शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

वायू प्रदूषणामुळे श्वसनाच्या रोगात वाढ

By admin | Updated: November 23, 2015 01:41 IST

ग्रामीण भागात फारशी कारखानदारी नसली तरी दिवसेंदिवस होत असलेला रसायनाचा उपयोग मोठ्या प्रमाणात वृक्षाची कटाई वाहणाऱ्या संख्येत होणारी झपाट्याने वाढ होत आहे.

गोंदिया : ग्रामीण भागात फारशी कारखानदारी नसली तरी दिवसेंदिवस होत असलेला रसायनाचा उपयोग मोठ्या प्रमाणात वृक्षाची कटाई वाहणाऱ्या संख्येत होणारी झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना श्वसनाचा रोगात दिवसे दिवस वाढ होऊन सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. ग्रामीण भागातील ग्राम पंचायत व आरोग्य केंद्रातील अधिकारी-कर्मचारी यांच्या निष्काळजी पणामुळे ग्रामीण भागात अस्वच्छता राहते. हे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होण्यामागील मुख्य कारण आहे. गावातील मोऱ्यामध्ये साचलेला केरकचरा, धान, सांड पाणी, पिण्याचे दूषित पाणी यामुळे ही प्रदूषणात वाढ होऊन याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊन नवनवीन आजाराची उत्पत्ती होत आहे. यामुळे शासन प्रशासनाच्या प्रदूषण नियंत्रण व प्रतिबंध विभागाने प्रत्येक ग्राम पंचायत स्तरावर शोध मोहीम सुरू करावी. तसेच प्रदूषणास कारणीभूत व्यक्तीवर कायदेशीर अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहेत. ठिकठिकाणी गावातील मोऱ्या व हॅन्डपंपचा भोवताल सांडपाणी जमा होते. हवेच्या प्रदूषणात ही वाढ होत आहे. त्या हॅन्डपंम्पाच्या पाणी उपयोगात आणल्यास हगवन, पोटाचे विकार उद्भवतात. सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे हवेत प्रदूषण होऊन श्वसनाचे विकारांचा प्रादुर्भाव होत आहे. विविध कार्यक्रम समारंभामध्ये स्पिकर, डी.जे. साऊंड सिस्टम अशा ध्वनिक्षेपकाचा आवाज वाजवी पेक्षा अती जास्त असल्यामुळे व अशा आवाजाच्या सतत सानिध्यात राहील्याने त्याचा परिणाम थेट हृदयावर होत आहे. त्याप्रमाणे कानावर ही परिणाम होऊन कायमस्वरूपी बहिरेपणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने अशा प्रदूषणाबाबत सर्वत्र जनजागृती मोहिमांचे आयोजन करणे आवश्यक आहे. वायू प्रदूषणामुळे आरोग्याच्या सर्वात अधिक समस्या उद्भवत आहे. वायू प्रदूषण म्हणजे हवेमध्ये घातक, दूषित व उपायकारक पदार्थाचे मिश्रण होणे होय. डिझेल, पेट्रोल इतर इंधन, सिगारेट या माध्यमातून कार्बन मोनाक्साईड (रंगहीन वायू) बाहेर पडतो. त्यामुळे या वायूमुळे प्रदूषण जास्त होताना दिसते. या अपायकारक वायूचे प्रमाण वातावरणात वाढल्यामुळे प्राणवायूचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे शरीराची हालचाल मंदावत असून नागरिकांना अनेक शारीरिक समस्या जानवत आहे. तसेच रासायनिक प्रदूषणामुळे घरघुती नि:सरण, कारखानदारी औद्योगिक कचरा, अवशेष कचऱ्यातून होणारी गळती, वातावरणातील उत्सर्जन, घरघूती निर्मूलन हे वायू प्रदूषणाचे स्त्रोत आहेत. वायू प्रदूषणामुळे सर्वात घातक परिणाम श्वसन संस्थेवर होते. प्राणवायूच्या अभावाने फुफ्फुसे कमजोर होऊन निकामी होण्याचा मार्गावर आहे. दमाच्या आजारात वाढ होऊ लागली. कार्बन मोनोक्साईड हिमोग्लोबीनमध्ये आॅक्सिजनऐवजी मिसळून जातो. शरीरातील सर्व भागात पसरतो. त्यामुळे वायू अति विषारी असून याचा सरळ शरीरावर सर्वात मोठा परिणाम होऊन विविध आजाराची लागण होऊन प्राण गमवण्याची पाळी उद्भवत आहे. राज्य व केंद्र शासनाने रासायनिक प्रदूषणाबाबत अनेक कायदे केले आहेत. परंतु त्यांची अंमलबजावणी करणारे विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. वाहणाऱ्या इंधन, धूर यांची तपासण्या करणारे विभाग वेळोवेळी तपासणी करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. वाहनातून मोठ्या प्रमाणात धूरा कर्कश आवाज यानेही पर्यावरणाला मोठा जबर फटका बसून याचा परिणाम सरळ सजीव प्राण्यावर होत आहे. त्यामुळे चार चाकी वाहनात डिझेलच्या जागी केरोसिनचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढच होत आहे. पण प्रदूषण नियंत्रण व प्रतिबंधक विभागाने प्रदूषण शोध मोहीम वेळोवेळी सुरू करुन प्रदूषण होण्याच्या स्त्रोताचा शोध घेऊन सबंधीतावर निर्धारीत करण्यात आलेल्या नियमाप्रमाणे कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकाकडून करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)