शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

मामा तलावांच्या पुनरूज्जीवनाने सिंचनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:15 IST

पूर्व विदर्भातील सर्वाधिक मामा (माजी मालगुजारी) तलावांचा जिल्हा म्हणून गोंदियाची ओळख आहे. मात्र या तलावांमधील गाळाचा ४० ते ५० वर्षांपासून उपसा न केल्याने त्यांची क्षमता कमी झाली होती.

ठळक मुद्दे१५५ तलावांतून गाळाचा उपसा : ४०० हेक्टर सिंचन क्षेत्रात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पूर्व विदर्भातील सर्वाधिक मामा (माजी मालगुजारी) तलावांचा जिल्हा म्हणून गोंदियाची ओळख आहे. मात्र या तलावांमधील गाळाचा ४० ते ५० वर्षांपासून उपसा न केल्याने त्यांची क्षमता कमी झाली होती. तर काही तलावांवर अतिक्रमण झाले होते. बºयाच उशीरा का होईना शासनातर्फे मामा तलावांच्या पुनरुज्जीवनाने सिंचन क्षमतेत वाढ झाली असून ४०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात यश आले आहे.जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील ४४८ मामा तलावांच्या पुनरु ज्जीवन कार्यक्र माला पहिल्या टप्प्यात २०१६-१७ या कालावधीत सुरूवात करण्यात आली. यापैकी ३९७ मामा तलावातील गाळाचा उपसा करण्याचे आदेश देण्यात आले. यापैकी १५५ तलावांच्या पुनरुज्जीवनाची कामे पूर्ण करण्यात आली. यातून ६ लाख ६९ हजार ५८७.६७ घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला.परिणामी तलावांच्या सिंचन क्षमतेत तेवढीेच वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील ४०० हेक्टर शेतीला सिंचनाची सोय होणार आहे. जिल्ह्यात १०० हेक्टर सिंचन क्षमतेचे १७७८ मामा तलाव असून याची सिंचन क्षमता ३५ हजार ४५८ हेक्टर आहे. त्यात १०० हेक्टरपेक्षा जास्त सिंचन क्षमतेचे ३८ मामा तलाव असून याची सिंचन क्षमता ६ हजार ५१० हेक्टर आहे. या तलावांच्या माध्यमातून २१ हजार ८२९ हेक्टरला सिंचन होते. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेला गोंदिया हा मागास, दुर्गम, आदिवासी बहुल व नक्षलदृष्ट्या संवेदनशील जिल्हा म्हणूनही ओळखला जातो. जिल्ह्यात धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. या पिकाला पाण्याची अधिक आवश्यकता असते. मात्र याला अनेकदा अनियमित पावसाचा फटका बसतो. यावर्षी देखील अत्यल्प पावसाचा पिकांना फटका बसला. मामा तलावातून सिंचनाची व्यवस्था निर्माण करण्यासाठी शासनाने दूरदृष्टीकोनातून पूर्व विदर्भातील माजी मालगुजारी तलावांचे पुनरूज्जीवन करु न त्यांना संजीवनी देण्याचा विशेष कार्यक्र म हाती घेतला आहे. त्यामुळे या तलावांची सिंचन क्षमता वाढवून अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आणण्यास मदत होणार आहे.रब्बी पिकांना होणार मदतमामा तलावांचा मत्स्यपालनासाठी उपयोग केला जात आहे. यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून शेतकºयांना मत्स्यपालन करणे शक्यत होत आहे.५० हेक्टरपेक्षा जास्त सिंचन क्षमतेच्या तलावातील पाण्याचा उपयोग या पुनरुज्जीवनाच्या विशेष कार्यक्रमामुळे शेतकºयांनी करायला सुरु वात देखील केली आहे. केवळ एका पाण्याच्या कमतरतेमुळे उत्पादनात येणारी घट उपलब्ध पाण्यामुळे भरु न निघण्यास मदत झाली आहे. काही शेतकºयांनी रबी हंगामात धान पिकाव्यतिरिक्त भाजीपाला, हरबरा, गहू ही पिके घेण्यास सुरु वात केली आहे.मामा तलावांना ३५० वर्षांचा इतिहासजिल्ह्याची ओळख राज्यात तलावांचा जिल्हा म्हणून आहे. ३५० वर्षापूर्वी सोळाव्या शतकात तत्कालीन गोंडराजा हिरशहा यांनी भविष्यातील पाण्याची आवश्यकता लक्षात घेता फर्मान काढले की, जो कोणी जंगले साफ करु न शेती करेल त्याला ती बहाल केली जाईल आणि जो कोणी तलाव बांधेल, त्याला त्या तलावाखालील जितकी जमीन असेल ती खुद शेतकरी म्हणून बक्षीस दिली जाईल. या संधीचा उपयोग करु न घेत जिल्ह्यातील त्यावेळेस कोहळी व पोवार समाजातील मालगुजारांनी लोकसहभागातून तत्कालीन शाश्वत सिंचन व्यवस्थापनाची एक परंपरागत पद्धत आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दूरदृष्टिकोनातून तलावांची निर्मिती केली. ब्रिटीश काळात हया तलावांची मालकी मालगुजारांकडे होती. सन १९५० मध्ये शासनाने हे तलाव मालगुजारांकडून ताब्यात घेतले. तेव्हापासून हे तलाव माजी मालगुजारी तलाव म्हणून ओळखले जातात.