शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

जिल्ह्यात पाणी साठवण क्षमता वाढणार

By admin | Updated: January 15, 2015 22:53 IST

‘टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९’ अंतर्गत पाणी टंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्याभर राबविण्यात येत आहे. यासंदर्भात ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या आदेशानुसार

दिलीप चव्हाण - गोरेगाव‘टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९’ अंतर्गत पाणी टंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्याभर राबविण्यात येत आहे. यासंदर्भात ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या आदेशानुसार काम सुरू झाले असून त्याचे चांगले परिणाम येत्या काही वर्षात दिसतील. त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे.ऐन पिकांच्या वाढीच्या काळात पावसाची अनियमितता व खंड यामुळे सतत टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होवून त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे. सुविधांचा विचार करुन मर्यादित सिंचन सुविधा, अवर्षण-प्रवण क्षेत्राची मोठी व्याप्ती, हलक्या व अवनत जमिनीचे मोठे प्रमाण, विषय, अनिश्चित व खंडीत पर्जन्यमान यामुळे कृषी क्षेत्रात वाढत जाणारी अनिश्चितता या बाबी प्रकर्षाने विकासामध्ये आव्हान ठरत आहेत. मागील चार दशकात कोरडवाहू क्षेत्रातील पिकांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसून येत आहे. या परिस्थितीस मुख्यत्वेकरुन पाण्याची कमतरता हा घटक कारणीभूत ठरला आहे. त्यामुळेच शाश्वत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्धता करुन देण्यासाठी ग्रामविकास व जलंसधारण विभागाने कंबर कसली आहे.ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या शासन निर्णयात जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचे धोरण कसे राहील याविषयी सखोल मार्गदर्शन केले आहे. भूगर्भातील पाणी पातळीत मोठी घट झालेले राज्यभर १८८ तालुके म्हणजे २२३४ गावे आहेत. या गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासण्याची शक्यता आहे. शासनाने दि. २५ नोव्हेंबर २०१४ च्या शासन निर्णयान्वये २२ जिल्ह्यातील १९०५९ गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. अनेक जलाशयांमध्ये यावर्षी पाणीसाठाही घटला आहे. ही वास्तविकता पाहता जलयुक्त शिवार अभियान राबविणे किती गरजेचे झाले याची कल्पना येते.या अभियानातून पाणी अडविणे/जिरविण्याबाबत लोकांना प्रोत्साहित करणे, पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी प्रोत्साहित करणे, ग्रामीण भागातील बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजनाचे पुनर्जिविकरण करुन पाणी पुरवठ्यात वाढ करणे, भुगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे, पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे इत्यादी शासनाचे उद्देश आहेत.