शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

मामा तलावांच्या पुनरूज्जीवनाने सिंचनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:15 IST

पूर्व विदर्भातील सर्वाधिक मामा (माजी मालगुजारी) तलावांचा जिल्हा म्हणून गोंदियाची ओळख आहे. मात्र या तलावांमधील गाळाचा ४० ते ५० वर्षांपासून उपसा न केल्याने त्यांची क्षमता कमी झाली होती.

ठळक मुद्दे१५५ तलावांतून गाळाचा उपसा : ४०० हेक्टर सिंचन क्षेत्रात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पूर्व विदर्भातील सर्वाधिक मामा (माजी मालगुजारी) तलावांचा जिल्हा म्हणून गोंदियाची ओळख आहे. मात्र या तलावांमधील गाळाचा ४० ते ५० वर्षांपासून उपसा न केल्याने त्यांची क्षमता कमी झाली होती. तर काही तलावांवर अतिक्रमण झाले होते. बºयाच उशीरा का होईना शासनातर्फे मामा तलावांच्या पुनरुज्जीवनाने सिंचन क्षमतेत वाढ झाली असून ४०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात यश आले आहे.जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील ४४८ मामा तलावांच्या पुनरु ज्जीवन कार्यक्र माला पहिल्या टप्प्यात २०१६-१७ या कालावधीत सुरूवात करण्यात आली. यापैकी ३९७ मामा तलावातील गाळाचा उपसा करण्याचे आदेश देण्यात आले. यापैकी १५५ तलावांच्या पुनरुज्जीवनाची कामे पूर्ण करण्यात आली. यातून ६ लाख ६९ हजार ५८७.६७ घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला.परिणामी तलावांच्या सिंचन क्षमतेत तेवढीेच वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील ४०० हेक्टर शेतीला सिंचनाची सोय होणार आहे. जिल्ह्यात १०० हेक्टर सिंचन क्षमतेचे १७७८ मामा तलाव असून याची सिंचन क्षमता ३५ हजार ४५८ हेक्टर आहे. त्यात १०० हेक्टरपेक्षा जास्त सिंचन क्षमतेचे ३८ मामा तलाव असून याची सिंचन क्षमता ६ हजार ५१० हेक्टर आहे. या तलावांच्या माध्यमातून २१ हजार ८२९ हेक्टरला सिंचन होते. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेला गोंदिया हा मागास, दुर्गम, आदिवासी बहुल व नक्षलदृष्ट्या संवेदनशील जिल्हा म्हणूनही ओळखला जातो. जिल्ह्यात धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. या पिकाला पाण्याची अधिक आवश्यकता असते. मात्र याला अनेकदा अनियमित पावसाचा फटका बसतो. यावर्षी देखील अत्यल्प पावसाचा पिकांना फटका बसला. मामा तलावातून सिंचनाची व्यवस्था निर्माण करण्यासाठी शासनाने दूरदृष्टीकोनातून पूर्व विदर्भातील माजी मालगुजारी तलावांचे पुनरूज्जीवन करु न त्यांना संजीवनी देण्याचा विशेष कार्यक्र म हाती घेतला आहे. त्यामुळे या तलावांची सिंचन क्षमता वाढवून अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आणण्यास मदत होणार आहे.रब्बी पिकांना होणार मदतमामा तलावांचा मत्स्यपालनासाठी उपयोग केला जात आहे. यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून शेतकºयांना मत्स्यपालन करणे शक्यत होत आहे.५० हेक्टरपेक्षा जास्त सिंचन क्षमतेच्या तलावातील पाण्याचा उपयोग या पुनरुज्जीवनाच्या विशेष कार्यक्रमामुळे शेतकºयांनी करायला सुरु वात देखील केली आहे. केवळ एका पाण्याच्या कमतरतेमुळे उत्पादनात येणारी घट उपलब्ध पाण्यामुळे भरु न निघण्यास मदत झाली आहे. काही शेतकºयांनी रबी हंगामात धान पिकाव्यतिरिक्त भाजीपाला, हरबरा, गहू ही पिके घेण्यास सुरु वात केली आहे.मामा तलावांना ३५० वर्षांचा इतिहासजिल्ह्याची ओळख राज्यात तलावांचा जिल्हा म्हणून आहे. ३५० वर्षापूर्वी सोळाव्या शतकात तत्कालीन गोंडराजा हिरशहा यांनी भविष्यातील पाण्याची आवश्यकता लक्षात घेता फर्मान काढले की, जो कोणी जंगले साफ करु न शेती करेल त्याला ती बहाल केली जाईल आणि जो कोणी तलाव बांधेल, त्याला त्या तलावाखालील जितकी जमीन असेल ती खुद शेतकरी म्हणून बक्षीस दिली जाईल. या संधीचा उपयोग करु न घेत जिल्ह्यातील त्यावेळेस कोहळी व पोवार समाजातील मालगुजारांनी लोकसहभागातून तत्कालीन शाश्वत सिंचन व्यवस्थापनाची एक परंपरागत पद्धत आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दूरदृष्टिकोनातून तलावांची निर्मिती केली. ब्रिटीश काळात हया तलावांची मालकी मालगुजारांकडे होती. सन १९५० मध्ये शासनाने हे तलाव मालगुजारांकडून ताब्यात घेतले. तेव्हापासून हे तलाव माजी मालगुजारी तलाव म्हणून ओळखले जातात.