शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

स्वतंत्र फिडरमुळे अडचणी सुटणार

By admin | Updated: March 13, 2016 02:08 IST

मागेल त्याल वीज कनेक्शन देण्यात येत आहे. त्यामुळे राज्याचे चित्र बदलत असून राज्याची वीज भारनियमन मुक्तीकडे वाटचाल सुरु आहे.

पालकमंत्री बडोले : ३३ के.व्ही.च्या कोहमारा उपकेंद्राचे उद्घाटन गोंदिया : मागेल त्याल वीज कनेक्शन देण्यात येत आहे. त्यामुळे राज्याचे चित्र बदलत असून राज्याची वीज भारनियमन मुक्तीकडे वाटचाल सुरु आहे. कृषी पंप जोडणीमुळे शेतकरी आता बारमाही शेतीकडे वळत आहे. वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या वीजेबाबतच्या अडचणी सोडविण्यासाठी आता फिडर सेपरेशनचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. सडक/अर्जुनी तालुक्यातील कोहमारा (कोसबी) येथे राज्य वीज वितरण कंपनीच्या ३३/११ के.व्ही उपकेंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती कविता रंगारी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य माधुरी पाथोडे, महावितरणच्या गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता बी.के.जनवीर, अधीक्षक अभियंता कबीरदास चव्हाण, ए.एस.घोगरे, भंडाराचे अधीक्षक अभियंता मडावी, गोंदियाचे कार्यकारी अभियंता सावळे, देवरीचे कार्यकारी अभियंता वाकडे, सडक/अर्जुनीचे उपविभागीय अभियंता दखने, विद्युत निरीक्षक विजय खापर्डे, पंचायत समिती सदस्य गिरधारी हत्तीमारे, कोसबी सरपंच अल्का रामटेके, उपसरपंच कृष्णा कोरे, माजी पंचायत समिती सभापती पद्मा परतेकी उपस्थित होते.पुढे बोलताना बडोले यांनी, वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना विज कनेक्शन देण्याचा रेकार्ड केला असून यामुळे शेतकऱ्यांच्या तक्र ारी कमी होत आहेत. त्यात आता खोबा, कोसमतोंडी व केशारी येथे लवकरच नवीन उपकेंद्राचे काम सुरु करण्यात येईल. क्षेत्रनिहाय वीज पुरवठा ग्राहकांना व्यवस्थितपणे देणे हे कंपनीचे काम आहे. शेंडा व दल्ली परिसरातील शेतक री व ग्राहकांना वीज वितरण कंपनीकडून सरासरी बिल देण्यात येत असल्याच्या तक्र ारी आहेत तरी मीटर रिडींगनुसार बिल देण्यात यावे असे त्यांनी सांगितले. तसेच मागास व दुर्गम क्षेत्रातील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी इन्फ्रा-२ चे योग्य नियोजन करावे. राज्यातील दलित वस्त्यांना योग्यप्रकारे वीज पुरवठा व्हावा, तसेच वीज उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीसाठी सामाजिक न्याय विभागाकडून ४०० ते ५०० कोटी रुपये देण्यात येईल. शेतकऱ्यांनीसुध्दा वीज बिलाचा भरणा त्वरीत करु न वीज कंपनीला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.अध्यक्षस्थानावरुन बोलतांना रंगारी यांनी, कोहमारा येथे नव्याने तयार झालेल्या उपकेंद्रामुळे या भागातील नागरिक व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या व घरगुती वीज ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी वीज वितरण कंपनीने वेळीच लक्ष द्यावे असेही त्या म्हणाल्या. प्रास्ताविकातून जनवीर यांनी, २ कोटी ५० लक्ष रु पये खर्च करु न तयार करण्यात आलेल्या कोहमाराच्या या उपकेंद्रामुळे परिसरातील २० गावांना लाभ होणार आहे. विकासकामे करताना कंपनीला वीज ग्राहकांनी सहकार्य केल्यास समस्यांवर मात करण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले. संचालन उपअभियंता परिहार यांनी केले. आभार कार्यकारी अभियंता वाकडे यांनी मानले. या कार्यक्रमाला कोहमारा परिसरातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)