शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
3
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
4
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
5
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
6
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
7
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
8
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
9
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
10
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
11
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
12
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
13
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
14
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
15
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
16
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
17
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
18
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
19
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
20
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय योनजांचा लाभ घेऊन जीवनमान उंचवावे

By admin | Updated: August 3, 2014 00:10 IST

शासनस्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा. जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावल्याशिवाय विकास होणार नाही. सर्व स्तरातील नागरिकांनी याबाबत

जिल्हाधिकारी सैनी : विस्तारीत समाधान शिबिरगोंदिया : शासनस्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा. जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावल्याशिवाय विकास होणार नाही. सर्व स्तरातील नागरिकांनी याबाबत प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांनी व्यक्त केले. सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत आयोजित समाधान योजना शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. आमगाव तालुक्यातील ग्राम रिसामा येथील विजयालक्ष्मी सभागृहात आयोजित या शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय देवरे, माजी आ. केशवराव मानकर, भेरसिंग नागपुरे, पंचायत समिती सभापती हनुवंत वट्टी, आमगाव सरपंच पद्मा चुटे, रिसामा सरपंच निर्मला रामटेके, बनगाव सरपंच सुषमा भूजाडे, कुंभारटोली सरपंच त्रिगुणा मेश्राम, उपविभागीय अधिकारी दुर्गेश सोनवाने, उपजिल्हाधिकारी (महसूल) मनकवडे, जिल्हा पुरवठा अधिकारी काळे उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ.सैनी यांनी, शेतकरी बांधवांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेंतर्गत रबी पिकांचे नियोजन, शेतकरिता पाण्याचे नियोजन, विविध तंत्रज्ञानाचा अवलंब, त्याचप्रमाणे मत्स्यव्यवसाय व शेतीपूरक व्यवसायांकडे लक्ष पुरविणे आवश्यक असल्याचे सांगितले. नागरिकांच्या समस्यांचे निराकरण व्हावे, याकरिता शासकीय योजना गुणवत्तापूर्ण व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येतात. कामगार कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेल्या योजना, विविध दाखले देण्याकरिता शिबिरांचे आयोजन, फेरफार अदालती इत्यादी शिबिरांच्या माध्यमातून कार्यालयीन जुन्या दस्तावेजांची कायमस्वरुपी नोंदणी करण्यात येणार आहे असल्याचे सांगीतले. तर पुढे सात दिवसांमध्ये स्कॅनिंगचे काम संपूर्ण जिल्ह्यात सुरू करण्यात येणार असून डिजीटल साईन सर्टिफिकेट योजनेची माहिती देताना त्यांनी सांगितले की, आठ तालुक्यांमध्ये ग्रामस्तरावर निर्मित केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांनी दस्तावेज सादर करताना त्यांना दाखला व आधार कार्ड प्राप्त होईल. या पद्धतीने सहा ते सात हजार नागरिकांना दाखल्याचे वाटप झाले. तर मागील वर्षी विविध प्रकारच्या २६ हजार दाखल्यांचे वाटप करण्यात आले असून आधार नोंदणीमध्येही जिल्हा अग्रेसर असल्याचे ते म्हणाले.शिवणकर यांनी यावेळी सांगितले की, समस्या आपल्यामुळेच निर्माण होत असतात. नागरिकांनी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवावी म्हणजे समस्या उद्धभवणारा नाही. गावाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये ग्रामसभा, चावडी वाचनाचा लाभ गावकऱ्यांनी घ्यावा, त्यामुळे योजनांची माहिती होते. सातबारा, फेरफार, वनजमिनीचे पट्टे वाटप यासारख्या योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी आपला विकास साधावा.यावेळी जननी शिशू सुरक्षा योजनेंतर्गत धनादेशाचे वाटप, शेतकरी लाभार्थ्यांना स्प्रेपंप, युरीया खताचा वाटप, अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरेलू कामगार कल्याण मंडळ योजनेअंतर्गत धनादेशाचे वाटप, वनविभागाकडून गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. शिबिरामध्ये पोलीस विभाग, कृषी विभाग, भूमि अभिलेख, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी सेविका, महावितरण या विभागांची विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले होते. लोकसंख्येचा भस्मासूर या विषयावर पथनाट्यही यावेळी सादर करण्यात आले.कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, योजनांचे लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)