई, पुणे आणि इतर राज्यातील लोकांचे येणे सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढ आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत आढळलेले सर्व कोरोनाबाधित रुग्ण हे बाहेरुन जिल्ह्यात आले आहेत. शनिवारी जिल्ह्यात पुन्हा चार कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा ६६ वर पोहचला आहे. मात्र शुक्रवारपर्यंत २८ आणि शनिवारी पुन्हा चार रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने जिल्ह्यात आता ३४ अक्टीव्ह रुग्ण आहे. शनिवारी आढळलेल्या रुग्णामध्ये १ देवरी तालुक्यातील तर ३ गोंदिया तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मागील दोन महिन्यांपासून देवरी तालुक्यात एकही रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे हा तालुका आत्तापर्यंत कोरोनामुक्त होता. मात्र शनिवारी देवरी तालुक्यात सुध्दा १ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आता जिल्ह्यातील सर्व आठही तालुक्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातच कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच आरोग्य यंत्रणेवरील ताण सुध्दा वाढला आहे.

३२ कोरोनाबाधित झाले कोरोनामुक्तजिल्ह्यात सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यात शनिवारपर्यंत एकूण ६६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. मात्र यापैकी शनिवारपर्यंत (दि.३०) एकूण ३२ कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. ही जिल्हावासीयांसाठी थोडी दिलासादायक बाब आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता केवळ ३४ अक्टीव्ह कोरोनाबाधित रुग्ण असून ते सुध्दा उपचाराला चांगला प्रतिसाद देत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

माहिती लपविणाऱ्यांमुळे वाढला धोकामुंबई, पुणे, दिल्ली या मोठ्या शहरांसह बाहेरील राज्यात रोजगार व इतर कामासाठी गेलेले नागरिक आता आपल्या जिल्ह्यात परतत आहे. मात्र हे जिल्ह्यात परतल्यानंतर याची माहिती जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाला देत नसल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे. बाहेरुन येणारे नागरिक माहिती लपवित असल्याने जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.त्यामुळे प्रशासनाच्या अडचणीत सुध्दा भर पडली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस