शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

जिल्ह्यात पाणी साठवण क्षमता वाढणार

By admin | Updated: January 15, 2015 22:53 IST

‘टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९’ अंतर्गत पाणी टंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्याभर राबविण्यात येत आहे. यासंदर्भात ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या आदेशानुसार

दिलीप चव्हाण - गोरेगाव‘टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९’ अंतर्गत पाणी टंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्याभर राबविण्यात येत आहे. यासंदर्भात ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या आदेशानुसार काम सुरू झाले असून त्याचे चांगले परिणाम येत्या काही वर्षात दिसतील. त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे.ऐन पिकांच्या वाढीच्या काळात पावसाची अनियमितता व खंड यामुळे सतत टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होवून त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे. सुविधांचा विचार करुन मर्यादित सिंचन सुविधा, अवर्षण-प्रवण क्षेत्राची मोठी व्याप्ती, हलक्या व अवनत जमिनीचे मोठे प्रमाण, विषय, अनिश्चित व खंडीत पर्जन्यमान यामुळे कृषी क्षेत्रात वाढत जाणारी अनिश्चितता या बाबी प्रकर्षाने विकासामध्ये आव्हान ठरत आहेत. मागील चार दशकात कोरडवाहू क्षेत्रातील पिकांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसून येत आहे. या परिस्थितीस मुख्यत्वेकरुन पाण्याची कमतरता हा घटक कारणीभूत ठरला आहे. त्यामुळेच शाश्वत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्धता करुन देण्यासाठी ग्रामविकास व जलंसधारण विभागाने कंबर कसली आहे.ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या शासन निर्णयात जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचे धोरण कसे राहील याविषयी सखोल मार्गदर्शन केले आहे. भूगर्भातील पाणी पातळीत मोठी घट झालेले राज्यभर १८८ तालुके म्हणजे २२३४ गावे आहेत. या गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासण्याची शक्यता आहे. शासनाने दि. २५ नोव्हेंबर २०१४ च्या शासन निर्णयान्वये २२ जिल्ह्यातील १९०५९ गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. अनेक जलाशयांमध्ये यावर्षी पाणीसाठाही घटला आहे. ही वास्तविकता पाहता जलयुक्त शिवार अभियान राबविणे किती गरजेचे झाले याची कल्पना येते.या अभियानातून पाणी अडविणे/जिरविण्याबाबत लोकांना प्रोत्साहित करणे, पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी प्रोत्साहित करणे, ग्रामीण भागातील बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजनाचे पुनर्जिविकरण करुन पाणी पुरवठ्यात वाढ करणे, भुगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे, पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे इत्यादी शासनाचे उद्देश आहेत.