शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र फिडरमुळे अडचणी सुटणार

By admin | Updated: March 13, 2016 02:08 IST

मागेल त्याल वीज कनेक्शन देण्यात येत आहे. त्यामुळे राज्याचे चित्र बदलत असून राज्याची वीज भारनियमन मुक्तीकडे वाटचाल सुरु आहे.

पालकमंत्री बडोले : ३३ के.व्ही.च्या कोहमारा उपकेंद्राचे उद्घाटन गोंदिया : मागेल त्याल वीज कनेक्शन देण्यात येत आहे. त्यामुळे राज्याचे चित्र बदलत असून राज्याची वीज भारनियमन मुक्तीकडे वाटचाल सुरु आहे. कृषी पंप जोडणीमुळे शेतकरी आता बारमाही शेतीकडे वळत आहे. वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या वीजेबाबतच्या अडचणी सोडविण्यासाठी आता फिडर सेपरेशनचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. सडक/अर्जुनी तालुक्यातील कोहमारा (कोसबी) येथे राज्य वीज वितरण कंपनीच्या ३३/११ के.व्ही उपकेंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती कविता रंगारी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य माधुरी पाथोडे, महावितरणच्या गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता बी.के.जनवीर, अधीक्षक अभियंता कबीरदास चव्हाण, ए.एस.घोगरे, भंडाराचे अधीक्षक अभियंता मडावी, गोंदियाचे कार्यकारी अभियंता सावळे, देवरीचे कार्यकारी अभियंता वाकडे, सडक/अर्जुनीचे उपविभागीय अभियंता दखने, विद्युत निरीक्षक विजय खापर्डे, पंचायत समिती सदस्य गिरधारी हत्तीमारे, कोसबी सरपंच अल्का रामटेके, उपसरपंच कृष्णा कोरे, माजी पंचायत समिती सभापती पद्मा परतेकी उपस्थित होते.पुढे बोलताना बडोले यांनी, वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना विज कनेक्शन देण्याचा रेकार्ड केला असून यामुळे शेतकऱ्यांच्या तक्र ारी कमी होत आहेत. त्यात आता खोबा, कोसमतोंडी व केशारी येथे लवकरच नवीन उपकेंद्राचे काम सुरु करण्यात येईल. क्षेत्रनिहाय वीज पुरवठा ग्राहकांना व्यवस्थितपणे देणे हे कंपनीचे काम आहे. शेंडा व दल्ली परिसरातील शेतक री व ग्राहकांना वीज वितरण कंपनीकडून सरासरी बिल देण्यात येत असल्याच्या तक्र ारी आहेत तरी मीटर रिडींगनुसार बिल देण्यात यावे असे त्यांनी सांगितले. तसेच मागास व दुर्गम क्षेत्रातील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी इन्फ्रा-२ चे योग्य नियोजन करावे. राज्यातील दलित वस्त्यांना योग्यप्रकारे वीज पुरवठा व्हावा, तसेच वीज उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीसाठी सामाजिक न्याय विभागाकडून ४०० ते ५०० कोटी रुपये देण्यात येईल. शेतकऱ्यांनीसुध्दा वीज बिलाचा भरणा त्वरीत करु न वीज कंपनीला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.अध्यक्षस्थानावरुन बोलतांना रंगारी यांनी, कोहमारा येथे नव्याने तयार झालेल्या उपकेंद्रामुळे या भागातील नागरिक व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या व घरगुती वीज ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी वीज वितरण कंपनीने वेळीच लक्ष द्यावे असेही त्या म्हणाल्या. प्रास्ताविकातून जनवीर यांनी, २ कोटी ५० लक्ष रु पये खर्च करु न तयार करण्यात आलेल्या कोहमाराच्या या उपकेंद्रामुळे परिसरातील २० गावांना लाभ होणार आहे. विकासकामे करताना कंपनीला वीज ग्राहकांनी सहकार्य केल्यास समस्यांवर मात करण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले. संचालन उपअभियंता परिहार यांनी केले. आभार कार्यकारी अभियंता वाकडे यांनी मानले. या कार्यक्रमाला कोहमारा परिसरातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)