शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

मामा तलावांच्या पुनरूज्जीवनाने सिंचनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:15 IST

पूर्व विदर्भातील सर्वाधिक मामा (माजी मालगुजारी) तलावांचा जिल्हा म्हणून गोंदियाची ओळख आहे. मात्र या तलावांमधील गाळाचा ४० ते ५० वर्षांपासून उपसा न केल्याने त्यांची क्षमता कमी झाली होती.

ठळक मुद्दे१५५ तलावांतून गाळाचा उपसा : ४०० हेक्टर सिंचन क्षेत्रात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पूर्व विदर्भातील सर्वाधिक मामा (माजी मालगुजारी) तलावांचा जिल्हा म्हणून गोंदियाची ओळख आहे. मात्र या तलावांमधील गाळाचा ४० ते ५० वर्षांपासून उपसा न केल्याने त्यांची क्षमता कमी झाली होती. तर काही तलावांवर अतिक्रमण झाले होते. बºयाच उशीरा का होईना शासनातर्फे मामा तलावांच्या पुनरुज्जीवनाने सिंचन क्षमतेत वाढ झाली असून ४०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात यश आले आहे.जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील ४४८ मामा तलावांच्या पुनरु ज्जीवन कार्यक्र माला पहिल्या टप्प्यात २०१६-१७ या कालावधीत सुरूवात करण्यात आली. यापैकी ३९७ मामा तलावातील गाळाचा उपसा करण्याचे आदेश देण्यात आले. यापैकी १५५ तलावांच्या पुनरुज्जीवनाची कामे पूर्ण करण्यात आली. यातून ६ लाख ६९ हजार ५८७.६७ घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला.परिणामी तलावांच्या सिंचन क्षमतेत तेवढीेच वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील ४०० हेक्टर शेतीला सिंचनाची सोय होणार आहे. जिल्ह्यात १०० हेक्टर सिंचन क्षमतेचे १७७८ मामा तलाव असून याची सिंचन क्षमता ३५ हजार ४५८ हेक्टर आहे. त्यात १०० हेक्टरपेक्षा जास्त सिंचन क्षमतेचे ३८ मामा तलाव असून याची सिंचन क्षमता ६ हजार ५१० हेक्टर आहे. या तलावांच्या माध्यमातून २१ हजार ८२९ हेक्टरला सिंचन होते. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेला गोंदिया हा मागास, दुर्गम, आदिवासी बहुल व नक्षलदृष्ट्या संवेदनशील जिल्हा म्हणूनही ओळखला जातो. जिल्ह्यात धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. या पिकाला पाण्याची अधिक आवश्यकता असते. मात्र याला अनेकदा अनियमित पावसाचा फटका बसतो. यावर्षी देखील अत्यल्प पावसाचा पिकांना फटका बसला. मामा तलावातून सिंचनाची व्यवस्था निर्माण करण्यासाठी शासनाने दूरदृष्टीकोनातून पूर्व विदर्भातील माजी मालगुजारी तलावांचे पुनरूज्जीवन करु न त्यांना संजीवनी देण्याचा विशेष कार्यक्र म हाती घेतला आहे. त्यामुळे या तलावांची सिंचन क्षमता वाढवून अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आणण्यास मदत होणार आहे.रब्बी पिकांना होणार मदतमामा तलावांचा मत्स्यपालनासाठी उपयोग केला जात आहे. यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून शेतकºयांना मत्स्यपालन करणे शक्यत होत आहे.५० हेक्टरपेक्षा जास्त सिंचन क्षमतेच्या तलावातील पाण्याचा उपयोग या पुनरुज्जीवनाच्या विशेष कार्यक्रमामुळे शेतकºयांनी करायला सुरु वात देखील केली आहे. केवळ एका पाण्याच्या कमतरतेमुळे उत्पादनात येणारी घट उपलब्ध पाण्यामुळे भरु न निघण्यास मदत झाली आहे. काही शेतकºयांनी रबी हंगामात धान पिकाव्यतिरिक्त भाजीपाला, हरबरा, गहू ही पिके घेण्यास सुरु वात केली आहे.मामा तलावांना ३५० वर्षांचा इतिहासजिल्ह्याची ओळख राज्यात तलावांचा जिल्हा म्हणून आहे. ३५० वर्षापूर्वी सोळाव्या शतकात तत्कालीन गोंडराजा हिरशहा यांनी भविष्यातील पाण्याची आवश्यकता लक्षात घेता फर्मान काढले की, जो कोणी जंगले साफ करु न शेती करेल त्याला ती बहाल केली जाईल आणि जो कोणी तलाव बांधेल, त्याला त्या तलावाखालील जितकी जमीन असेल ती खुद शेतकरी म्हणून बक्षीस दिली जाईल. या संधीचा उपयोग करु न घेत जिल्ह्यातील त्यावेळेस कोहळी व पोवार समाजातील मालगुजारांनी लोकसहभागातून तत्कालीन शाश्वत सिंचन व्यवस्थापनाची एक परंपरागत पद्धत आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दूरदृष्टिकोनातून तलावांची निर्मिती केली. ब्रिटीश काळात हया तलावांची मालकी मालगुजारांकडे होती. सन १९५० मध्ये शासनाने हे तलाव मालगुजारांकडून ताब्यात घेतले. तेव्हापासून हे तलाव माजी मालगुजारी तलाव म्हणून ओळखले जातात.